शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

कृषीपंपधारकांकडे २४ कोटींचे बिल थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:13 IST

जिल्हाभरातील १८ हजार ६९८ कृषीपंपधारक शेतकऱ्यांकडे सुमारे २४ कोटी ३६ लाख रूपयांचे वीज बिल थकीत आहे. थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी महावितरणने धडक मोहीम हाती घेतली आहे.

ठळक मुद्देमहावितरण अडचणीत : १८ हजार ६९८ ग्राहक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाभरातील १८ हजार ६९८ कृषीपंपधारक शेतकऱ्यांकडे सुमारे २४ कोटी ३६ लाख रूपयांचे वीज बिल थकीत आहे. थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी महावितरणने धडक मोहीम हाती घेतली आहे.गडचिरोली जिल्ह्यात मोठा सिंचन प्रकल्प नसल्याने विहीर, नदी,नाले यावर पाणीपंप बसवून त्याच्या मदतीने शेतीला सिंचन केले जात आहे. शासन १०० टक्के अनुदानावर विहीर खोदून देत आहे. विविध योजनांचा लाभ घेत शेतकरी आपल्या शेतात विहीर खोदत आहेत. त्याचबरोबर काही शेतकरी स्वत:च्या पैशाने शेतात बोअरवेल खोदत आहेत. यातील पाणी बाहेर काढण्यासाठी पाणी पंपाची गरज भासते. यापूर्वी बहुतांश शेतकरी डिझेल इंजीनचा वापर पाणी काढण्यासाठी करीत होते. मात्र डिझेलचे भाव वाढले आहेत. त्याचबरोबर डिझेल इंजिनच्या देखभालीवर बराच खर्च होतो. हा खर्च परवडणारा नसल्याने शेतकरी आता विजेवर चालणारे पाणीपंप लावण्याकडे प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कृषीपंपांची संख्या वाढत चालली आहे. जिल्हाभरात एकूण १८ हजार ६९८ कृषीपंपधारक आहेत. यामध्ये आलापल्ली विभागात ७ हजार ८५२ तर गडचिरोली विभागात १० हजार ८४६ कृषीपंपधारक आहेत. कृषी पंपाच्या विज बिलाची वसुली न होणे हा महावितरण समोरील गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे दिवसेंदिवस कृषीपंपांच्या थकीत वीज बिलाचा आखडा वाढतच चालला आहे. शेतकºयांनी वीज बिल भरावे यासाठी शासनाने वीज बिलात सवलत देणाºया अनेक योजना सुरू केल्या मात्र शेतकºयांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. आलापल्ली विभागातील शेतकºयांकडे १२ कोटी ६५ लाख तर गडचिरोली विभागातील शेतकºयांकडे ११ कोटी ७१ लाख रूपये थकले आहेत. महावीतरण वीज बिलाच्या वसुलीबाबत अतीशय संवेदनशील आहे. सामान्य ग्राहकाचे दोन महिन्याचे वीज बिल थकले तरी त्याला वीज पुरवठा खंडीत केला जातो. या कारवाईमुळे सामान्य ग्राहकांकडे कमी प्रमाणात विज बिल थकले आहे. शेतकरी विविध कारणांमुळे दरवर्षी आर्थिक अडचणीत सापडत असल्याने महावितरण शेतकºयांवर वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई एकाकी करीत नाही. मात्र शेतकºयांनी वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या अधिकाºयांकडून केले जात आहे.वसुलीची धडक मोहीमएकूण वीज उत्पादनाच्या जवळपास २५ टक्के वीज कृषीपंपांसाठी वापरली जाते. त्यामानाने वसुलीचे प्रमाण अतीशय कमी आहे. थकलेल्या वील बिलामुळे महावितरणच्या आर्थिक अडचणी वाढत चालल्या आहेत. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आता वसुलीवर विशेष भर देण्यास सुरूवात केली आहे. चंद्रपूर परिमंडळांतर्गत येणाºया चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांकडे १८ कोटी ५१ लाख, वाणिज्यीक ग्राहकांकडे ६ कोटी ९ लाख, औद्योगिक ग्राहकांकडे ६४ लाख ४० हजार, ग्रामीण व शहरी पाणी पुरवठा योजनांकडे ९७ लाख, ग्रामीण व शहरी पथदिवे यांच्याकडे सुमारे २२५ कोटी रूपयांचे वीज बिल थकले आहे. थकलेल्या वीज बिलांमुळे महावितरणची आर्थिक स्थिती अतिशय नाजुक झाली असल्याने वीज बिल वसुलीचे सक्त निर्देश महावितरणच्या अधिकाºयांना देण्यात आले आहेत. डिसेंबर, जानेवारी महिन्यात वीज बिल वसुलीची विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.

टॅग्स :Waterपाणीagricultureशेती