शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

१५ दिवसांत एकही विद्यार्थी काेराेनाबाधित आढळला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:13 IST

गडचिराेली : शासनाच्या निर्देशानुसार गडचिराेली जिल्ह्यातील काेराेनामुक्त गावातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष भरविले जात आहेत. १५ जुलैपासून ...

गडचिराेली : शासनाच्या निर्देशानुसार गडचिराेली जिल्ह्यातील काेराेनामुक्त गावातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष भरविले जात आहेत. १५ जुलैपासून हे वर्ग भरविले जात असून, या वर्गाच्या जिल्हाभरातील एकूण १९४ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. १५ दिवसांत या शाळांमधील एकही विद्यार्थी काेराेनाबाधित आढळला नाही. तसेच काेणतीही शाळा बंद करावी लागली नसल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.

काेट...

विद्यार्थी मजेत, पालक समाधानी

शाळा पुन्हा सुरू झाल्याने आम्हाला प्रत्यक्ष अध्ययनाची संधी मिळाली आहे. शाळेत काेराेना संसर्गासंबंधात आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे काेराेना संसर्गाची फारशी भीती नसून नियमित शाळेत जाणे आम्हाला आवडत आहे.

- प्रतीक मडावी, विद्यार्थी

.....................

गेल्या दीड वर्षानंतर पहिल्यांदा आमचे विद्यालय सुरू झाले; त्यामुळे माेठा आनंद झाला. वर्गातील मित्रांसाेबत प्रत्यक्ष वर्गात बसून शिकायला मिळत आहे. नेटवर्कअभावी अडचणी येणाऱ्या ऑनलाईन अध्ययनातून आमची सुटका झाली आहे. काेराेनाबाबत शाळेत आवश्यक काळजी घेतली जात आहे.

- मनाेज उंदीरवाडे, विद्यार्थी

...............

गेल्या एक ते दीड वर्षानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत, ही बाब चांगली आहे; परंतु काेराेना संसर्ग अद्यापही पूर्ण संपलेला नाही. शाळेच्या वतीने उचित काळजी घेतली जात असल्याने आम्हाला फारशी चिंता नाही.

- मनाेहर हिचामी, पालक

..................

जिल्ह्यात एकूण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा - २५५

सध्या सुरू असलेल्या शाळा - १९४

काेट...

काेविडमुक्त भागातील १९४ शाळांमध्ये १५ जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यात आले आहेत. शाळा सुरू झाल्यापासून एकाही शाळेमध्ये काेराेनाबाधित विद्यार्थी तसेच शिक्षक आढळून आलेले नाहीत. परिणामी काेराेना संसर्गामुळे एकही शाळा बंद करण्याची वेळ आली नाही. धानपीक राेवणीच्या कामामुळे विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण कमी आहे. १५ दिवसांनंतर विद्यार्थी उपस्थिती निश्चितच वाढणार आहे.

- आर. पी. निकम, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जि. प. गडचिराेली

बाॅक्स... विद्यार्थी उपस्थिती ४० टक्क्यांवर

शासनाच्या निर्देशानुसार गडचिराेली जिल्ह्यातील १९४ माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. इयत्ता आठवी ते बारावीचे विद्यार्थी शेतीचे काम सहज करतात. आईवडिलांना मदत करण्यासाठी धानपीक राेवणीच्या कामासाठी अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी जात आहेत. त्यामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी झाली आहे. सुरू झालेल्या शाळांमध्ये जिल्ह्यात विद्यार्थी उपस्थिती सध्या ४० टक्क्यांवर पाेहाेचली आहे.