शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

३७ टक्के विद्यार्थी गणित व भाषेत कच्चे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 01:24 IST

शालेय शिक्षण विभागाच्या वतीने जानेवारी महिन्यात पहिली व फेब्रुवारी दुसरी अध्ययन स्तर निश्चिती चाचणी घेण्यात आली.

ठळक मुद्देअध्ययनस्तर निश्चिती : जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची चाचणी

दिगांबर जवादे।ऑनलाईन लोकमतगडचिरोली : शालेय शिक्षण विभागाच्या वतीने जानेवारी महिन्यात पहिली व फेब्रुवारी दुसरी अध्ययन स्तर निश्चिती चाचणी घेण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या पहिली ते आठवीच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ३८ टक्के विद्यार्थी भाषा विषयात तर ३७ टक्के विद्यार्थी गणित विषयात कच्चे असल्याचे दिसून आले आहे. या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देऊन त्याचा अध्ययन क्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसीत करण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यभरात अनेक उपक्रम राबविले जात आहेत. तरीही काही विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता अत्यंत कमी असल्याचे दिसून आले. विद्यार्थी ज्या वर्गात शिकत आहे. त्या वर्गातील मुलभूत ज्ञान विद्यार्थ्याला माहित नसेल तर त्याच्या पुढील बाबी समजण्यास अडचणी निर्माण होतात. नेमक्या किती विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गानुसार मुलभूत ज्ञान आहे व किती विद्यार्थी मागे आहेत. याचा शोध घेण्यासाठी जिल्हा परिषदे शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तर निश्चिती चाचण्या घेण्यात आल्या.गडचिरोली जिल्ह्यात पहिली अध्ययन स्तर निश्चितीची फेरी १६ ते २५ जानेवारी या कालावधीत घेण्यात आली. एकूण ६१ हजार ४०१ विद्यार्थ्यांनी अध्ययन स्तर निश्चिती चाचणी दिली. भाषा विषयात ८० टक्के विद्यार्थ्यांना भाषण व संभाषण करता आले. ७५ टक्के विद्यार्थ्यांना शब्द वाचन करता आले. ६५ टक्के विद्यार्थ्यांना वाक्य वाचन तर ४९ टक्के विद्यार्थ्यांना समजपूर्वक उतारा वाचन करता आले. गणित विषयाच्या अध्ययन स्तर निश्चिती चाचणीत ७६ टक्के विद्यार्थ्यांना ० ते ९ या अंकांचे वाचन करता आले. ६९ टक्के विद्यार्थ्यांना संख्या ज्ञान असल्याचे निष्पन्न झाले. ६९ विद्यार्थ्यांना बेरीज व ६४ टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी, ५७ टक्के विद्यार्थ्यांना गुणाकार तर ५५ टक्के विद्यार्थ्यांना भागाकार करता आले.ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत त्यांच्या वर्गानुसार अध्ययन क्षमता प्राप्त केली नसल्याचे लक्षात आले अशा विद्यार्थ्यांवर शिक्षकांनी विशेष लक्ष केंद्रीत करून अध्यापन केले. शैक्षणिक साधनांचा वापर करून त्यांना शिकविण्यात आले. त्यानंतर २० ते २८ फेब्रुवारीदरम्यान दुसरी अध्ययन स्तर निश्चिती फेरी घेण्यात आली. एकूण ६६ हजार ३०८ विद्यार्थ्यांपैकी ६५ हजार १९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये ९६ टक्के विद्यार्थ्यांना संभाषण कौशल्य, ९२ टक्के विद्यार्थ्यांना शब्द वाचन, ८१ टक्के विद्यार्थ्यांना वाक्य वाचता आले. तर ६२ टक्के विद्यार्थ्यांना समजपूर्वक उतारा वाचता आला.गणिताच्या चाचणीदरम्यान ९५ टक्के विद्यार्थ्यांना शुन्य ते नऊ अंकाचे वाचन करता आले. ९१ टक्के विद्यार्थ्यांना संख्याज्ञान असल्याचे आढळून आले, ८९ टक्के विद्यार्थ्यांना बेरीज, ८१ टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी, ७३ टक्के विद्यार्थ्यांना गुणकार तर ६३ टक्के विद्यार्थ्यांना भागाकार करता आला.दुसऱ्यां चाचणीत स्थिती सुधारलीभाषा विषयात समाजपूर्वक उतारा वाचणे महत्त्वाचे मानले जाते. पहिल्या चाचणीत फक्त ४९ टक्के विद्यार्थ्यांना समाजपूर्वक उतारा वाचता येत होता. तर ५५ टक्के विद्यार्थ्यांना भागाकार येत होता. जे विद्यार्थी मागे होते त्यांच्याकडे शिक्षकांनी विशेष लक्ष घातल्यानंतर दुसºया फेरीत विद्यार्थ्यांची प्रगती सुधारली. दुसºया फेरीमध्ये ६२ टक्के विद्यार्थ्यांना समजपूर्वक उतारा वाचता आला. तर ६३ टक्के विद्यार्थ्यांना भागाकार करता आला आहे.मुख्य सचिवांकडून कौतुकअध्ययनस्तर निश्चिती कार्यक्रम गडचिरोली जिल्ह्यात अतिशय चांगल्या पध्दतीने राबविल्याबाबत १७ मार्च रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, डीआयईसीपीडीचे प्राचार्य डॉ. शरदचंद्र पाटील व शिक्षणाधिकारी गुढे यांचा राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांनी सत्कार केला.