शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

३५३ पेसा ग्रामसभांना मिळणार १८७ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 01:35 IST

राज्यातील आदिवासीबहुल क्षेत्रातील ग्रामपंचायतींना दरवर्षी आदिवासी विकास उपयोजनेतून ५ टक्के निधी दिला जातो. चालू आर्थिक वर्षासाठी (२०१८-१९) जिल्ह्यातील पेसा कायदा लागू असलेल्या ३५३ ग्रामसभांसाठी १८७ कोटी ५२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देविकासात्मक कामे मार्गी लागणारआदिवासी उपयोजनेअंतर्गत वाढीव निधीची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यातील आदिवासीबहुल क्षेत्रातील ग्रामपंचायतींना दरवर्षी आदिवासी विकास उपयोजनेतून ५ टक्के निधी दिला जातो. चालू आर्थिक वर्षासाठी (२०१८-१९) जिल्ह्यातील पेसा कायदा लागू असलेल्या ३५३ ग्रामसभांसाठी १८७ कोटी ५२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यातून त्या ग्रामसभांच्या अंतर्गत येणाऱ्या १२१७ गावांमध्ये विविध विकास कामे केली जाणार आहेत.राज्यातील अनुसूचित क्षेत्राअंतर्गत येणाºया ग्राम पंचायतींमधील गावांचा विकास करण्यासाठी आणि त्या गावांमध्ये आवश्यक त्या मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी आदिवासी उपयोजनेतून ५ टक्के निधी देण्याची तरतूद केली आहे. यासंदर्भात राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडून बुधवारी एक परिपत्रक जारी करण्यात आले. त्यानुसार आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये १६ कोटी ३२ लाख २५ हजार २६९ रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. यावर्षी त्यात वाढ करण्यात आली.जिल्ह्यातील धानोरा, कुरखेडा, कोरची, गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, सिरोंचा, अहेरी, मुलचेरा, भामरागड आणि एटापल्ली पंचायत समितीअंतर्गत येणाºया सर्व पेसा क्षेत्रातील ३५३ ग्राम सभांना हा निधी मिळणार आहे. याचा लाभ संबंधित ग्रामसभांच्या अंतर्गत येणाºया १२१७ गावांमधील ३ लाख ३७ हजार २५ गावकºयांना होणार आहे. त्यांच्या विविध सोयीसुविधांसाठी ५ टक्के निधीअंतर्गत पहिल्या टप्प्यात १४ कोटी २९ लाख ६९ हजार ६४० रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. या निधीचे वाटप प्रत्येक ग्रामसभेच्या बँक खात्यात थेट जमा केला जाणार आहे.उपलब्ध निधीनुसार, गावातील विकास कार्यावर खर्च करून निधीच्या विनियोगाची माहिती राज्य सरकारला पाठविण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना देण्यात आले आहे. या कामात ग्रामसेवकांची जबाबदारी वाढली असून त्यांना वेळोवेळी हिशेब द्यावा लागणार आहे.ग्रामसभांना दिलासायावर्षी ग्रामसभांना तेंदूपत्ता लिलावात बरेच नुकसान सहन करावे लागले. बोली लावण्यासाठी कंत्राटदारच आले नाही. जे आले त्यांनी कमी दरात कंत्राट घेतले. त्यामुळे अनेक ग्रामसभांकडे विकास कामांसाठी निधी नाही. शासनाकडून प्राप्त या निधीमुळे त्यांना आता बराच दिलासा मिळणार आहे.