शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
2
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
3
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
4
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
5
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
6
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
7
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
8
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
9
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
10
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
11
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
12
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
13
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
14
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
15
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
16
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
17
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
18
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
19
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
20
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 

२५% विद्यार्थी अप्रगत

By admin | Updated: February 7, 2016 01:57 IST

विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागामार्फत इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या भाषा व गणित या विषयांची आॅक्टोबर महिन्यात चाचणी घेण्यात आली होती.

वर्ग २ व ८ ची चाचणी : ९० हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षादिगांबर जवादे गडचिरोलीविद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागामार्फत इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या भाषा व गणित या विषयांची आॅक्टोबर महिन्यात चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील २४.८३ टक्के विद्यार्थी भाषा विषयात व २४.३५ टक्के विद्यार्थी गणित या विषयात अप्रगत असल्याचे आढळून आले असून या विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग घेण्यात यावेत, असे निर्देश शिक्षण विभागाने सर्वच शाळांना दिले आहेत.जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुमार असल्याने अनेक पालकवर्ग या शाळांमध्ये आपला पाल्य दाखल करण्यास तयार होत नाही. त्यामुळे या शाळांची विद्यार्थी संख्या घटत चालली आहे. शिक्षणावर शासन कोट्यवधींचा खर्च करीत असला तरी विद्यार्थ्यांची प्रगती मात्र समाधानकारक नसल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती नेमकी किती झाली आहे, हे जाणून घेण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागाने दुसरी ते आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांची चाचणी घेतली होती. शिक्षण विभागाकडे मुलचेरा तालुका वगळता उपलब्ध असलेल्या माहितीनुसार या चाचणीला जिल्हाभरातून ९० हजार विद्यार्थी चाचणीला बसले होते. त्यापैकी भाषा विषयात ६७ हजार ७५९ विद्यार्थी प्रगत व २२ हजार ३६३ विद्यार्थी अप्रगत आढळून आले आहेत. याची टक्केवारी २४.८३ एवढी आहे. गणित विषयात ७३ हजार ४५२ विद्यार्थी प्रगत आढळून आले असून २१ हजार ९३४ विद्यार्थी अप्रगत आहेत. याचाच अर्थ जिल्हाभरातील २५ टक्के विद्यार्थी अजूनही मागे आहेत. हा आकडा शिक्षण विभागाचा आहे. प्रत्यक्षात मात्र यापेक्षा जास्त विद्यार्थी अप्रगत असण्याची शक्यता आहे.तीन महिने उलटूनही मुलचेराचा अहवाल अप्राप्तविद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबतची चाचणी आॅक्टोबर महिन्यात घेण्यात आली होती. सुरूवातीला याबाबतचा अहवाल शासनाने आॅनलाईन पध्दतीने मागितला होता. मात्र काही पंचायत समितींनी हा अहवालच सादर केला नसल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हास्तरावर लेखी अहवाल सादर करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने १५ दिवसांपूर्वी दिले. जिल्ह्यातील सर्वच पंचायत समितींनी चाचणीचा अहवाल सादर केला आहे. मात्र मुलचेरा पंचायत समितीने अजूनही सदर अहवाल सादर केला नसल्याने शिक्षण विभागातील सावळा गोंधळ यामुळे पुढे आला आहे. या एका पंचायत समितीचा अहवाल प्राप्त न झाल्याने बाराही पंचायत समितीचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यास अडचण जात आहे. विशेष वर्गांचे आयोजनजे विद्यार्थी अप्रगत आढळून आले आहेत. अशा विद्यार्थ्यांवर शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी विशेष लक्ष ठेवून आहेत. या विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी शिक्षकांनी विशेष वर्ग घ्यावेत व कोणत्याही परिस्थितीत या विद्यार्थ्यांना प्रगत करण्यात यावेत. अन्यथा यासाठी संबंधित शिक्षकाला जबाबदार धरले जाणार आहे. त्यामुळे शिक्षकही कामाला लागले आहेत. या विद्यार्थ्यांची पुन्हा चाचणी घेतली जाणार आहे.