शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

१६१ विशेष ग्रामसभा तहकूब

By admin | Updated: August 29, 2015 00:02 IST

जिल्ह्यातील सर्व ४५६ ग्रामपंचायतींनी स्वातंत्र्य दिनी १५ आॅगस्ट रोजी विशेष ग्रामसभांचे आयोजन करून नियोजित ग्रामस्तरीय विषयांसोबतच प्रामुख्याने चार विषयांचे ....

कोरमचा अभाव : ग्रामीण विकासावर परिणाम, प्रशासनाच्या जनजागृतीवर प्रश्नचिन्हलोकमत विशेषदिलीप दहेलकर गडचिरोलीजिल्ह्यातील सर्व ४५६ ग्रामपंचायतींनी स्वातंत्र्य दिनी १५ आॅगस्ट रोजी विशेष ग्रामसभांचे आयोजन करून नियोजित ग्रामस्तरीय विषयांसोबतच प्रामुख्याने चार विषयांचे जाहीर वाचन करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाने दिले होते. या संदर्भात राज्याच्या ग्राम विकास विभागाने एक परिपत्रक जाहीर केले होते. मात्र गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात नागरिकांमध्ये जागरूकता नसल्याने कोरमअभावी जिल्ह्यातील ४५६ पैकी तब्बल १६१ ग्रामपंचायतीमधील ग्रामसभा तहकूब झाल्या असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जिल्ह्यात ४५६ पैकी केवळ २९५ ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा पार पडल्या. ग्रामसभा झाल्याबाबतचा अहवाल पंचायत समितीस्तरावरून मागण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्हाभरात उभारण्यात येणाऱ्या शौचालय योजनेसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामसभांनी लाभार्थी निवडल्यास त्यांना लागणारे प्रमाणपत्रे जमा करण्याची जबाबदारी शासनाने ग्रामसेवकांवर सोपविली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन केले जाते किंवा नाही याची खातरजमा करण्यासाठी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना भेटी देण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या प्रमुखांनी दिले होते. त्यानुसार पंचायत समिती स्तरावरून अधिकारी ग्रामपंचायतीच्या गावात स्वातंत्र्यदिनी दाखल झाले. ते या संदर्भाचा अहवाल तयार करण्याच्या कामाला लागले आहेत. १६१ ग्रामपंचायतीच्या तहकूब झालेल्या ग्रामसभा काही दिवसानंतर घेण्यात आल्या आहेत. मात्र तहकूब ग्रामसभा झालेल्या ग्रा.पं.मध्ये पुन्हा ग्रामसभा झालेल्या ग्रामपंचायतीची संख्या नगण्यच असल्याची माहिती आहे.पेसा कायद्याने ग्रामसभेला जादा महत्त्वगडचिरोली जिल्ह्यात पेसा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. गावात विकासकामांसाठी येणाऱ्या शासनाच्या निधीचे योग्य विनियोजन करण्याचे अधिकार ग्रामसभेला देण्यात आले आहेत. ग्रामविकासाबाबत ग्रामसभा निर्णय घेऊ शकते. पेसा कायद्यामुळे ग्रामसभेचे महत्त्व वाढले आहे. मात्र गावातील उदासीन मतदारांमुळे कोरमअभावी ग्रामसभा तहकूब होत असल्याने परिणाम गाव विकासावर होणार आहे.शिक्षित मतदारांचा सहभाग वाढणे आवश्यकगावाच्या विकासासाठी ग्रामसभेने नेमके कोणते विषय, कोणत्या पध्दतीने हाताळावे, गाव विकासाचा मार्ग सुकर होईल याची दिशा देण्याचे काम गावातील शिक्षित तरूण करू शकतात. त्यासाठी शिक्षीत तरूणांची ग्रामसभेतील हजेरी वाढणे आवश्यक आहे. त्याशिवाय ग्रामसभा सक्षम होणार नाही.ग्रामसभेसाठी आवश्यक कोरमसंबंधित ग्रामपंचायतीच्या हद्दीत ग्रा.पं.ने जाहीर केलेल्या मतदारांच्या यादीत समाविष्ट असलेल्या एकूण मतदारांच्या १५ टक्के लोकसंख्या असणे आवश्यक आहे. किंवा एकूण मतदारांपैकी किमान १०० मतदार ग्रामसभेला उपस्थित असणे आवश्यक आहे. तेव्हाच ग्रामसभा पूर्ण होऊ शकते. मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या उदासीनतेमुळे १६१ ग्रामपंचायतीमधील कोरम पूर्ण न झाल्याने ग्रामसभा तहकूब झाल्या.