शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

१५५ गावांचा संपर्क तुटला

By admin | Updated: September 6, 2014 23:45 IST

शुक्रवारच्या रात्रीपासून जिल्हाभर संततधार पाऊस सुरू असल्याने तसेच छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी वाढल्याने गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी, भामरागड

भामरागडची दूरध्वनी सेवाही ठप्प : अहेरी, भामरागडात पूरस्थिती बिकटगडचिरोली : शुक्रवारच्या रात्रीपासून जिल्हाभर संततधार पाऊस सुरू असल्याने तसेच छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी वाढल्याने गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी, भामरागड तालुक्यातील पूर परिस्थिती बिकट झाली आहे. या दोन तालुक्यातील १५५ गावांचा संपर्क तुटलेला आहे. या तालुक्यातील अनेक पुलावर पाणी चढल्याने वाहतुकही ठप्प झाली आहे. आलापल्ली-भामरागड मार्गावरील चंद्रा नाल्याजवळ पाणी चढल्याने हा मार्ग शुक्रवारपासून बंद झाला आहे. भामरागड गावाच्या सभोवताल पाण्याने वेढा पडला असून अनेक कुटुंबांना सुरक्षीत जागी हलविण्यात आले आहे. जवळजवळ १०० वर अधिक गावांचा तालुका व जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे. शनिवारी दुपारी १ वाजतानंतर भामरागडची दूरध्वनी व भ्रमणध्वनी सेवाही ठप्प झाली आहे. अहेरीतील जुन्या मध्यवर्ती बँकेसमोरील १० ते १५ घरांमध्ये तसेच आझाद वार्ड व बाजार परिसरातील ३० ते ४० घरांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच अहेरी तालुक्यात अहेरीनजिकच्या गडअहेरी नाल्याच्या पुलावरून १० फूट पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. पूर परिस्थितीमुळे देवलमरी, चेरपल्ली, व्यंकटापूर, इंदाराम, पुसूकपल्ली, बामणी, अमनपल्ली आदीसह ४० गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. नाल्यावर पाणी असल्यामुळे अहेरी-आवलमरी बसफेरी रद्द करण्यात आली आहे. जिमलगट्टानजिकच्या देचलीपेठा परिसरातही मुसळधार पावसामुळे १५ ते २० गाव संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. क्रिष्टापूर, डोडा आणि लिंदा या नाल्यांना पूर आला असून या परिसरातील गावांचा संपर्क तालुका मुख्यालयाशी तुटलेला आहे. जिल्ह्यात शनिवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात २२१.६ मिमी पाऊस झाला. गडचिरोली तालुक्यात ४४ मिमी, एटापल्ली १६.८, भामरागड १५३ मिमी पाऊस झाला.