शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

१८ गावांमध्ये पाणी टंचाई

By admin | Updated: April 25, 2017 00:32 IST

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागाच्या वतीने मार्च महिन्यात जिल्हाभरात केलेल्या निरिक्षणात ...

सरासरी पाणी पातळी ०.२९ मीटरने वाढली : भूजल सर्वेक्षण विभागाचे निरिक्षणगडचिरोली : भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागाच्या वतीने मार्च महिन्यात जिल्हाभरात केलेल्या निरिक्षणात मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत भूजलाची पातळी ०.२९ मीटरने वाढली असल्याचा निष्कर्ष नोंदविला आहे. मात्र जिल्ह्यातील १८ गावांमधील विहिरीच्या पाण्याची पातळी घटली असल्याने या गावांमध्ये पाणी टंचाईचे संकट तीव्र होण्याची भिती भूजल सर्वेक्षण विभागाने व्यक्त केली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने वर्षातून चारवेळा म्हणजेच दर तीन महिन्याला भूजलाच्या पातळीचा आढावा घेतला जातो. भूजलाच्या पातळीचा आढावा घेण्यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाने बाराही तालुक्यातील ११२ विहिरींची निवड केली आहे. या विहिरींमधील पाण्याच्या पातळीवरून भूजलाच्या पातळीचा आढावा घेतला जातो. मार्च महिन्यात केलेल्या पाहणीमध्ये एकूण ११२ विहिरींपैकी ३५ विहिरींची पाण्याची पातळी मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ०.३५ मीटरने घटली असल्याचे आढळून आले. तर ७७ विहिरींची पाण्याची पातळी सरासरी ०.६० मीटरने वाढली असल्याचे दिसून आले. मागील पाच वर्षातील पाण्याची सरासरी पातळी ६.४३ मीटर आहे. तर मार्च महिन्यात केलेल्या पाहणीमध्ये पाण्याची पातळी ६.१४ मीटर असल्याचे आढळून आले आहे. यावरून सरासरी ०.२९ मीटरने पाण्याची पातळी वाढली असल्याचे निरिक्षण सर्वेक्षण विभागाने नोंदविले आहे. गडचिरोली तालुक्यात सर्वेक्षण करण्यात आलेल्या एकूण १० विहिरींपैकी पाच विहिरींची पाणी पातळी वाढली आहे. तर पाच विहिरींची पाणी पातळी घटली आहे. आरमोरी तालुक्यातील चार विहिरींची पाणी पातळी घटली आहे. देसाईगंज तालुक्यातील दोन विहिरींची पातळी घटली. तर पाच विहिरींची वाढली आहे. कुरखेडातील तीन विहिरींची पातळी घटली तर १२ विहिरींची पातळी वाढली आहे. कोरचीतील एका विहिरीची पाणी पातळी घटली तर पाचची वाढली आहे. धानोरातील तिनची घटली तर नऊ विहिरींची वाढली आहे. चामोर्शी तालुक्यातील पाच विहिरींची पातळी घटली तर सहा विहिरींची वाढली आहे. मुलचेरा तालुक्यातील पाचही विहिरींच्या पाणी पातळीत वाढली आहे. अहेरी तालुक्यातील दोन विहिरीत घट तर नऊ विहिरीत वाढ झाली आहे. एटापल्ली तालुक्यातील सहा विहिरीत घट तर सहा विहिरीत वाढ झाली आहे. भामरागडात सहाही विहिरीत वाढ झाली आहे. सिरोंचा तालुक्यातील चार विहिरींच्या पाणी पातळीत घट तर पाच विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. (नगर प्रतिनिधी)या गावांमध्ये भासणार पाणी टंचाई भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीमध्ये धानोरा तालुक्यातील जांभळी ग्रामपंचायतमधील गोटे विहीर व जांभळी येथे पाणी टंचाईची भिती व्यक्त केली जात आहे. गडचिरोली तालुक्यातील चांदाळा, रानभूमी, रानमूल, मसेली, विहिरगाव चक, विहिरगाव मो., मुडझा तुकूम, वाकडी, कनेरी, मुरखळा, नवेगाव, पुलखल, इंदाळा, कोटगल, पारडी कुपी या गावांमध्ये तिसऱ्या टप्प्यात पाणी टंचाईची भिती भूजल सर्वेक्षण विभागाने व्यक्त केली आहे. मागील वर्षी सरासरी ११५ टक्के पाऊस गडचिरोली जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी १३५४.७८ मीमी एवढे आहे. जून ते सप्टेंबर २०१६ या कालावधीत जिल्हाभरात सुमारे १५५९.४३ मीमी पाऊस झाला. सरासरीच्या २०४.६५ मीमी अधिकचे पाऊस झाले. सरासरी टक्केवारीच्या ११५.११ मीमी पर्जन्यमान झाले आहे. पाऊस अधिक पडल्याने भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मदत झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात रूपांतरीत खडक आहे. ८० टक्के भूभागावर जंगल आहे. विघटीत रूपांतरीत खडकाची खोली २० ते ३० मीटर एवढी आहे.