शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

४८४५ धान उत्पादकांचे ३६ कोटींचे चुकारे थकीत; रब्बी हंगामात ३.२२ लाख क्विंटल खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 20:45 IST

धान उत्पादकांचा जिल्हा असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात रब्बी हंगामातील धान खरेदीची मुदत ३१ जुलैला संपली. या वर्षी ३ लाख २२ हजार क्विंटल धानाची खरेदी आदिवासी विकास महामंडळाने केली.

गडचिरोली : धान उत्पादकांचा जिल्हा असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात रब्बी हंगामातील धान खरेदीची मुदत ३१ जुलैला संपली. या वर्षी ३ लाख २२ हजार क्विंटल धानाची खरेदी आदिवासी विकास महामंडळाने केली. त्यातील काही शेतकऱ्यांचे चुकारे झाले आहेत. पण आता निधीच संपल्याने ४८४५ शेतकऱ्यांचे ३६ कोटी रुपयांचे चुकारे थकीत आहेत. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असताना त्यांचे हक्काचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली आणि अहेरी उपप्रादेशिक कार्यालयामार्फत आदिवासी विविध कार्यकारी संस्थांमार्फत शासनाच्या हमीभावानुसार शेतकऱ्यांकडील धान खरेदी केला जातो.

जिल्ह्यात हळूहळू सिंचनाच्या सुविधा वाढत असल्याने रब्बी हंगामातील धानाची लागवडही वाढत आहे. गेल्या रब्बी हंगामात ८२२१ शेतकऱ्यांनी ३ लाख २२ हजार ९८५ क्विंटल धान आदिवासी विकास महामंडळाला विकला. त्याची किंमत ६० कोटी ३३ लाख होती. त्यापैकी ३३७६ शेतकऱ्यांना २४ कोटी २९ लाखांचे चुकारे मिळाले. पण उर्वरित ४८४५ शेतकरी बाकी आहेत. निधी उपलब्ध झाल्यानंतरच ते चुकारे अदा केले जातील, असे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली