शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

११ हजार नवागतांचा शाळा प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 22:40 IST

उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्यानंतर सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्राला २६ जून रोजी प्रारंभ होणार आहे. मंगळवारी जिल्ह्यातील सर्व शाळांची पहिली घंटा वाजणार असल्याने इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळांतर्फे पुष्पगुच्छ देऊन जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. जिल्हाभरातील इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या ११ हजार ७६० विद्यार्थ्यांचे पहिल्यांदाच शाळेमध्ये पाऊल पडणार आहे.

ठळक मुद्देजल्लोषात होणार आज स्वागत : शिक्षण विभागासह शाळांची जय्यत तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्यानंतर सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्राला २६ जून रोजी प्रारंभ होणार आहे. मंगळवारी जिल्ह्यातील सर्व शाळांची पहिली घंटा वाजणार असल्याने इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळांतर्फे पुष्पगुच्छ देऊन जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. जिल्हाभरातील इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या ११ हजार ७६० विद्यार्थ्यांचे पहिल्यांदाच शाळेमध्ये पाऊल पडणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात दीड हजारांवर प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. याशिवाय गडचिरोली व देसाईगंज नगर पालिकेच्या मिळून १५ च्या आसपास प्राथमिक शाळा आहेत. याशिवाय विविध संस्थांमार्फत अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळा आहेत. आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या शासकीय आश्रमशाळा व संस्थांमार्फत चालविल्या जाणाºया खासगी अनुदानित आश्रमशाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.शाळा प्रवेशोत्सवाबाबत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ९ जून २०१५ रोजी शासन निर्णय निर्गमित केला. या निर्णयात शाळा प्रवेशोत्सवाच्या विविध बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. यामध्ये नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणे, संबंधित विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अधिकारी व राजकीय पदाधिकारी विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचविणे, वाद्यांच्या निनादात गावातून प्रभातफेरी काढणे, शाळेच्या पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व गणवेश वितरित करणे, शैक्षणिक धोरण व उपक्रमांबाबत उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन आयोजित करणे आदी बाबींचा समावेश आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी ५ हजार ९६३ मुले व ५ हजार ७९७ मुली अशा एकूण ११ हजार ७६० नवागत विद्यार्थ्यांचे शिक्षण विभागाच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. शाळा प्रवेशोत्सवाची तयारी शाळा व शिक्षण विभागामार्फत पूर्ण झाली आहे.शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांसह विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत गोड भोजन देण्यात येणार आहे. शाळा प्रवेशोत्सवाबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक, पदाधिकारी उत्साहित आहेत.अधिकारी शाळांना भेटी देणारशाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम शासन धोरणानुसार नियोजन पध्दतीने पार पाडण्यात यावा, यासाठी शिक्षण विभाग दक्ष आहे. शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश वितरित होतात काय? याबाबतची पाहणी करण्यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी दुर्गम व अतिदुर्गम भागातील शाळांना भेटी देणार आहेत.