शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
12
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
13
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
14
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
15
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
16
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
17
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
18
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
19
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
20
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी

३५३ पेसा ग्रामसभांना मिळणार १८७ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 01:35 IST

राज्यातील आदिवासीबहुल क्षेत्रातील ग्रामपंचायतींना दरवर्षी आदिवासी विकास उपयोजनेतून ५ टक्के निधी दिला जातो. चालू आर्थिक वर्षासाठी (२०१८-१९) जिल्ह्यातील पेसा कायदा लागू असलेल्या ३५३ ग्रामसभांसाठी १८७ कोटी ५२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देविकासात्मक कामे मार्गी लागणारआदिवासी उपयोजनेअंतर्गत वाढीव निधीची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यातील आदिवासीबहुल क्षेत्रातील ग्रामपंचायतींना दरवर्षी आदिवासी विकास उपयोजनेतून ५ टक्के निधी दिला जातो. चालू आर्थिक वर्षासाठी (२०१८-१९) जिल्ह्यातील पेसा कायदा लागू असलेल्या ३५३ ग्रामसभांसाठी १८७ कोटी ५२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यातून त्या ग्रामसभांच्या अंतर्गत येणाऱ्या १२१७ गावांमध्ये विविध विकास कामे केली जाणार आहेत.राज्यातील अनुसूचित क्षेत्राअंतर्गत येणाºया ग्राम पंचायतींमधील गावांचा विकास करण्यासाठी आणि त्या गावांमध्ये आवश्यक त्या मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी आदिवासी उपयोजनेतून ५ टक्के निधी देण्याची तरतूद केली आहे. यासंदर्भात राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडून बुधवारी एक परिपत्रक जारी करण्यात आले. त्यानुसार आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये १६ कोटी ३२ लाख २५ हजार २६९ रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. यावर्षी त्यात वाढ करण्यात आली.जिल्ह्यातील धानोरा, कुरखेडा, कोरची, गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, सिरोंचा, अहेरी, मुलचेरा, भामरागड आणि एटापल्ली पंचायत समितीअंतर्गत येणाºया सर्व पेसा क्षेत्रातील ३५३ ग्राम सभांना हा निधी मिळणार आहे. याचा लाभ संबंधित ग्रामसभांच्या अंतर्गत येणाºया १२१७ गावांमधील ३ लाख ३७ हजार २५ गावकºयांना होणार आहे. त्यांच्या विविध सोयीसुविधांसाठी ५ टक्के निधीअंतर्गत पहिल्या टप्प्यात १४ कोटी २९ लाख ६९ हजार ६४० रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. या निधीचे वाटप प्रत्येक ग्रामसभेच्या बँक खात्यात थेट जमा केला जाणार आहे.उपलब्ध निधीनुसार, गावातील विकास कार्यावर खर्च करून निधीच्या विनियोगाची माहिती राज्य सरकारला पाठविण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना देण्यात आले आहे. या कामात ग्रामसेवकांची जबाबदारी वाढली असून त्यांना वेळोवेळी हिशेब द्यावा लागणार आहे.ग्रामसभांना दिलासायावर्षी ग्रामसभांना तेंदूपत्ता लिलावात बरेच नुकसान सहन करावे लागले. बोली लावण्यासाठी कंत्राटदारच आले नाही. जे आले त्यांनी कमी दरात कंत्राट घेतले. त्यामुळे अनेक ग्रामसभांकडे विकास कामांसाठी निधी नाही. शासनाकडून प्राप्त या निधीमुळे त्यांना आता बराच दिलासा मिळणार आहे.