शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

१६२ घरकुलांना प्रारंभ नाही

By admin | Updated: December 23, 2014 23:02 IST

नगर पालिका क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने रमाई घरकूल योजना सुरू केली. मात्र या योजनेतील जाचक अटीमुळे अनेक घटकांना घरकुलाचा लाभ

८१ घरकूल अपूर्णावस्थेत : जाचक अटीमुळे रमाई घरकूल योजना ठरली मृगजळदिलीप दहेलकर - गडचिरोलीनगर पालिका क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने रमाई घरकूल योजना सुरू केली. मात्र या योजनेतील जाचक अटीमुळे अनेक घटकांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी अडचण जाणवत आहे. याशिवाय प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे दोन्ही नगर पालिका क्षेत्रातील तब्बल १६२ घरकुलांच्या कामांना प्रारंभच झाला नाही. याशिवाय गेल्या दोन वर्षांपासून ८१ घरकुलांचे काम अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे सदर योजना गरजू लाभार्थ्यांसाठी केवळ मृगजळ ठरली आहे.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या २९ सप्टेंबर २०११ च्या सुधारित शासन निर्णयानुसार दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी रमाई घरकूल योजना सुरू करण्यात आली. शासन निर्णयानुसार प्रथम टप्प्यात या योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी देण्यात येण्याची तरतूद आहे. पात्र बीपीएलधारकांना या योजनेचा लाभ मिळाल्यानंतर या योजनेचा दुसरा टप्पा अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील एपीएलधारक लाभार्थ्यांसाठी राबविण्यात यावा, असेही शासनाने निर्णयात म्हटले आहे. एपीएलधारकांसाठी उत्पन्नाची मर्यादा दीड लाखापर्यंत आहे. रमाई घरकूल योजनेंतर्गत सन २०१० ते २०१४ या कालावधीपर्यंत जिल्ह्यातील दोनही नगर पालिका क्षेत्रात सामाजिक न्याय विभागाला एकूण १ हजार घरकुलांचे उद्दीष्ट होते. मात्र सदर उद्दीष्ट गाठण्यात प्रशासनाला यश आले नाही. याची अनेक कारणे आहेत. सन २०१०-११ या पहिल्या वर्षात रमाई घरकूल योजनेंतर्गत गडचिरोली न.प. क्षेत्रात दारिद्र्य रेषेखालील एकूण ७२० कुटुंबापैकी ६३ लाभार्थ्यांची घरकुलासाठी निवड करण्यात आली. यापैकी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केलेल्या ४९ लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आली आहे. ६३ पैकी केवळ ३२ घरकुलाचे काम पूर्ण झाले असून गडचिरोली शहरातील १७ घरकूल अद्यापही अपूर्णावस्थेत आहे. विशेष म्हणजे, २०१०-११ या वर्षात मंजूर झालेल्या १४ घरकुलाच्या कामांना प्रारंभच झाला नसल्याची माहिती पुढे आली आहे. पहिल्या वर्षात या घरकुलांसाठी ७०.९५ लाखाचा निधी खर्च झाल्याची प्रशासन दरबारी नोंद आहे. देसाईगंज न.प. क्षेत्रात २०१०-११ या पहिल्या वर्षी दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांचे एकूण ५२२ कुटुंब आहे. यापैकी ४३ लाभार्थ्यांची घरकुलांसाठी निवड करण्यात आली. घरकुलाचे बांधकाम पूर्ण केलेल्या ३५ लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आले असून घरकुलांवर ५२.३५ लाख रूपयाचा खर्च झाल्याची नोंद प्रशासनाच्या लेखी आहे. २०११-१२ या वर्षातील गडचिरोली न.प. क्षेत्रातील २० घरकुलाचे काम अपूर्णावस्थेत असून ३९ घरकुलांच्या कामांना सुरूवात झाली नाही. देसाईगंज न.प. क्षेत्रात २५ घरकूल अपूर्णावस्थेत असून १०० घरकुलांच्या बांधकामाचा अद्यापही मुहूर्तच सापडला नसल्याची माहिती आहे.