शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
4
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
5
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
6
Video: खऱ्याखुऱ्या पोलिस काकांना पहिल्यांदाच पाहून चिमुकली भलतीच खुश, म्हणाली 'हाय फाईव्ह...'
7
कियारा अडवाणीसाठी आणण्यात आला स्पेशल केक, लेकीसोबत साजरा केला वाढदिवस; म्हणाली...
8
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
9
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
10
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
11
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
12
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
13
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
14
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
15
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
16
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
17
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
18
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
19
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

कृषीपंपधारकांकडे २४ कोटींचे बिल थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:13 IST

जिल्हाभरातील १८ हजार ६९८ कृषीपंपधारक शेतकऱ्यांकडे सुमारे २४ कोटी ३६ लाख रूपयांचे वीज बिल थकीत आहे. थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी महावितरणने धडक मोहीम हाती घेतली आहे.

ठळक मुद्देमहावितरण अडचणीत : १८ हजार ६९८ ग्राहक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाभरातील १८ हजार ६९८ कृषीपंपधारक शेतकऱ्यांकडे सुमारे २४ कोटी ३६ लाख रूपयांचे वीज बिल थकीत आहे. थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी महावितरणने धडक मोहीम हाती घेतली आहे.गडचिरोली जिल्ह्यात मोठा सिंचन प्रकल्प नसल्याने विहीर, नदी,नाले यावर पाणीपंप बसवून त्याच्या मदतीने शेतीला सिंचन केले जात आहे. शासन १०० टक्के अनुदानावर विहीर खोदून देत आहे. विविध योजनांचा लाभ घेत शेतकरी आपल्या शेतात विहीर खोदत आहेत. त्याचबरोबर काही शेतकरी स्वत:च्या पैशाने शेतात बोअरवेल खोदत आहेत. यातील पाणी बाहेर काढण्यासाठी पाणी पंपाची गरज भासते. यापूर्वी बहुतांश शेतकरी डिझेल इंजीनचा वापर पाणी काढण्यासाठी करीत होते. मात्र डिझेलचे भाव वाढले आहेत. त्याचबरोबर डिझेल इंजिनच्या देखभालीवर बराच खर्च होतो. हा खर्च परवडणारा नसल्याने शेतकरी आता विजेवर चालणारे पाणीपंप लावण्याकडे प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कृषीपंपांची संख्या वाढत चालली आहे. जिल्हाभरात एकूण १८ हजार ६९८ कृषीपंपधारक आहेत. यामध्ये आलापल्ली विभागात ७ हजार ८५२ तर गडचिरोली विभागात १० हजार ८४६ कृषीपंपधारक आहेत. कृषी पंपाच्या विज बिलाची वसुली न होणे हा महावितरण समोरील गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे दिवसेंदिवस कृषीपंपांच्या थकीत वीज बिलाचा आखडा वाढतच चालला आहे. शेतकºयांनी वीज बिल भरावे यासाठी शासनाने वीज बिलात सवलत देणाºया अनेक योजना सुरू केल्या मात्र शेतकºयांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. आलापल्ली विभागातील शेतकºयांकडे १२ कोटी ६५ लाख तर गडचिरोली विभागातील शेतकºयांकडे ११ कोटी ७१ लाख रूपये थकले आहेत. महावीतरण वीज बिलाच्या वसुलीबाबत अतीशय संवेदनशील आहे. सामान्य ग्राहकाचे दोन महिन्याचे वीज बिल थकले तरी त्याला वीज पुरवठा खंडीत केला जातो. या कारवाईमुळे सामान्य ग्राहकांकडे कमी प्रमाणात विज बिल थकले आहे. शेतकरी विविध कारणांमुळे दरवर्षी आर्थिक अडचणीत सापडत असल्याने महावितरण शेतकºयांवर वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई एकाकी करीत नाही. मात्र शेतकºयांनी वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या अधिकाºयांकडून केले जात आहे.वसुलीची धडक मोहीमएकूण वीज उत्पादनाच्या जवळपास २५ टक्के वीज कृषीपंपांसाठी वापरली जाते. त्यामानाने वसुलीचे प्रमाण अतीशय कमी आहे. थकलेल्या वील बिलामुळे महावितरणच्या आर्थिक अडचणी वाढत चालल्या आहेत. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आता वसुलीवर विशेष भर देण्यास सुरूवात केली आहे. चंद्रपूर परिमंडळांतर्गत येणाºया चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांकडे १८ कोटी ५१ लाख, वाणिज्यीक ग्राहकांकडे ६ कोटी ९ लाख, औद्योगिक ग्राहकांकडे ६४ लाख ४० हजार, ग्रामीण व शहरी पाणी पुरवठा योजनांकडे ९७ लाख, ग्रामीण व शहरी पथदिवे यांच्याकडे सुमारे २२५ कोटी रूपयांचे वीज बिल थकले आहे. थकलेल्या वीज बिलांमुळे महावितरणची आर्थिक स्थिती अतिशय नाजुक झाली असल्याने वीज बिल वसुलीचे सक्त निर्देश महावितरणच्या अधिकाºयांना देण्यात आले आहेत. डिसेंबर, जानेवारी महिन्यात वीज बिल वसुलीची विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.

टॅग्स :Waterपाणीagricultureशेती