शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

१८.५७ टक्के बालकांवर कुपोषणाची छाया

By admin | Updated: May 18, 2017 01:38 IST

भावी पिढी सुदृढ असावी यासाठी गरोदरपणापासून पोटातील बाळाला सकस आहार मिळण्याची दक्षता शासनाकडून घेतली जाते.

पोषण आहारावर प्रश्नचिन्ह : महिला व बालकल्याण आणि आरोग्य विभागात समन्वयाचा अभाव मनोज ताजने । लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : भावी पिढी सुदृढ असावी यासाठी गरोदरपणापासून पोटातील बाळाला सकस आहार मिळण्याची दक्षता शासनाकडून घेतली जाते. त्यासाठी भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविली जाते. याशिवाय महिला व बालकल्याण विभागाकडून घरपोच सकस आहाराचा पुरवठा केला जातो. असे असताना गडचिरोली जिल्ह्यात ५ वर्षाखालील १५ हजार ९५० बालके, अर्थात एकूण बालकांच्या १८.५७ टक्के बालक कुपोषणाच्या छत्रछायेत आहेत. त्यामुळे शासनाच्या सकस आहार योजनेची अंमलबजावणी कशी होत आहे, हे स्पष्टपणे दिसून येते. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून केलेल्या सर्व्हेक्षणानुसार जिल्ह्यात ५ वर्षाखालील ८० हजार ९४० बालके आहेत. त्यापैकी ७९ हजार ९३६ बालकांचे वजन घेतले असता त्यापैकी ८१.४३ टक्के, अर्थात ६५ हजार ९५ बालके साधारण स्थितीत आहेत. मात्र उर्वरित १५ हजार ९५० बालकांचे वजन अपेक्षेपेक्षा कमी आहे. त्यातही तीव्र कुपोषित (मॅम) ९१० तर अतितिव्र कुपोषित २०९ बालके आहेत. या बालकांची योग्य ती काळजी घेतल्या गेली नाही तर ही बालके मृत्यूच्या दारी पोहोचू शकतात. पोषण आहाराच्या योजना जि. प. महिला व बालकल्याण विभागाकडून अंगणवाड्यांच्या मार्फत राबविल्या जातात. त्यात आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत अनुसूचित जमातीच्या क्षेत्रासाठी अमृत आहार योजनेसाठी निधी दिला जातो. यात सहा महिने ते ७ वर्षेपर्यंतच्या बालकांना आठवड्यातून चार दिवस एक अंड किंवा दोन केळी दिल्या जातात. त्यासाठी ५ रुपये प्रतिदिवस/प्रतिलाभार्थी याप्रमाणे पैशाची तरतूद केली असते. गरोदर महिला आणि स्तनदा मातांना महिन्यातून २५ दिवस एक वेळ सकस जेवण दिले जाते. हा सकस आहार त्यांच्यापर्यंत किती प्रमाणात पोहोचतो हा संशोधनाचा विषय आहे. दुसऱ्या एका पोषण आहार योजनेअंतर्गत ६ महिने ते ६ वर्षेपर्यंतच्या बालकांना वर्षातून ३०० दिवस सकस आहाराचे पॅकेट पुरविल्या जातात. अंगणवाडीत न येणाऱ्या ३ वर्षापर्यंतच्या बालकांना त्यांचा सकस आहार घरपोच पोहोचवून दिला जाते. त्यासाठी ४.५० रुपये प्रतिदिन/प्रतिलाभार्थी निधीची तरतूद केली जाते. ही रक्कम थेट अंगणवाडी समितीच्या खात्यात जमा केली जाते. जिल्ह्यात याचे लाभार्थी ९५ हजार ३३८ असल्याचे सांगितले जाते. परंतू प्रत्यक्षात तेवढ्या लोकांपर्यंत हा आहार पोहोचतच नाही. त्यामुळेच बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण आढळून येत आहे. बालकांचे कुपोषण हा आरोग्य विभागाशी निगडित विषय आहे. मात्र सकस आहाराची योजना महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविली जाते. जर याच विभागामार्फत योजना राबवायची असेल तर जिल्हा व तालुकास्तरावरील बालविकास प्रकल्प अधिकारी हे वैद्यकीय पदवीधारक असावेत. त्यांना किमान पोषण आहाराचे तांत्रिक ज्ञान असते. मात्र दोन्ही विभागाच्या कारभारात सकस आहार योजनेची व्यवस्थित अंमलबजावणी होत नसल्यामुळे कुपोषणाचे प्रमाण दिसून येत आहे. - डॉ.कमलेश भंडारी, जिल्हा आरोग्य अधिकारी सर्वाधिक कुपोषित बालके चामोर्शी व गडचिरोलीत जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, अहेरी, धानोरा हे तालुके सर्वाधिक दुर्गम आणि आदिवासीबहुल तालुके म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या भागात कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक असण्याची शक्यता असते. परंतू महिला व बालकल्याण विभागाच्या आकडेवारीत सर्वाधिक कुपोषित बालकांचे प्रमाण अनुक्रमे चामोर्शी, गडचिरोली आणि कोरची या तालुक्यांमध्ये आहे. यामागे नेमके कोणते कारण आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे.