शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

३ हजार ५६४ हेक्टरचा विमा

By admin | Updated: August 25, 2015 01:39 IST

यावर्षी जिल्ह्यात पावसाअभावी कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अधिकांश शेतकरी

गडचिरोली : यावर्षी जिल्ह्यात पावसाअभावी कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अधिकांश शेतकरी पीक विमा काढतील, अशी अपेक्षा होती. मात्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे केवळ २ हजार १६५ शेतकऱ्यांनी ३ हजार ५६४ हेक्टरचा विमा काढला आहे. यावरून विम्याबाबत शेतकऱ्यांमध्ये अजूनही पाहिजे त्या प्रमाणात कृषी विभागाने जनजागृती केली नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पावसाअभावी किंवा अतिपावसामुळे दुष्काळग्रस्त परिस्थिती उद्भवल्यास शेतकरी अडचणीत येऊ नये, यासाठी शासनाकडून पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरीवर्ग राष्ट्रीयकृत बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे स्वत: जाऊन विमा काढू शकतो. त्याचबरोबर कृषी सहाय्यकाकडे विम्याची रक्कम, त्यासाठी आवश्यक असलेल्या सातबारा दिला तरी विमा काढला जातो. यावर्षी शासनाने विम्याचा हप्ता एका एकरासाठी धानपिकासाठी १५४ रूपये, सोयाबीन २५६ व कापूस १ हजार ९१५ रूपये २० पैसे एवढा ठरविला होता. गडचिरोली जिल्ह्यात सुमारे १ लाख ४९ हजार हेक्टरवर धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी अगदी सुरुवातीपासून पाऊस झटके देत आहे. अजूनही बहुतांश शेतकऱ्यांची रोवणी पूर्ण झाली नाही. ज्या शेतकऱ्यांनी रोवणीची कामे आटोपली आहेत, त्यांचेही पीक धोक्यात आले आहे. जिल्हाभरात कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाची राज्यभरातील परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने दोनदा मुदत वाढविली होती. शेवटची मुदत ७ आॅगस्टपर्यंत दिली होती. जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन किमान ५० हजारांहून अधिक हेक्टरचा विमा शेतकरी काढतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र मुदत संपण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे केवळ २ हजार १६५ शेतकऱ्यांनी ३ हजार ६६४ हेक्टरचा विमा काढला आहे. यावरून अपेक्षेपेक्षा कितीतरी कमी पटीने विमा काढण्यात आला असल्याचे दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी)कर्जदारांना सक्तीचे धोरण४जे कर्जदार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पीक कर्ज घेतात, अशा शेतकऱ्यांना विमा काढणे राज्यभरातील काही मध्यवर्ती सहकारी बँकांनी सक्तीचे केले आहे. त्या जिल्ह्यात विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विमा काढणे ऐच्छिक ठेवले आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी स्वत:हून विमा काढण्यास तयार नाही. बोटावर मोजण्याइतके जागरूक शेतकरी विमा काढत असल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जदारांना पीक विमा काढणे सक्तीचे केल्यास पीक विमा काढणाऱ्यांची संख्या वाढू शकते. मात्र यास शेतकऱ्यांचा विरोध होण्याची शक्यता बँकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर बहुतांश शेतकरी सदर रक्कम पीक कर्जासोबत भरण्यास तयार होत नाही. त्यामुळे बँक अडचणीत येण्याची शक्यता सुद्धा बँकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. लाभ मिळत नसल्याचा परिणाम४आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. मात्र विमा कंपनी दुष्काळाची परिस्थिती उद्भवूनही मदत देण्यास तयार होत नाही. त्यामुळे दरवर्षी भरल्या जाणाऱ्या विम्याच्या हप्त्याची रक्कम विमा कंपनीला दान होते. त्याचबरोबर विमा योजना शेतकऱ्यांच्या लाभाची विमा कंपनीचा फायदा करून देण्यासाठी शासनाने सदर योजना समोर आणली असल्याचे काही शेतकऱ्यांकडून टीका होत आहे. दरवर्षीच्या अनुभवावरून यावर्षीही दुष्काळ पडला तरी मदत मिळणार नाही, असा समज शेतकऱ्यांचा झाला असल्याने शेतकरीवर्ग विमा काढण्यास तयार होत नाही.शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीचा अभाव४पीक विमा योजनेची जनजागृती करण्याची जबाबदारी कृषी विभागावर सोपविण्यात आली आहे. एका कृषी सहाय्यकाकडे १५ ते २० गावांचा प्रभार सोपविण्यात आला आहे. त्याचबरोबर इतर प्रशासकीय कामे असल्याने कृषी सहाय्यक किमान एक महिन्याशिवाय एका गावात पोहोचत नाही. तो ज्यावेळी गावात पोहोचतो त्यावेळी गावात शेतकरी राहत नाही. त्यामुळे पीक विमा योजना अत्यंत चांगली असली तरी या योजनेची माहिती शेतकऱ्यांना नाही. प्रत्यक्ष बँकेत जाऊन शेतकरी विमा काढू शकतो. त्याचबरोबर कृषी सहाय्यकाकडे विम्याची रक्कम देऊन विमा काढता येणे शक्य आहे. मात्र जनजागृतीअभावी विमा काढला जात नाही.