शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

कर्जमाफीसाठी ३५ हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:03 IST

शेतकºयांचे थकलेले कर्ज माफ करण्यासाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे.

ठळक मुद्देसेतू केंद्रांवर गर्दी वाढली : जवळपास ७० टक्के शेतकºयांनी केली आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतकºयांचे थकलेले कर्ज माफ करण्यासाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत २६ आॅगस्टपर्यंत जिल्हाभरातील ३५ हजार २५० शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज सादर केले आहेत. १५ सप्टेंबरपर्यंत मुदत निश्चित केल्याने केंद्रांवर अर्ज भरण्यासाठी शेतकºयांची मोठी गर्दी उसळत आहे. जवळपास ७० टक्के शेतकºयांचे अर्ज भरून झाले असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली आहे.कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम शेतकºयांना आॅनलाईन अर्ज करणे सक्तीचे करण्यात आले होते. आॅनलाईन अर्ज भरण्याला सुरूवात झाल्यानंतर काही दिवस मंत्रा डिव्हाईस उपलब्ध झाले नव्हते. त्यामुळे शेतकºयांना अर्जच भरता आले नाही. त्यानंतर मात्र अर्ज भरण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला. जुलै महिन्यात रोवणीची कामे सुरू होती. मात्र शासनाने शेवटची मुदत निश्चित केली नव्हती. कधीही अर्ज करण्याची मुदत संपून जाईल, अशी भिती शेतकºयांना असल्याने शेतीचे काम सोडून सेतू केंद्रात सकाळपासून रात्री उशीरापर्यंत शेतकरी बसून राहत होते. अनेक केंद्रांमध्ये अजुनही शेतकºयांच्या रांगा लागलेल्याच आहेत. ग्रामपंचायत स्तरावरही अर्ज भरता येत असले तरी ग्रामपंचायतीने मात्र पुढाकार घेतला नाही. त्यामुळे सेतू केंद्रांवरच गर्दी उसळली असल्याचे दिसून येत आहे. जवळपास ७० टक्के शेतकºयांचे अर्ज भरून झाले असल्याचा अंदाज शेतकºयांनी व्यक्त केला आहे.पीक कर्ज माफ योजनेअंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकरी ज्यांनी १ एप्रिल २००९ नंतर पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज घेतले व असे कर्ज ३० जून २०१६ पर्यंत थकीत आहे अशा शेतकºयांचे मुद्दल व व्याजासह १ लाख ५० हजार रूपयांचे कर्ज माफ केले जाणार आहे. दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकºयांसाठी एकवेळ समझोता योजनेअंतर्गत दीड लाख रूपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. नियमित कर्ज भरणाºयांनाही काही प्रमाणात प्रोत्साहन रक्कम दिली जाणार आहे.बँकांचेही काम सुरूबँकांनाही १६६ कॉलम असलेला फॉरमॅट शासनाने उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये संबंधित शेतकºयाची माहिती बँका भरत आहेत. संबंधित शेतकºयाने भरलेला अर्ज व बँकांनी भरलेला फॉरमॅट या दोघांचेही आॅडीट केले जाणार आहे. त्यानंतर सदर शेतकºयाचे नाव पुन्हा तालुकास्तरावरील समितीकडे तपासणीसाठी जाणार आहे. तालुका समितीच्या निर्णयानंतर संबंधित शेतकरी पात्र आहे किंवा नाही, हे ठरविले जाणार आहे. त्यामुळे नेमके किती शेतकरी पात्र ठरणार आहेत, हे अजुनही गुलदस्त्यातच आहे.सहा दिवसांपासून अर्ज भरण्याचे काम ठप्पमागील सहा दिवसांपासून बºयाच केंद्रांवर शेतकºयांच्या आधार कार्डासाठी अंगठ्याचे ठस्से स्वीकारले जात नसल्याने अर्ज भरण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यातच आता शासनाने १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख घोषीत केली आहे. त्यामुळे शेतकºयांची घालमेल वाढली असल्याचे दिसून येत आहे. दिवसभर शेतकरी केंद्रात बसून सायंकाळी निराश होऊन घराकडे परत जात आहे.मृतक शेतकºयांचे अर्ज भरताना अडचणआॅनलाईन अर्ज भरण्यासाठी संबंधित शेतकºयाचा आधार कार्ड व त्याच्या वेरिफिकेशनसाठी त्याचा थम्ब हा महत्त्वाचा घटक आहे. मृतक शेतकºयाचा आधार कार्ड असला तरी त्याचा थम्ब नसल्याने सदर शेतकºयाचा अर्ज भरण्यास अडचण निर्माण होत आहे. याबाबत शासनाने कोणतेही स्पष्ट निर्देश दिले नसल्याने जवळपास दोन हजार मृत शेतकºयांचे अजुनही अर्ज भरण्यात आले नाही.संबंधित शेतकºयावर सोसायटीचे कर्ज असल्यास त्या शेतकºयाचे कर्ज त्याच्या वारसदाराच्या नावाने रूपांतरीत केले जात आहे.