शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

४८४५ धान उत्पादकांचे ३६ कोटींचे चुकारे थकीत; रब्बी हंगामात ३.२२ लाख क्विंटल खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 20:45 IST

धान उत्पादकांचा जिल्हा असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात रब्बी हंगामातील धान खरेदीची मुदत ३१ जुलैला संपली. या वर्षी ३ लाख २२ हजार क्विंटल धानाची खरेदी आदिवासी विकास महामंडळाने केली.

गडचिरोली : धान उत्पादकांचा जिल्हा असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात रब्बी हंगामातील धान खरेदीची मुदत ३१ जुलैला संपली. या वर्षी ३ लाख २२ हजार क्विंटल धानाची खरेदी आदिवासी विकास महामंडळाने केली. त्यातील काही शेतकऱ्यांचे चुकारे झाले आहेत. पण आता निधीच संपल्याने ४८४५ शेतकऱ्यांचे ३६ कोटी रुपयांचे चुकारे थकीत आहेत. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असताना त्यांचे हक्काचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली आणि अहेरी उपप्रादेशिक कार्यालयामार्फत आदिवासी विविध कार्यकारी संस्थांमार्फत शासनाच्या हमीभावानुसार शेतकऱ्यांकडील धान खरेदी केला जातो.

जिल्ह्यात हळूहळू सिंचनाच्या सुविधा वाढत असल्याने रब्बी हंगामातील धानाची लागवडही वाढत आहे. गेल्या रब्बी हंगामात ८२२१ शेतकऱ्यांनी ३ लाख २२ हजार ९८५ क्विंटल धान आदिवासी विकास महामंडळाला विकला. त्याची किंमत ६० कोटी ३३ लाख होती. त्यापैकी ३३७६ शेतकऱ्यांना २४ कोटी २९ लाखांचे चुकारे मिळाले. पण उर्वरित ४८४५ शेतकरी बाकी आहेत. निधी उपलब्ध झाल्यानंतरच ते चुकारे अदा केले जातील, असे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली