शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कृषीपंपधारकांकडे २४ कोटींचे बिल थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:13 IST

जिल्हाभरातील १८ हजार ६९८ कृषीपंपधारक शेतकऱ्यांकडे सुमारे २४ कोटी ३६ लाख रूपयांचे वीज बिल थकीत आहे. थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी महावितरणने धडक मोहीम हाती घेतली आहे.

ठळक मुद्देमहावितरण अडचणीत : १८ हजार ६९८ ग्राहक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाभरातील १८ हजार ६९८ कृषीपंपधारक शेतकऱ्यांकडे सुमारे २४ कोटी ३६ लाख रूपयांचे वीज बिल थकीत आहे. थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी महावितरणने धडक मोहीम हाती घेतली आहे.गडचिरोली जिल्ह्यात मोठा सिंचन प्रकल्प नसल्याने विहीर, नदी,नाले यावर पाणीपंप बसवून त्याच्या मदतीने शेतीला सिंचन केले जात आहे. शासन १०० टक्के अनुदानावर विहीर खोदून देत आहे. विविध योजनांचा लाभ घेत शेतकरी आपल्या शेतात विहीर खोदत आहेत. त्याचबरोबर काही शेतकरी स्वत:च्या पैशाने शेतात बोअरवेल खोदत आहेत. यातील पाणी बाहेर काढण्यासाठी पाणी पंपाची गरज भासते. यापूर्वी बहुतांश शेतकरी डिझेल इंजीनचा वापर पाणी काढण्यासाठी करीत होते. मात्र डिझेलचे भाव वाढले आहेत. त्याचबरोबर डिझेल इंजिनच्या देखभालीवर बराच खर्च होतो. हा खर्च परवडणारा नसल्याने शेतकरी आता विजेवर चालणारे पाणीपंप लावण्याकडे प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कृषीपंपांची संख्या वाढत चालली आहे. जिल्हाभरात एकूण १८ हजार ६९८ कृषीपंपधारक आहेत. यामध्ये आलापल्ली विभागात ७ हजार ८५२ तर गडचिरोली विभागात १० हजार ८४६ कृषीपंपधारक आहेत. कृषी पंपाच्या विज बिलाची वसुली न होणे हा महावितरण समोरील गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे दिवसेंदिवस कृषीपंपांच्या थकीत वीज बिलाचा आखडा वाढतच चालला आहे. शेतकºयांनी वीज बिल भरावे यासाठी शासनाने वीज बिलात सवलत देणाºया अनेक योजना सुरू केल्या मात्र शेतकºयांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. आलापल्ली विभागातील शेतकºयांकडे १२ कोटी ६५ लाख तर गडचिरोली विभागातील शेतकºयांकडे ११ कोटी ७१ लाख रूपये थकले आहेत. महावीतरण वीज बिलाच्या वसुलीबाबत अतीशय संवेदनशील आहे. सामान्य ग्राहकाचे दोन महिन्याचे वीज बिल थकले तरी त्याला वीज पुरवठा खंडीत केला जातो. या कारवाईमुळे सामान्य ग्राहकांकडे कमी प्रमाणात विज बिल थकले आहे. शेतकरी विविध कारणांमुळे दरवर्षी आर्थिक अडचणीत सापडत असल्याने महावितरण शेतकºयांवर वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई एकाकी करीत नाही. मात्र शेतकºयांनी वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या अधिकाºयांकडून केले जात आहे.वसुलीची धडक मोहीमएकूण वीज उत्पादनाच्या जवळपास २५ टक्के वीज कृषीपंपांसाठी वापरली जाते. त्यामानाने वसुलीचे प्रमाण अतीशय कमी आहे. थकलेल्या वील बिलामुळे महावितरणच्या आर्थिक अडचणी वाढत चालल्या आहेत. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आता वसुलीवर विशेष भर देण्यास सुरूवात केली आहे. चंद्रपूर परिमंडळांतर्गत येणाºया चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांकडे १८ कोटी ५१ लाख, वाणिज्यीक ग्राहकांकडे ६ कोटी ९ लाख, औद्योगिक ग्राहकांकडे ६४ लाख ४० हजार, ग्रामीण व शहरी पाणी पुरवठा योजनांकडे ९७ लाख, ग्रामीण व शहरी पथदिवे यांच्याकडे सुमारे २२५ कोटी रूपयांचे वीज बिल थकले आहे. थकलेल्या वीज बिलांमुळे महावितरणची आर्थिक स्थिती अतिशय नाजुक झाली असल्याने वीज बिल वसुलीचे सक्त निर्देश महावितरणच्या अधिकाºयांना देण्यात आले आहेत. डिसेंबर, जानेवारी महिन्यात वीज बिल वसुलीची विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.

टॅग्स :Waterपाणीagricultureशेती