शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

३६ मत्स्य सहकारी संस्था अवसायानात

By admin | Updated: May 4, 2016 02:36 IST

गेल्या दोन-तीन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात अत्यल्प पाऊस होत आहे. याशिवाय जिल्ह्यात पाणी साठवणुकीची

बेरोजगारीचे संकट : तलावात पाणीसाठा नसल्याचा परिणामगडचिरोली : गेल्या दोन-तीन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात अत्यल्प पाऊस होत आहे. याशिवाय जिल्ह्यात पाणी साठवणुकीची कोणतीही प्रभावी उपाययोजना नाही. परिणामी शेकडो तलावातील पाणीसाठा नष्ट झाला आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय धोक्यात आला असून जिल्ह्यातील एकूण ३६ मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था बंद पडल्या असून त्या अवसायानात निघाल्या आहेत.गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेंतर्गत जवळपास १ हजार ६०० माजी मालगुजारी तलाव आहे. यापैकी जिल्ह्यातील आदिवासी बहूल सहा तालुक्यांच्या गावांमध्ये १०० टक्के पेसा कायदा लागू करण्यात आला आहे. या तलावांचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार ग्रामसभेमार्फत ग्रामपंचायतीकडे सोपविण्यात आला आहे. परिणामी पारंपरिक मत्स्य व्यवसाय करणाऱ्या मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांना तलाव मासेमारीसाठी मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. चंद्रपूर पाटबंधारे विभागाकडे एकूण १२ तलाव आहेत. यापैकी तीन तलाव पेसा क्षेत्रात असल्याने सदर तलाव मत्स्य सहकारी संस्थांना यंदा मिळाली नाही. जिल्ह्यात नदी, नाले, तलाव, बोड्यांची संख्या मोठी असल्याने चार वर्षांपूर्वी मत्स्य व्यवसायातून सहकारी संस्थांची प्रचंड आर्थिक भरभराट होत होती. मात्र गेल्या काही वर्षापासून दुष्काळ व पेसा कायदा लागू झाल्याने मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचे कार्यक्षेत्र मर्यादित झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण ९६ मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था आहेत. यापैकी ७० सहकारी संस्था मासेमारीच्या व्यवसायात कार्यरत आहेत. उर्वरित ३६ सहकारी संस्था मासेमारी बंद झाल्याने अवसायानात निघाल्या आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)पाच पदे रिक्त४सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय गडचिरोलीच्या कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकूण १३ पदे मंजूर आहेत. यापैकी आठ पदे भरण्यात आली असून पाच पदे रिक्त आहेत. रिक्त असलेल्या पदांमध्ये सहायक आयुक्त, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी व मत्स्य क्षेत्रीक यांचा समावेश आहे.मत्स्य व्यवसाय कार्यालयाचा कारभार दोन वर्षांपासून प्रभारी अधिकाऱ्यांवर४जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने गडचिरोली ेयेथे शासनाने सहायक आयुक्त, मत्स्य व्यवसाय कार्यालय सुरू केले. मात्र या कार्यालयातील सहायक आयुक्त हे मुख्य पद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे सदर कार्यालयाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवरच सुरू आहे. या कार्यालयातील पूर्वीचे सहायक आयुक्त ३१ मे २०१४ रोजी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून येथील सहायक आयुक्तांचे पद भरण्यात आले नाही. सदर आयुक्त पदाचा प्रभार वर्ग २ च्या मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. विशेष म्हणजे गडचिरोली कार्यालयाचा प्रभार असलेल्या मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्यांकडे चंद्रपूरच्या कार्यालयाचा सहायक आयुक्त पदाचा पदभारही सोपविण्यात आला आहे. तलाव खोलीकरणाचा अभाव ४जिल्ह्यात तलावांची संख्या मोठी आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद, पाटबंधारे विभाग व सिंचाई विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या तलावांची खोलीकरण करण्यात आली नाही. त्यामुळे पावसाचे जमा झालेले पाणी शेतीला पाणी पुरवठा करताना पूर्णत: निघून जाते. तलावात गाळ साचल्यामुळे तलावातील पाणी साठ्याची खोली प्रचंड कमी झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या मार्च महिन्यातच मासे उत्पादन घटण्यास सुरूवात होते. मत्स्य व्यवसायाला भरभराटी देण्यासाठी तलावांचे खोलीकरण करणे अत्यावश्यक आहे.माशांच्या उत्पादनात घट ४सन २०१४-१५ या वर्षात सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय गडचिरोली कार्यालयांतर्गत नोंदणीकृत जिल्ह्यात सर्व तलाव, नदी, नाले व इतर स्त्रोत मिळून ३ हजार २०७ मेट्रिक टन मत्स्य उत्पादन झाले होते. यंदा २०१५-१६ या वर्षात १२ कोटी ८० लाख रूपये किमतीचे ३ हजार २०० मेट्रिक टन मासे उत्पादन झाले आहे. या दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात ३५ हजार वर मेट्रिक टन माशांचे उत्पादन होत होते. मात्र तलाव कोरडे पडत असल्याने मत्स्य उत्पादन दिवसेंदिवस कमी होत आहे.