शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
2
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
3
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
4
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
5
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
6
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
7
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
8
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
9
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
10
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
11
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
12
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
13
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
14
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
15
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
16
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
17
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
18
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
19
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
20
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
Daily Top 2Weekly Top 5

२८२ गावांत धान्य धाडण्याचे काम वेगात

By admin | Updated: May 30, 2014 23:41 IST

पावसाळ्यात दरवर्षी अतवृष्टी होऊन जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटून जनजीवन विस्कळीत होत असते. जिल्ह्यात नदी व नाल्यांची संख्या लक्षात घेता दुर्गम भागातील नागरिकांना आपत्तीचा सामना करावा लागू नये,

दुर्गम तालुके : पावसाळ्यात अनेक गावांचा तुटतो संपर्कदिलीप दहेलकर - गडचिरोलीपावसाळ्यात दरवर्षी अतवृष्टी होऊन जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटून जनजीवन विस्कळीत होत असते. जिल्ह्यात नदी व नाल्यांची संख्या लक्षात घेता दुर्गम भागातील नागरिकांना आपत्तीचा सामना करावा लागू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने आतापासूनच नियोजन केले आहे. पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण   संपर्क तुटणार्‍या दुर्गम तालुक्यातील २८२ गावांना नवसंजीवन योजनेंतर्गत चार महिन्याचे धान्य पोहोचविण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे.पावसाळ्याच्या दिवसात अतवृष्टी होऊन पूरपरिस्थिती निर्माण होते. परिणामी अनेक गावांचे रस्ते बंद होऊन तेथील नागरिकांचा संपर्क तुटतो. गतवर्षी चारदा अतवृष्टी होऊन पूर परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान जिल्ह्यातील दुर्गम तालुक्यातील शेकडो गावांचा अनेक दिवस संपर्क तुटला होता. परिणामी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अतवृष्टी व पूरपरिस्थितीदरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून नवसंजीवन योजनेची अंमलबजावणी केल्या जात आहे. अतवृष्टी होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने जिल्ह्यातील ६ अतिदुर्गम तालुके प्रभावित होत असतात. यात धानोरा, मुलचेरा, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा व अहेरी आदींचा समावेश आहे. या तालुक्यातील एकूण २८२ गावांचा नवसंजीवन योजनेत समावेश आहे. या गावातील नागरिकांना १२३ स्वस्त धान्य दुकानातून जून, जुलै, ऑगस्ट या चार महिन्याच्या कालावधीचे धान्य पोहोचविले जात आहे. नवसंजीवन योजनेंतर्गत धानोरा तालुक्यातील १४, मुलचेरा ३, अहेरी ८९, सिरोंचा ४३, एटापल्ली ७0 व भामरागड तालुक्यातील ६३ अशा एकूण २८२ गावातील एपीएल, बीपीएल, अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना एकूण १९ हजार ९६६ क्विंटल धान्य लागणार आहे.  धान्य पुरविण्याच्या कामाला वेग आला असून आतापर्यंत ७५ टक्के गावांना धान्य पोहोचले असल्याची माहिती आहे. उर्वरित गावांमध्ये ३१ मेपर्यंत चार महिन्याच्या कालावधीचे धान्य पोहोचणार असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून मिळाली आहे. संपर्क तुटणार्‍या गावातील नागरिक स्वत धान्य दुकानातून धान्याची उचल करीत आहेत.