शहरं
Join us  
Trending Stories
1
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
2
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
3
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
4
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
5
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग्ज बदलून राहा सेफ
6
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
7
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
8
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
9
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
10
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
11
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
12
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
13
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
14
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
15
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
16
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
17
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
18
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
19
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
20
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

२६९ गावांना धान्य पुरवठा

By admin | Updated: June 6, 2017 00:53 IST

जिल्ह्याच्या दुर्गम गावात रस्ते व पुलांचा अभाव असल्याने पावसाळ्यात चार महिने या गावांचा संपर्क तुटतो.

पुरवठा विभागाचे नियोजन : पावसाळ्यात चार महिन्यांसाठी सोयलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम गावात रस्ते व पुलांचा अभाव असल्याने पावसाळ्यात चार महिने या गावांचा संपर्क तुटतो. या गावात अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी शासनाने सुरुवात केली असून पावसाळ्यातील चार महिन्याचा धान्यसाठा पोहोचविला जात आहे. २०१७-२०१८ करिता नवसंजीवन योजनेत येत असलेल्या जिल्ह्यातील धानोरा, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या सहा तालुक्यातील पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या २६९ गावांना १४३ रास्तभाव दुकानामार्फत जून ते सप्टेंबर २०१७ या चार महिन्यांचे अन्नधान्य शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य पुरवठा करण्यात येणार आहे. जून २०१७ च्या वितरणाकरिता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील पात्र लाभार्थ्यांना तांदूळ व गव्हाचे नियतन मंजूर करण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना (केवळ बीपीएल व अंत्योदय) जून २०१७ करिता साखरेचे मासिक नियतन मंजूर करण्यात आलेले आहे. नव संजीवन योजना लागू असलेले तालुके वगळता गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा व कोरची या तालुक्यांना तसेच नव संजीवन योजना लागू असलेल्या धानोरा, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा व भामरागड या तालुक्यातील नव संजीवन योजना लागू नसलेल्या गावामधील (२६९ गावे) प्राधान्य कुटुंब लाभार्थी, अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी व पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना (लाभार्थ्यांना) गोदामातील उपलब्धतेनुसार जून २०१७ करिता प्राधान्य कुटुंब लाभार्थी, अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी व पिवळ्या शिधापत्रिकांना वाटप परिमाण निर्धारित करण्यात येत आहे. त्याप्रमाणे अन्नधान्य व साखरेचे वितरण शिधापत्रिकाधारकांना करण्यात यावे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आवाहन केले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच प्रशानाच्या वतीने हालचाली सुरू करण्यात आले आहेत.दुर्गम गावात दैनंदिन गरजेच्या वस्तूंचीही साठवणूकदुर्गम गावात रस्ते व पुलाचा अभाव असल्याने पावसाळ्यात दळणवळणाच्या सोयी उपलब्ध नसतात. जवळपास चार महिने संपर्क तुटलेला असतो. त्यामुळे या भागातील नागरिक पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दैनंदिन गरजेच्या वस्तूंची साठवणूक करतात. तालुका अथवा केंद्रातील गावातून चार महिने पुरेल एवढी वस्तू खरेदी करतात.