शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
2
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
3
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
4
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!
5
थेट मंत्र्यांच्या ताफ्यालाच पाठलाग करून अडवले, वादावादी, कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न, कारण काय?
6
Powai Hostage: रोहित आर्या प्रकरणातील नवी माहिती, मुलांसोबत ऑडिशनसाठी गेलेले पालक म्हणाले...
7
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी
8
Rohit Arya: रोहित आर्याला मी वेगळे पैसे दिलेले, सरकारी बिलाशी संबंध नाही; दीपक केसरकरांची सारवासारव
9
प्रेयसीचा शो पाहण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे सरकारी विमान वापरलं; काश पटेल वादाच्या भोवऱ्यात
10
कंडोम बनवणाऱ्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; 2 महिन्यातच दिला बंपर परतावा!
11
तेलंगणामध्ये मोंथा वादळाचा कहर, १२ जणांचा मृत्यू; मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी, रस्तेही बंद
12
कोणता झेंडा घेऊ हाती अशी मनसैनिकांची अवस्था, राज ठाकरे कन्फ्यूज नेते; शिंदेसेनेची बोचरी टीका
13
Lenskart IPO: महागडा आहे का लेन्सकार्टचा आयपीओ? व्हॅल्यूएशनवरुन उपस्थित होताहेत प्रश्न, एक्सपर्ट म्हणाले...
14
अँड्रॉइड की अ‍ॅपल, मोबाईल घोटाळे रोखण्यात कोणती सिस्टीम चांगली? गुगलने केला धक्कादायक खुलासा
15
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
16
सौदी अरेबिया फिफा विश्वचषकासाठी बांधणार 'स्काय स्टेडियम'; व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा?
17
संजय राऊत दोन महिने राहणार सार्वजनिक जीवनापासून दूर, समोर आलं चिंताजनक कारण, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली
18
IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत
19
Viral Video : व्वा! काय आयडिया आहे... मित्र फिरायला गेले अन् बिझनेस सुरू करून आले! होतंय कौतुक

२३ हजार क्विंटल धान केंद्र परिसरात उघड्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 23:16 IST

आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या वतीने गडचिरोली प्रादेशिक कार्यालयासह अहेरी उपविभागात एकूण ३५ केंद्रावरून धान खरेदी सुरू आहे.

ठळक मुद्देअहेरी उपविभागातील वास्तव : गोदाम भरले, मिलर्सकडून उचल करण्यात दिरंगाईने नुकसान होणार

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या वतीने गडचिरोली प्रादेशिक कार्यालयासह अहेरी उपविभागात एकूण ३५ केंद्रावरून धान खरेदी सुरू आहे. मात्र अहेरी उपविभागातील केंद्र परिसरातील गोदाम खरेदी केलेल्या धानाने पूर्णत: भरलेले आहेत. तसेच भरडाईसाठी धानाची उचल करण्यात दिरंगाई होत असल्याने तब्बल २३ हजार ९४४ क्विंटल धान केंद्र परिसरात उघड्यावर आहे. परिणामी यंदाही आदिवासी विकास महामंडळाला लाखोचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.महामंडळाच्या आधारभूत खरेदी योजना हंगाम २०१७-१८ अंतर्गत अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीने अहेरी उपविभागात एकूण ३५ धान खरेदी केंद्रास मंजुरी देण्यात आली असून यापैकी ३४ धान खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष धानाची आवक झाली आहे. अहेरी उपविभागात या कार्यालयाच्या वतीने संस्थांमार्फत आतापर्यंत एकूण जवळपास ९३ हजार ८८७.४८ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. यापैकी ६८१४३.४४ धानाची खरेदी गोदामात तर २५७४४.०४ इतक्या धानाची खरेदी उघड्यावर झालेली आहे. यापैकी आतापर्यंत उघड्यावरून १ हजार ८०० क्विंटल इतक्याच धानाची भरडाईसाठी उचल झाली आहे. ६८१४३.४४ इतका धान गोदामात साठवण्यात आला असून तब्बल २३९४४.०४ क्विंटल धान केंद्राच्या परिसरात उघड्यावर ठेवण्यात आले आहे.अहेरी येथील केंद्रावर २०६७.९० क्विंटल धान उघड्यावर आहे. देचलीपेठा येथील केंद्रावर ३४३४.८० क्विंटल, अमरादी येथील केंद्रावर ७ हजार ७५२ क्विंटल, अंकिसा केंद्रावर २२५४.४० क्विंटल, वडधम केंद्रावर २५५०.०४ क्विंटल, रोमपल्ली येथील केंद्रावर २५०१.६० क्विंटल, तोडसा येथील केंद्रावर ४६० क्विंटल, घोटसूर येथील केंद्रावर ५५२.१० क्विंटल, जारावंडी केंद्रावर २२६४.८० तर हालेवारा केंद्रावर १०६.४० क्विंटल धान केंद्राच्या परिसरात उघड्यावर आहे. या संदर्भातील अहवाल अहेरी कार्यालयाने गडचिरोलीच्या कार्यालयाला सादर केला आहे.पुरेशा गोदाम निर्मितीकडे कानाडोळाआदिवासी विकास महामंडळामार्फत अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीने आविका संस्थांमार्फत दरवर्षी रबी व खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात धान खरेदी अनेक केंद्रांवरून केली जाते. मात्र या केंद्रस्तरावर पुरेशा गोदामाची व्यवस्था नाही. त्यामुळे हजारो क्विंटल धान केंद्राच्या परिसरात उघड्यावर ठेवावा लागतो. परिणामी महामंडळाला दरवर्षी नुकसान सहन करावे लागते. हे नुकसान टाळण्यासाठी आदिवासी विकास महामंडळासह शासनाने नव्याने गोदामाची निर्मिती करणे गरजेचे आहे. मात्र या बाबीकडे कानाडोळा होत आहे.