शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
3
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
4
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
5
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
6
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
7
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
8
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
9
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
10
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
11
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
12
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
13
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
14
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
15
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
16
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
17
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
18
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
19
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
20
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!

१४७ दुकानदारांची खत विक्री बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 23:09 IST

खतविक्रीसाठी पॉस (पॉर्इंट आॅफ सेल) मशीन सक्तीची केल्याने यावर्षी नोंदणीकृत १४७ दुकानदारांनी खतविक्रीकडे पाठ फिरविली आहे.

ठळक मुद्देपॉस मशीनचा परिणाम : जिल्हाभरात ३५३ दुकानदार करीत आहेत खताची विक्री

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : खतविक्रीसाठी पॉस (पॉर्इंट आॅफ सेल) मशीन सक्तीची केल्याने यावर्षी नोंदणीकृत १४७ दुकानदारांनी खतविक्रीकडे पाठ फिरविली आहे.केंद्र शासन रासायनिक खतांवर मोठ्या प्रमाणात अनुदान देते. यापूर्वी कंपनीने खतविक्रीचे बिल सादर केल्यानंतर संबंधित कंपनीला अनुदानाचा लाभ दिला जात होता. याचा गैरफायदा खत कंपन्या उचलत होत्या. आगाऊ विक्री दाखवून अनुदान लाटले जात होते. या प्रकारावर आळा घालण्यासाठी मागील वर्षीपासून शासनाने खतविक्रीसाठी पॉस मशीन सक्तीची केली आहे. पॉस मशीनमध्ये संबंधित शेतकऱ्याचा आधारकार्ड क्रमांक टाकला जातो व त्याचे थम्बही घेतले जाते. ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय खतावरील अनुदान संबंधित कंपनीला मिळत नाही. त्यामुळे खतविक्रीसाठी केंद्र शासनाबरोबरच कंपन्यांनीही पॉस मशीनची सक्ती केली आहे.यापूर्वी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे नोंदणी केल्यानंतर खत विक्रीचा परवाना मिळत होता. या परवान्यावर खतविक्री केली जात होती. जिल्हाभरात ५०० खते विक्रेत्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी मागील वर्षी ३१४ व यावर्षी ३९ खतविक्रेत्यांनी पॉस मशीन खरेदी केली आहे. याचा अर्थ एवढेच दुकानदार खताची विक्री करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. १४७ दुकानदारांनी खतविक्रीचा व्यवसाय बंद केला असण्याची शक्यता आहे.पॉस मशीनचा वापर करण्यासाठी इंटरनेट सुविधा असणे आवश्यक आहे. दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये अजूनही इंटरनेटसेवा पोहोचली नाही. त्यामुळे पॉस मशीन काम करीत नसल्याने दुकानदारांना खतविक्रीच्या व्यवसायावर पाणी फेरावे लागले आहे. गावकऱ्यांनाही आता तालुकास्थळावरून खताची खरेदी करावी लागत आहे. पॉस मशीनमधूनच खताचे बिलही निघत असल्याने दुकानदार अधिकचे पैसे संबंधित शेतकऱ्याकडून घेऊ शकत नाही. परिणामी यापूर्वी शेतकऱ्यांची होणारी फसवणूकही थांबली असल्याने शेतकऱ्यांनीही या योजनेचे कौतुक केले आहे.युरियाच्या बॅगचे वजन यावर्षीपासून ४५ किलोयुरियाची बॅग जरी शेतकऱ्यांना २७० रूपयांना मिळत असली तरी शासन या बॅगवर कंपनीला ४०० ते ५०० रूपयांचे अनुदान देते. कमी किमतीत खत मिळत असल्याने शेतकरी सर्वाधिक युरियाचा वापर करतात. युरिया हे रासायनिक खत आहे. रासायनिक खताचे जमीन व मानवी आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमीन नापीक होण्याचा सर्वाधिक धोका राहतो. त्यामुळे रासायनिक खताचा वापर कमी होण्याच्या दृष्टीने शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. शेतकाऱ्यांना प्रती एकरी दोन ते तीन बॅग टाकण्याची सवय झाली आहे. बॅगचे वजन कमी केल्यास खताचा वापरही कमी होईल, अशी आशा शासनाला आहे. त्यामुळे शासनाने यावर्षीपासून युरियाच्या बॅगचे वजन ५० किलो ऐवजी ४५ किलो केले आहे.रासायनिक खताचा वापर टाळून शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळविण्यासाठी शासनामार्फत शेतकºयांना मार्गदर्शन व अनुदानही दिले जात आहे.