शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेतील दुरवस्थेचे ३३ विद्यार्थी बळी

By admin | Updated: October 9, 2015 01:53 IST

आश्रमशाळेच्या परिसरात असलेली अस्वच्छता, पावसाळ्याच्या दिवसात होणारा मलेरिया, डायरिया, डेंग्यू आदी साथीच्या रोगांचा प्रकोप ...

पाच वर्षांतील परिस्थिती : गडचिरोली व अहेरी प्रकल्पात सोयीसुविधा पुरविणे अत्यंत गरजेचेगडचिरोली : आश्रमशाळेच्या परिसरात असलेली अस्वच्छता, पावसाळ्याच्या दिवसात होणारा मलेरिया, डायरिया, डेंग्यू आदी साथीच्या रोगांचा प्रकोप तसेच सर्पदंश यासारख्या अनेक कारणांमुळे मागील पाच वर्षांत गडचिरोली व अहेरी प्रकल्पातील सुमारे ३३ विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही सर्व परिस्थिती आश्रमशाळांमधील दुरवस्थेमुळे निर्माण झाली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना अध्ययनासह भोजनाची व निवासाची व्यवस्था व्हावी. यासाठी शासनाने आदिवासी बहूल भागामध्ये आश्रमशाळा स्थापन केल्या आहेत. गडचिरोली प्रकल्पात २८ शासकीय, १९ अनुदानित अशा एकूण ४७ आश्रमशाळा आहेत. अहेरी प्रकल्पात ११ शासकीय, १४ अनुदानित, भामरागड प्रकल्पात आठ शासकीय, १३ अनुदानित आश्रमशाळा आहेत. तिन्ही प्रकल्पांतर्गत शासकीय व अनुदानित अशा एकूण ९३ आश्रमशाळा चालविल्या जातात. आश्रमशाळांमध्ये शिक्षणासह निवासाची सोय आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या दैनंदिन वस्तूसुध्दा उपलब्ध करून दिल्या जात होत्या. त्यामुळे १० वर्षांच्या पूर्वी आश्रमशाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या पडत होत्या. मात्र कालांतराने शासनाचे व संस्था प्रमुखांचे आश्रमशाळांच्या दर्जाकडे, इमारतीकडे दुर्लक्ष झाले. मागील २० वर्षांपासून इमारतींची दुरूस्ती करण्यात आली नाही. परिणामी खिडक्यांची तावदाने फुटली आहेत. पावसाळ्याच्या दिवसात छतांमधून पावसाचे पाणी गळते. बेड तुटले असल्याने विद्यार्थ्यांना खालीच झोपावे लागते. आश्रमशाळेच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. राहण्याच्या ठिकाणीही स्वच्छता पाळली जात नाही. विद्यार्थ्यांना देण्यात येणारे जेवन अत्यंत निकृष्ठ दर्जाचे राहते. या सर्व बाबींचा शिकार आश्रमशाळेतील विद्यार्थी बनत चालले आहेत. मागील पाच वर्षांत विविध कारणांमुळे सुमारे ३३ विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. गडचिरोली प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळेत २००९-१० या वर्षात तीन, २०११-१२ मध्ये एक, २०१२-१३ मध्ये तीन, २०१३-१४ मध्ये पाच, २०१४-१५ मध्ये दोन, २०१५-१६ मध्ये एक अशा एकूण १५ विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे. अनुदानित आश्रमशाळेतील २०११-१२ मध्ये दोन, २०१४-१५ मध्ये दोन, २०१५-१६ मध्ये दोन, असे एकूण सहा विद्यार्थी मृत्यूमुखी पडले आहेत. अहेरी प्रकल्पातील अनुदानित शासकीयमधील २०१० ते २०१५ या कालावधीत सहा विद्यार्थी तर अनुदानित आश्रमशाळेमधील याच कालावधीत सहा विद्यार्थी असे एकूण १२ विद्यार्थी मृत्यूमुखी पडले असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. (नगर प्रतिनिधी)