शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

११ हजार नवागतांचा शाळा प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 22:40 IST

उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्यानंतर सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्राला २६ जून रोजी प्रारंभ होणार आहे. मंगळवारी जिल्ह्यातील सर्व शाळांची पहिली घंटा वाजणार असल्याने इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळांतर्फे पुष्पगुच्छ देऊन जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. जिल्हाभरातील इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या ११ हजार ७६० विद्यार्थ्यांचे पहिल्यांदाच शाळेमध्ये पाऊल पडणार आहे.

ठळक मुद्देजल्लोषात होणार आज स्वागत : शिक्षण विभागासह शाळांची जय्यत तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्यानंतर सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्राला २६ जून रोजी प्रारंभ होणार आहे. मंगळवारी जिल्ह्यातील सर्व शाळांची पहिली घंटा वाजणार असल्याने इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळांतर्फे पुष्पगुच्छ देऊन जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. जिल्हाभरातील इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या ११ हजार ७६० विद्यार्थ्यांचे पहिल्यांदाच शाळेमध्ये पाऊल पडणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात दीड हजारांवर प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. याशिवाय गडचिरोली व देसाईगंज नगर पालिकेच्या मिळून १५ च्या आसपास प्राथमिक शाळा आहेत. याशिवाय विविध संस्थांमार्फत अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळा आहेत. आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या शासकीय आश्रमशाळा व संस्थांमार्फत चालविल्या जाणाºया खासगी अनुदानित आश्रमशाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.शाळा प्रवेशोत्सवाबाबत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ९ जून २०१५ रोजी शासन निर्णय निर्गमित केला. या निर्णयात शाळा प्रवेशोत्सवाच्या विविध बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. यामध्ये नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणे, संबंधित विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अधिकारी व राजकीय पदाधिकारी विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचविणे, वाद्यांच्या निनादात गावातून प्रभातफेरी काढणे, शाळेच्या पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व गणवेश वितरित करणे, शैक्षणिक धोरण व उपक्रमांबाबत उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन आयोजित करणे आदी बाबींचा समावेश आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी ५ हजार ९६३ मुले व ५ हजार ७९७ मुली अशा एकूण ११ हजार ७६० नवागत विद्यार्थ्यांचे शिक्षण विभागाच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. शाळा प्रवेशोत्सवाची तयारी शाळा व शिक्षण विभागामार्फत पूर्ण झाली आहे.शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांसह विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत गोड भोजन देण्यात येणार आहे. शाळा प्रवेशोत्सवाबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक, पदाधिकारी उत्साहित आहेत.अधिकारी शाळांना भेटी देणारशाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम शासन धोरणानुसार नियोजन पध्दतीने पार पाडण्यात यावा, यासाठी शिक्षण विभाग दक्ष आहे. शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश वितरित होतात काय? याबाबतची पाहणी करण्यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी दुर्गम व अतिदुर्गम भागातील शाळांना भेटी देणार आहेत.