शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेतील दुरवस्थेचे ३३ विद्यार्थी बळी

By admin | Updated: October 9, 2015 01:53 IST

आश्रमशाळेच्या परिसरात असलेली अस्वच्छता, पावसाळ्याच्या दिवसात होणारा मलेरिया, डायरिया, डेंग्यू आदी साथीच्या रोगांचा प्रकोप ...

पाच वर्षांतील परिस्थिती : गडचिरोली व अहेरी प्रकल्पात सोयीसुविधा पुरविणे अत्यंत गरजेचेगडचिरोली : आश्रमशाळेच्या परिसरात असलेली अस्वच्छता, पावसाळ्याच्या दिवसात होणारा मलेरिया, डायरिया, डेंग्यू आदी साथीच्या रोगांचा प्रकोप तसेच सर्पदंश यासारख्या अनेक कारणांमुळे मागील पाच वर्षांत गडचिरोली व अहेरी प्रकल्पातील सुमारे ३३ विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही सर्व परिस्थिती आश्रमशाळांमधील दुरवस्थेमुळे निर्माण झाली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना अध्ययनासह भोजनाची व निवासाची व्यवस्था व्हावी. यासाठी शासनाने आदिवासी बहूल भागामध्ये आश्रमशाळा स्थापन केल्या आहेत. गडचिरोली प्रकल्पात २८ शासकीय, १९ अनुदानित अशा एकूण ४७ आश्रमशाळा आहेत. अहेरी प्रकल्पात ११ शासकीय, १४ अनुदानित, भामरागड प्रकल्पात आठ शासकीय, १३ अनुदानित आश्रमशाळा आहेत. तिन्ही प्रकल्पांतर्गत शासकीय व अनुदानित अशा एकूण ९३ आश्रमशाळा चालविल्या जातात. आश्रमशाळांमध्ये शिक्षणासह निवासाची सोय आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या दैनंदिन वस्तूसुध्दा उपलब्ध करून दिल्या जात होत्या. त्यामुळे १० वर्षांच्या पूर्वी आश्रमशाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या पडत होत्या. मात्र कालांतराने शासनाचे व संस्था प्रमुखांचे आश्रमशाळांच्या दर्जाकडे, इमारतीकडे दुर्लक्ष झाले. मागील २० वर्षांपासून इमारतींची दुरूस्ती करण्यात आली नाही. परिणामी खिडक्यांची तावदाने फुटली आहेत. पावसाळ्याच्या दिवसात छतांमधून पावसाचे पाणी गळते. बेड तुटले असल्याने विद्यार्थ्यांना खालीच झोपावे लागते. आश्रमशाळेच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. राहण्याच्या ठिकाणीही स्वच्छता पाळली जात नाही. विद्यार्थ्यांना देण्यात येणारे जेवन अत्यंत निकृष्ठ दर्जाचे राहते. या सर्व बाबींचा शिकार आश्रमशाळेतील विद्यार्थी बनत चालले आहेत. मागील पाच वर्षांत विविध कारणांमुळे सुमारे ३३ विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. गडचिरोली प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळेत २००९-१० या वर्षात तीन, २०११-१२ मध्ये एक, २०१२-१३ मध्ये तीन, २०१३-१४ मध्ये पाच, २०१४-१५ मध्ये दोन, २०१५-१६ मध्ये एक अशा एकूण १५ विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे. अनुदानित आश्रमशाळेतील २०११-१२ मध्ये दोन, २०१४-१५ मध्ये दोन, २०१५-१६ मध्ये दोन, असे एकूण सहा विद्यार्थी मृत्यूमुखी पडले आहेत. अहेरी प्रकल्पातील अनुदानित शासकीयमधील २०१० ते २०१५ या कालावधीत सहा विद्यार्थी तर अनुदानित आश्रमशाळेमधील याच कालावधीत सहा विद्यार्थी असे एकूण १२ विद्यार्थी मृत्यूमुखी पडले असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. (नगर प्रतिनिधी)