शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

एका एकरात ३० क्विंटल मिरची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:53 IST

तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. या तालुक्यातील बहुतांश शेतकरी धानपिकासोबतच भाजीपाला पिकाकडे वळले आहे. तालुक्याच्या एकोडी येथील एका शेतकºयाने आपल्या एक एकरच्या शेतात मिरची पिकाची लागवड केली.

ठळक मुद्देएकोडीतील शेतकऱ्याची यशोगाथा : दीड लाखांचे उत्पन्न मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. या तालुक्यातील बहुतांश शेतकरी धानपिकासोबतच भाजीपाला पिकाकडे वळले आहे. तालुक्याच्या एकोडी येथील एका शेतकºयाने आपल्या एक एकरच्या शेतात मिरची पिकाची लागवड केली. त्या मिरच्या आता निघण्यास सुरूवात झाली असून एका एकरातून ३० क्विंटल मिरचीचे उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यातून त्यांना दीड लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे.तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर वैनगंगा नदीशेजारी एकोडी हे खेडेगाव आहे. येथील शेतकरी रवी धोटे यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. धोटे यांना लहानपणापासून शेती कामाची आवड निर्माण झाली. वडीलोपार्जीत शेतजमिनीत दरवर्षी नवनवीन प्रयोग आपल्या कल्पनेतून करण्याचे धाडस ते दाखवितात. यावर्षी धोटे यांनी आपल्या एक एकरात मिरची पिकाची लागवड केली. यासाठी त्यांना ३० हजार रुपयांचा खर्च आला. मिरची पिकाची चांगली देखभाल करून काळजी घेतल्यामुळे जवळपास ३० क्विंटल उत्पादन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. धोटे यांच्या शेतातील मिरची पीक आता तोडणीला आले आहे. ३० क्विंटल मिरची विक्रीतून जवळपास १ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न धोटे यांना मिळणार आहे. दिवसेंदिवस युवा पिढी शेती व्यवसायाकडे पाठ फिरवित आहे. मात्र काही मोजके सुशिक्षित युवा शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण करीत आहे. यामध्ये रवी धोटे हे एक आहेत. शेतकºयांनी धानपिकासोबतच विविध प्रकारच्या भाजीपाला पिकाची शेती केल्यास शेती व्यवसाय फायदेशिर ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी