शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

१ हजार १४८ कृषी पंपांना वीज जोडणी नाही

By admin | Updated: November 23, 2014 23:18 IST

कृषी विभागाच्या विदर्भ विकास कार्यक्रमांतर्गत ३० हजार आदिवासी कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्याबाबत एचडीपीई पाईप, ताडपत्री, धान्यकोठी, विद्युत पंपसंच व विद्युत जोडणीची योजना २०११-१२ पासून

दिलीप दहेलकर - गडचिरोलीकृषी विभागाच्या विदर्भ विकास कार्यक्रमांतर्गत ३० हजार आदिवासी कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्याबाबत एचडीपीई पाईप, ताडपत्री, धान्यकोठी, विद्युत पंपसंच व विद्युत जोडणीची योजना २०११-१२ पासून गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत सन २०१२-१३ मध्ये कृषी अधीक्षक कार्यालयाच्यावतीने विद्युत पंपसंच व विद्युत जोडणीसाठी बाराही तालुक्यातील एकूण १ हजार ९१६ लाभार्थ्यांपैकी मार्च २०१४ अखेरपर्यंत केवळ ३६८ लाभार्थ्यांच्या कृषी पंपाना महावितरणच्यावतीने विद्युत जोडणी करण्यात आली. कृषी अधीक्षक कार्यालयाने सर्व लाभार्थ्यांच्या विद्युत जोडणीचे महावितरणला लाखो रूपये अदा केले आहेत. मात्र अद्यापही १ हजार १४८ कृषीपंपाना वीज जोडणी करण्यात आली नसल्याचे वास्तव उजेडात आले आहे. वीज जोडणी अभावी शेतकरी संकटाचा सामना करीत आहेत.विदर्भ विकास कार्यक्रमांतर्गत नक्षलग्रस्त भागामध्ये विशेष योजना राबविण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याची निवड करण्यात आली. या योजनेंतर्गत सन २०१२-१३ मध्ये जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्यावतीने आदिवासी शेतकऱ्यांचे कृषीपंपसंच व जोडणीसाठी अर्ज मागविण्यात आले. या योजनेकरीता बाराही तालुक्यातील एकूण २ हजार ५८६ आदिवासी शेतकऱ्यांचे अर्ज कृषी अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाले. यापैकी कृषी अधीक्षक कार्यालयाने ६६९ लाभार्थी वीज जोडणीकरीता अपात्र ठरवून १ हजार ९२० लाभार्थ्यांची निवड केली. यातून १ हजार ९१६ कृषीपंप मिळालेले लाभार्थी वीज जोडणीसाठी पात्र ठरविले. १ हजार ९१६ पैकी मार्च २०१४ अखेरपर्यंत महावितरणने केवळ ३६८ लाभार्थी शेतकऱ्यांच्या कृषीपंपाला वीज जोडणी करून दिली. उर्वरित १ हजार ५४८ कृषीपंप लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत जवळपास ४०० कृषीपंपाना वीज जोडणी करण्यात आल्याची माहिती आहे. शासनाचा निधी मिळाल्यानंतर कृषी विभागाने महावितरणला विद्युत जोडणीकरीता लाखो रूपये अदा केले. मात्र महावितरणच्यावतीने विद्युत जोडणीचे काम अतिशय मंदगतीने सुरू असल्यामुळे लाभार्थी शेतकरी जोडणीच्या प्रतीक्षेतच आहे. विदर्भ विकास कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाला एकूण १५०० लाख रूपयाचे अनुदान प्राप्त झाले. यापैकी आदिवासी लाभार्थी शेतकऱ्यांच्या एचडीपीई पाईप, इंजिन, ताडपत्री, धान्यकोटी, विद्युतपंपसंच व विद्युत जोडणीच्या कामासाठी २०११-१२ मध्ये ४,११.२८ लाख रूपये खर्च झाले. २०१२-१३ या वर्षात ५,००.७४ लाख रूपये या सर्व योजनांवर खर्च करण्यात आले. २०१३-१४ या वर्षी ३,५६.९८ लाख रूपये खर्च झाल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली. २०११ पासून तर २०१४ मार्च अखेरपर्यंत १२,६९.०० लाख रूपये खर्च झाले आहेत. तर एकूण अनुदान रक्कमेपैकी २.३१ लाख रूपये शिल्लक असल्याची माहिती आहे. महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे लाखो रूपये खर्च करूनही आदिवासी शेतकरी सिंचन सुविधेपासून वंचित आहे.