शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

२६९ गावांना धान्य पुरवठा

By admin | Updated: June 6, 2017 00:53 IST

जिल्ह्याच्या दुर्गम गावात रस्ते व पुलांचा अभाव असल्याने पावसाळ्यात चार महिने या गावांचा संपर्क तुटतो.

पुरवठा विभागाचे नियोजन : पावसाळ्यात चार महिन्यांसाठी सोयलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम गावात रस्ते व पुलांचा अभाव असल्याने पावसाळ्यात चार महिने या गावांचा संपर्क तुटतो. या गावात अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी शासनाने सुरुवात केली असून पावसाळ्यातील चार महिन्याचा धान्यसाठा पोहोचविला जात आहे. २०१७-२०१८ करिता नवसंजीवन योजनेत येत असलेल्या जिल्ह्यातील धानोरा, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या सहा तालुक्यातील पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या २६९ गावांना १४३ रास्तभाव दुकानामार्फत जून ते सप्टेंबर २०१७ या चार महिन्यांचे अन्नधान्य शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य पुरवठा करण्यात येणार आहे. जून २०१७ च्या वितरणाकरिता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील पात्र लाभार्थ्यांना तांदूळ व गव्हाचे नियतन मंजूर करण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना (केवळ बीपीएल व अंत्योदय) जून २०१७ करिता साखरेचे मासिक नियतन मंजूर करण्यात आलेले आहे. नव संजीवन योजना लागू असलेले तालुके वगळता गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा व कोरची या तालुक्यांना तसेच नव संजीवन योजना लागू असलेल्या धानोरा, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा व भामरागड या तालुक्यातील नव संजीवन योजना लागू नसलेल्या गावामधील (२६९ गावे) प्राधान्य कुटुंब लाभार्थी, अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी व पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना (लाभार्थ्यांना) गोदामातील उपलब्धतेनुसार जून २०१७ करिता प्राधान्य कुटुंब लाभार्थी, अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी व पिवळ्या शिधापत्रिकांना वाटप परिमाण निर्धारित करण्यात येत आहे. त्याप्रमाणे अन्नधान्य व साखरेचे वितरण शिधापत्रिकाधारकांना करण्यात यावे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आवाहन केले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच प्रशानाच्या वतीने हालचाली सुरू करण्यात आले आहेत.दुर्गम गावात दैनंदिन गरजेच्या वस्तूंचीही साठवणूकदुर्गम गावात रस्ते व पुलाचा अभाव असल्याने पावसाळ्यात दळणवळणाच्या सोयी उपलब्ध नसतात. जवळपास चार महिने संपर्क तुटलेला असतो. त्यामुळे या भागातील नागरिक पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दैनंदिन गरजेच्या वस्तूंची साठवणूक करतात. तालुका अथवा केंद्रातील गावातून चार महिने पुरेल एवढी वस्तू खरेदी करतात.