शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
2
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
3
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
4
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
5
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
6
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
7
"जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
8
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
9
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
10
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
12
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
13
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
14
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
15
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
16
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
17
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
18
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
19
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
20
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!

रोहयोतून २० लाख मनुष्य दिवस रोजगार

By admin | Updated: October 12, 2015 01:46 IST

जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असून एप्रिल २०१५ ते आजपर्यंत जिल्ह्यातील १ लाख १८ हजार ७१५ नागरिकांना रोजगार मिळाला आहे.

दुष्काळात मागणी वाढली : सहा महिन्यांतील स्थितीगडचिरोली : जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असून एप्रिल २०१५ ते आजपर्यंत जिल्ह्यातील १ लाख १८ हजार ७१५ नागरिकांना रोजगार मिळाला आहे. त्याचबरोबर या कालावधीत सुमारे २० लाख ३४ हजार ३६८ मनुष्य दिवस रोजगार मिळाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकही मोठा उद्योग नाही. त्यामुळे येथील शेतीच्या भरवशावर नागरिकांना काही महिन्याचा रोजगार मिळते. धानाच्या शेतीत जवळपास तीन महिने रबी हंगामात दोन महिने असे एकूण पाच महिने सोडले तर इतर सात महिने रिकामेच राहण्याची पाळी येते. अशा परिस्थितीत बहुतांश मजूर रोहयोच्या कामांना विशेष पसंती देतात. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे धान शेतीही रोजगार देऊ शकली नाही. उलट अनेकांचे शेत पडिक आहेत. त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी सुध्दा रोहयोच्या कामावर जाण्यास पसंती दर्शवित आहेत. त्यामुळे या कामाची मागणी वाढली आहे. काही तालुक्यांमध्ये पावसाळाभर रोहयोची कामे सुरू होती. २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या सुरूवातीपासून बाराही तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत. कामाची मागणी करूनही रोजगार न दिल्यास बेरोजगारी भत्ता द्यावा लागते. त्यामुळे प्रशासनही रोजगाराची मागणी होताच काम उपलब्ध करून देते. बाराही तालुक्यात चालू आर्थिक वर्षात सुमारे १ लाख १८ हजार ७५० नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. २ हजार ५८५ कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार दिला आहे. तर याच कालावधीत सुमारे २० लाख ३४ हजार ३६८ मनुष्य दिवस रोजगाराची निर्मिती झाली आहे. रोजगार हमी योजनेमुळे शेतीवरील कामाचा ताण कमी होऊन बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यास फार मोठी मदत झाली आहे. (नगर प्रतिनिधी)मजुरी विलंबाबात तक्रारी वाढल्यामागील काही महिन्यात रोजगार हमी योजनेच्या कामाची मजुरी तत्काळ मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही गावातील मजुरांना पाच ते सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी मजुरी मिळाली नाही. रोहयोच्या कामावर जाणारे बहुतांश मजूर हातावर आणून पानावर खाणारे राहतात. अशा परिस्थितीत चार महिन्यांपासून मजुरी मिळाली नाही. त्यामुळे सदर कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे. परिणामी रोहयोबाबत मजुरांच्या मनात शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.