शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

२५% विद्यार्थी अप्रगत

By admin | Updated: February 7, 2016 01:57 IST

विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागामार्फत इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या भाषा व गणित या विषयांची आॅक्टोबर महिन्यात चाचणी घेण्यात आली होती.

वर्ग २ व ८ ची चाचणी : ९० हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षादिगांबर जवादे गडचिरोलीविद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागामार्फत इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या भाषा व गणित या विषयांची आॅक्टोबर महिन्यात चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील २४.८३ टक्के विद्यार्थी भाषा विषयात व २४.३५ टक्के विद्यार्थी गणित या विषयात अप्रगत असल्याचे आढळून आले असून या विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग घेण्यात यावेत, असे निर्देश शिक्षण विभागाने सर्वच शाळांना दिले आहेत.जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुमार असल्याने अनेक पालकवर्ग या शाळांमध्ये आपला पाल्य दाखल करण्यास तयार होत नाही. त्यामुळे या शाळांची विद्यार्थी संख्या घटत चालली आहे. शिक्षणावर शासन कोट्यवधींचा खर्च करीत असला तरी विद्यार्थ्यांची प्रगती मात्र समाधानकारक नसल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती नेमकी किती झाली आहे, हे जाणून घेण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागाने दुसरी ते आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांची चाचणी घेतली होती. शिक्षण विभागाकडे मुलचेरा तालुका वगळता उपलब्ध असलेल्या माहितीनुसार या चाचणीला जिल्हाभरातून ९० हजार विद्यार्थी चाचणीला बसले होते. त्यापैकी भाषा विषयात ६७ हजार ७५९ विद्यार्थी प्रगत व २२ हजार ३६३ विद्यार्थी अप्रगत आढळून आले आहेत. याची टक्केवारी २४.८३ एवढी आहे. गणित विषयात ७३ हजार ४५२ विद्यार्थी प्रगत आढळून आले असून २१ हजार ९३४ विद्यार्थी अप्रगत आहेत. याचाच अर्थ जिल्हाभरातील २५ टक्के विद्यार्थी अजूनही मागे आहेत. हा आकडा शिक्षण विभागाचा आहे. प्रत्यक्षात मात्र यापेक्षा जास्त विद्यार्थी अप्रगत असण्याची शक्यता आहे.तीन महिने उलटूनही मुलचेराचा अहवाल अप्राप्तविद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबतची चाचणी आॅक्टोबर महिन्यात घेण्यात आली होती. सुरूवातीला याबाबतचा अहवाल शासनाने आॅनलाईन पध्दतीने मागितला होता. मात्र काही पंचायत समितींनी हा अहवालच सादर केला नसल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हास्तरावर लेखी अहवाल सादर करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने १५ दिवसांपूर्वी दिले. जिल्ह्यातील सर्वच पंचायत समितींनी चाचणीचा अहवाल सादर केला आहे. मात्र मुलचेरा पंचायत समितीने अजूनही सदर अहवाल सादर केला नसल्याने शिक्षण विभागातील सावळा गोंधळ यामुळे पुढे आला आहे. या एका पंचायत समितीचा अहवाल प्राप्त न झाल्याने बाराही पंचायत समितीचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यास अडचण जात आहे. विशेष वर्गांचे आयोजनजे विद्यार्थी अप्रगत आढळून आले आहेत. अशा विद्यार्थ्यांवर शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी विशेष लक्ष ठेवून आहेत. या विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी शिक्षकांनी विशेष वर्ग घ्यावेत व कोणत्याही परिस्थितीत या विद्यार्थ्यांना प्रगत करण्यात यावेत. अन्यथा यासाठी संबंधित शिक्षकाला जबाबदार धरले जाणार आहे. त्यामुळे शिक्षकही कामाला लागले आहेत. या विद्यार्थ्यांची पुन्हा चाचणी घेतली जाणार आहे.