शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

२३ हजार क्विंटल धान केंद्र परिसरात उघड्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 23:16 IST

आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या वतीने गडचिरोली प्रादेशिक कार्यालयासह अहेरी उपविभागात एकूण ३५ केंद्रावरून धान खरेदी सुरू आहे.

ठळक मुद्देअहेरी उपविभागातील वास्तव : गोदाम भरले, मिलर्सकडून उचल करण्यात दिरंगाईने नुकसान होणार

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या वतीने गडचिरोली प्रादेशिक कार्यालयासह अहेरी उपविभागात एकूण ३५ केंद्रावरून धान खरेदी सुरू आहे. मात्र अहेरी उपविभागातील केंद्र परिसरातील गोदाम खरेदी केलेल्या धानाने पूर्णत: भरलेले आहेत. तसेच भरडाईसाठी धानाची उचल करण्यात दिरंगाई होत असल्याने तब्बल २३ हजार ९४४ क्विंटल धान केंद्र परिसरात उघड्यावर आहे. परिणामी यंदाही आदिवासी विकास महामंडळाला लाखोचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.महामंडळाच्या आधारभूत खरेदी योजना हंगाम २०१७-१८ अंतर्गत अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीने अहेरी उपविभागात एकूण ३५ धान खरेदी केंद्रास मंजुरी देण्यात आली असून यापैकी ३४ धान खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष धानाची आवक झाली आहे. अहेरी उपविभागात या कार्यालयाच्या वतीने संस्थांमार्फत आतापर्यंत एकूण जवळपास ९३ हजार ८८७.४८ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. यापैकी ६८१४३.४४ धानाची खरेदी गोदामात तर २५७४४.०४ इतक्या धानाची खरेदी उघड्यावर झालेली आहे. यापैकी आतापर्यंत उघड्यावरून १ हजार ८०० क्विंटल इतक्याच धानाची भरडाईसाठी उचल झाली आहे. ६८१४३.४४ इतका धान गोदामात साठवण्यात आला असून तब्बल २३९४४.०४ क्विंटल धान केंद्राच्या परिसरात उघड्यावर ठेवण्यात आले आहे.अहेरी येथील केंद्रावर २०६७.९० क्विंटल धान उघड्यावर आहे. देचलीपेठा येथील केंद्रावर ३४३४.८० क्विंटल, अमरादी येथील केंद्रावर ७ हजार ७५२ क्विंटल, अंकिसा केंद्रावर २२५४.४० क्विंटल, वडधम केंद्रावर २५५०.०४ क्विंटल, रोमपल्ली येथील केंद्रावर २५०१.६० क्विंटल, तोडसा येथील केंद्रावर ४६० क्विंटल, घोटसूर येथील केंद्रावर ५५२.१० क्विंटल, जारावंडी केंद्रावर २२६४.८० तर हालेवारा केंद्रावर १०६.४० क्विंटल धान केंद्राच्या परिसरात उघड्यावर आहे. या संदर्भातील अहवाल अहेरी कार्यालयाने गडचिरोलीच्या कार्यालयाला सादर केला आहे.पुरेशा गोदाम निर्मितीकडे कानाडोळाआदिवासी विकास महामंडळामार्फत अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीने आविका संस्थांमार्फत दरवर्षी रबी व खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात धान खरेदी अनेक केंद्रांवरून केली जाते. मात्र या केंद्रस्तरावर पुरेशा गोदामाची व्यवस्था नाही. त्यामुळे हजारो क्विंटल धान केंद्राच्या परिसरात उघड्यावर ठेवावा लागतो. परिणामी महामंडळाला दरवर्षी नुकसान सहन करावे लागते. हे नुकसान टाळण्यासाठी आदिवासी विकास महामंडळासह शासनाने नव्याने गोदामाची निर्मिती करणे गरजेचे आहे. मात्र या बाबीकडे कानाडोळा होत आहे.