शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

१४७ दुकानदारांची खत विक्री बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 23:09 IST

खतविक्रीसाठी पॉस (पॉर्इंट आॅफ सेल) मशीन सक्तीची केल्याने यावर्षी नोंदणीकृत १४७ दुकानदारांनी खतविक्रीकडे पाठ फिरविली आहे.

ठळक मुद्देपॉस मशीनचा परिणाम : जिल्हाभरात ३५३ दुकानदार करीत आहेत खताची विक्री

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : खतविक्रीसाठी पॉस (पॉर्इंट आॅफ सेल) मशीन सक्तीची केल्याने यावर्षी नोंदणीकृत १४७ दुकानदारांनी खतविक्रीकडे पाठ फिरविली आहे.केंद्र शासन रासायनिक खतांवर मोठ्या प्रमाणात अनुदान देते. यापूर्वी कंपनीने खतविक्रीचे बिल सादर केल्यानंतर संबंधित कंपनीला अनुदानाचा लाभ दिला जात होता. याचा गैरफायदा खत कंपन्या उचलत होत्या. आगाऊ विक्री दाखवून अनुदान लाटले जात होते. या प्रकारावर आळा घालण्यासाठी मागील वर्षीपासून शासनाने खतविक्रीसाठी पॉस मशीन सक्तीची केली आहे. पॉस मशीनमध्ये संबंधित शेतकऱ्याचा आधारकार्ड क्रमांक टाकला जातो व त्याचे थम्बही घेतले जाते. ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय खतावरील अनुदान संबंधित कंपनीला मिळत नाही. त्यामुळे खतविक्रीसाठी केंद्र शासनाबरोबरच कंपन्यांनीही पॉस मशीनची सक्ती केली आहे.यापूर्वी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे नोंदणी केल्यानंतर खत विक्रीचा परवाना मिळत होता. या परवान्यावर खतविक्री केली जात होती. जिल्हाभरात ५०० खते विक्रेत्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी मागील वर्षी ३१४ व यावर्षी ३९ खतविक्रेत्यांनी पॉस मशीन खरेदी केली आहे. याचा अर्थ एवढेच दुकानदार खताची विक्री करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. १४७ दुकानदारांनी खतविक्रीचा व्यवसाय बंद केला असण्याची शक्यता आहे.पॉस मशीनचा वापर करण्यासाठी इंटरनेट सुविधा असणे आवश्यक आहे. दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये अजूनही इंटरनेटसेवा पोहोचली नाही. त्यामुळे पॉस मशीन काम करीत नसल्याने दुकानदारांना खतविक्रीच्या व्यवसायावर पाणी फेरावे लागले आहे. गावकऱ्यांनाही आता तालुकास्थळावरून खताची खरेदी करावी लागत आहे. पॉस मशीनमधूनच खताचे बिलही निघत असल्याने दुकानदार अधिकचे पैसे संबंधित शेतकऱ्याकडून घेऊ शकत नाही. परिणामी यापूर्वी शेतकऱ्यांची होणारी फसवणूकही थांबली असल्याने शेतकऱ्यांनीही या योजनेचे कौतुक केले आहे.युरियाच्या बॅगचे वजन यावर्षीपासून ४५ किलोयुरियाची बॅग जरी शेतकऱ्यांना २७० रूपयांना मिळत असली तरी शासन या बॅगवर कंपनीला ४०० ते ५०० रूपयांचे अनुदान देते. कमी किमतीत खत मिळत असल्याने शेतकरी सर्वाधिक युरियाचा वापर करतात. युरिया हे रासायनिक खत आहे. रासायनिक खताचे जमीन व मानवी आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमीन नापीक होण्याचा सर्वाधिक धोका राहतो. त्यामुळे रासायनिक खताचा वापर कमी होण्याच्या दृष्टीने शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. शेतकाऱ्यांना प्रती एकरी दोन ते तीन बॅग टाकण्याची सवय झाली आहे. बॅगचे वजन कमी केल्यास खताचा वापरही कमी होईल, अशी आशा शासनाला आहे. त्यामुळे शासनाने यावर्षीपासून युरियाच्या बॅगचे वजन ५० किलो ऐवजी ४५ किलो केले आहे.रासायनिक खताचा वापर टाळून शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळविण्यासाठी शासनामार्फत शेतकºयांना मार्गदर्शन व अनुदानही दिले जात आहे.