शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

अहेरी तालुक्यातील ३३ गावांना बसणार पुराचा तडाखा

By admin | Updated: June 5, 2016 01:08 IST

तहसीलदार एस. एन. सिलमवार यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक शनिवारी घेण्यात आली.

मान्सूनपूर्व आढावा बैठक : तहसीलदारांनी केल्या सूचनाअहेरी : तहसीलदार एस. एन. सिलमवार यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक शनिवारी घेण्यात आली. या आढावा बैठकीदरम्यान पुराचा तडाखा बसणाऱ्या ३३ गावांवर पावसाळ्याच्या दरम्यान विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश तहसीलदार सिलमवार यांनी दिले आहेत.आढावा बैठकीला संवर्ग विकास अधिकारी सुनील तडस, पोलीस उपनिरीक्षक किरण दिडवाघ, अहेरीचे मुख्याधिकारी सी. एल. किरमे, कृषी अधिकारी वाय. जी. पदा, सिंचाईचे उपअभियंता पी. एम. इंगोले, महिला व बाल विकास अधिकारी आर. डी. मेश्राम, वनपरिक्षेत्राधिकारी स्वप्नील भोवते, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता अजय कोतपल्लीवार, तालुका होमगार्ड समादेशक एस. एल. सिडाम, महावितरणचे अभियंता व्ही. आर. गावंडे, मंडळ अधिकारी रूद्रशेट्टी, शेंडे, श्रीरामे, अनदेलवार, तलाठी जे. जी. जल्लेवार आदी उपस्थित होते.आढावा बैठकीदरम्यान पुराचा तडाखा बसत असलेल्या गावातील नागरिकांना पुराच्या वेळेस सुरक्षित ठिकाणी नेणे, पूर येण्यापूर्वीची सूचना संबंधित गावकऱ्यांना देणे याबाबतचा आढावा तहसीलदारांनी घेतला. पावसाळ्यादरम्यान ग्रामीण व दुर्गम भागात साथीचे रोग पसरतात. त्यामुळे सर्वच आरोग्य केंद्रांमध्ये औषधसाठा असणे अत्यंत गरजेचा आहे. याविषयीची माहिती देण्यात आली. पूर परिस्थितीच्या काळात बिनतारी संदेश यंत्रणा सुसज्ज ठेवणे, रेनगेजचे माहिती मिळविणे, धरणाचे पाणी नदीत सोडल्यास पाण्याच्या पातळीत अचानक वाढ होणे, गावातील नाली साफ करणे, पावसाळ्यात नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे, यासाठी ब्लिचिंग पावडर, तुरटी उपलब्ध करून देणे, वीज पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी विशेष उपाययोजना करणे, प्रत्येक शासकीय कार्यालयातील दूरध्वनी व भ्रमणध्वनी सुरू ठेवणे, शेतकऱ्यांना वेळेवर बी-बियाणे पुरविणे, बससेवा नियमित ठेवणे आदींचा आढावा घेण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्जअहेरी तालुक्यातून प्राणहिता नदी वाहते. त्याचबरोबर लहान-मोठ्या अनेक नदी, नाल्यांना पावसाळ्यादरम्यान पुराचा फटका बसतो. या कालावधीत जीवित व वित्तहानी होऊ नये, यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. यासाठी काही कर्मचाऱ्यांना नेमणूक देण्यात आली आहे. पोलिसांवरही जबाबदारी सोपविली आहे.