शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

१८.५७ टक्के बालकांवर कुपोषणाची छाया

By admin | Updated: May 18, 2017 01:38 IST

भावी पिढी सुदृढ असावी यासाठी गरोदरपणापासून पोटातील बाळाला सकस आहार मिळण्याची दक्षता शासनाकडून घेतली जाते.

पोषण आहारावर प्रश्नचिन्ह : महिला व बालकल्याण आणि आरोग्य विभागात समन्वयाचा अभाव मनोज ताजने । लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : भावी पिढी सुदृढ असावी यासाठी गरोदरपणापासून पोटातील बाळाला सकस आहार मिळण्याची दक्षता शासनाकडून घेतली जाते. त्यासाठी भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविली जाते. याशिवाय महिला व बालकल्याण विभागाकडून घरपोच सकस आहाराचा पुरवठा केला जातो. असे असताना गडचिरोली जिल्ह्यात ५ वर्षाखालील १५ हजार ९५० बालके, अर्थात एकूण बालकांच्या १८.५७ टक्के बालक कुपोषणाच्या छत्रछायेत आहेत. त्यामुळे शासनाच्या सकस आहार योजनेची अंमलबजावणी कशी होत आहे, हे स्पष्टपणे दिसून येते. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून केलेल्या सर्व्हेक्षणानुसार जिल्ह्यात ५ वर्षाखालील ८० हजार ९४० बालके आहेत. त्यापैकी ७९ हजार ९३६ बालकांचे वजन घेतले असता त्यापैकी ८१.४३ टक्के, अर्थात ६५ हजार ९५ बालके साधारण स्थितीत आहेत. मात्र उर्वरित १५ हजार ९५० बालकांचे वजन अपेक्षेपेक्षा कमी आहे. त्यातही तीव्र कुपोषित (मॅम) ९१० तर अतितिव्र कुपोषित २०९ बालके आहेत. या बालकांची योग्य ती काळजी घेतल्या गेली नाही तर ही बालके मृत्यूच्या दारी पोहोचू शकतात. पोषण आहाराच्या योजना जि. प. महिला व बालकल्याण विभागाकडून अंगणवाड्यांच्या मार्फत राबविल्या जातात. त्यात आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत अनुसूचित जमातीच्या क्षेत्रासाठी अमृत आहार योजनेसाठी निधी दिला जातो. यात सहा महिने ते ७ वर्षेपर्यंतच्या बालकांना आठवड्यातून चार दिवस एक अंड किंवा दोन केळी दिल्या जातात. त्यासाठी ५ रुपये प्रतिदिवस/प्रतिलाभार्थी याप्रमाणे पैशाची तरतूद केली असते. गरोदर महिला आणि स्तनदा मातांना महिन्यातून २५ दिवस एक वेळ सकस जेवण दिले जाते. हा सकस आहार त्यांच्यापर्यंत किती प्रमाणात पोहोचतो हा संशोधनाचा विषय आहे. दुसऱ्या एका पोषण आहार योजनेअंतर्गत ६ महिने ते ६ वर्षेपर्यंतच्या बालकांना वर्षातून ३०० दिवस सकस आहाराचे पॅकेट पुरविल्या जातात. अंगणवाडीत न येणाऱ्या ३ वर्षापर्यंतच्या बालकांना त्यांचा सकस आहार घरपोच पोहोचवून दिला जाते. त्यासाठी ४.५० रुपये प्रतिदिन/प्रतिलाभार्थी निधीची तरतूद केली जाते. ही रक्कम थेट अंगणवाडी समितीच्या खात्यात जमा केली जाते. जिल्ह्यात याचे लाभार्थी ९५ हजार ३३८ असल्याचे सांगितले जाते. परंतू प्रत्यक्षात तेवढ्या लोकांपर्यंत हा आहार पोहोचतच नाही. त्यामुळेच बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण आढळून येत आहे. बालकांचे कुपोषण हा आरोग्य विभागाशी निगडित विषय आहे. मात्र सकस आहाराची योजना महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविली जाते. जर याच विभागामार्फत योजना राबवायची असेल तर जिल्हा व तालुकास्तरावरील बालविकास प्रकल्प अधिकारी हे वैद्यकीय पदवीधारक असावेत. त्यांना किमान पोषण आहाराचे तांत्रिक ज्ञान असते. मात्र दोन्ही विभागाच्या कारभारात सकस आहार योजनेची व्यवस्थित अंमलबजावणी होत नसल्यामुळे कुपोषणाचे प्रमाण दिसून येत आहे. - डॉ.कमलेश भंडारी, जिल्हा आरोग्य अधिकारी सर्वाधिक कुपोषित बालके चामोर्शी व गडचिरोलीत जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, अहेरी, धानोरा हे तालुके सर्वाधिक दुर्गम आणि आदिवासीबहुल तालुके म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या भागात कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक असण्याची शक्यता असते. परंतू महिला व बालकल्याण विभागाच्या आकडेवारीत सर्वाधिक कुपोषित बालकांचे प्रमाण अनुक्रमे चामोर्शी, गडचिरोली आणि कोरची या तालुक्यांमध्ये आहे. यामागे नेमके कोणते कारण आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे.