शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोतून २० लाख मनुष्य दिवस रोजगार

By admin | Updated: October 12, 2015 01:46 IST

जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असून एप्रिल २०१५ ते आजपर्यंत जिल्ह्यातील १ लाख १८ हजार ७१५ नागरिकांना रोजगार मिळाला आहे.

दुष्काळात मागणी वाढली : सहा महिन्यांतील स्थितीगडचिरोली : जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असून एप्रिल २०१५ ते आजपर्यंत जिल्ह्यातील १ लाख १८ हजार ७१५ नागरिकांना रोजगार मिळाला आहे. त्याचबरोबर या कालावधीत सुमारे २० लाख ३४ हजार ३६८ मनुष्य दिवस रोजगार मिळाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकही मोठा उद्योग नाही. त्यामुळे येथील शेतीच्या भरवशावर नागरिकांना काही महिन्याचा रोजगार मिळते. धानाच्या शेतीत जवळपास तीन महिने रबी हंगामात दोन महिने असे एकूण पाच महिने सोडले तर इतर सात महिने रिकामेच राहण्याची पाळी येते. अशा परिस्थितीत बहुतांश मजूर रोहयोच्या कामांना विशेष पसंती देतात. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे धान शेतीही रोजगार देऊ शकली नाही. उलट अनेकांचे शेत पडिक आहेत. त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी सुध्दा रोहयोच्या कामावर जाण्यास पसंती दर्शवित आहेत. त्यामुळे या कामाची मागणी वाढली आहे. काही तालुक्यांमध्ये पावसाळाभर रोहयोची कामे सुरू होती. २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या सुरूवातीपासून बाराही तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत. कामाची मागणी करूनही रोजगार न दिल्यास बेरोजगारी भत्ता द्यावा लागते. त्यामुळे प्रशासनही रोजगाराची मागणी होताच काम उपलब्ध करून देते. बाराही तालुक्यात चालू आर्थिक वर्षात सुमारे १ लाख १८ हजार ७५० नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. २ हजार ५८५ कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार दिला आहे. तर याच कालावधीत सुमारे २० लाख ३४ हजार ३६८ मनुष्य दिवस रोजगाराची निर्मिती झाली आहे. रोजगार हमी योजनेमुळे शेतीवरील कामाचा ताण कमी होऊन बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यास फार मोठी मदत झाली आहे. (नगर प्रतिनिधी)मजुरी विलंबाबात तक्रारी वाढल्यामागील काही महिन्यात रोजगार हमी योजनेच्या कामाची मजुरी तत्काळ मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही गावातील मजुरांना पाच ते सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी मजुरी मिळाली नाही. रोहयोच्या कामावर जाणारे बहुतांश मजूर हातावर आणून पानावर खाणारे राहतात. अशा परिस्थितीत चार महिन्यांपासून मजुरी मिळाली नाही. त्यामुळे सदर कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे. परिणामी रोहयोबाबत मजुरांच्या मनात शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.