शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

आठवीपर्यंतचे १ लाख ३१ हजार विद्यार्थी परीक्षेविना उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:36 IST

गडचिराेली : काेराेनाचा संसर्ग वाढत असल्याने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना पुढच्या वर्गासाठी उत्तीर्ण करण्यात ...

गडचिराेली : काेराेनाचा संसर्ग वाढत असल्याने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना पुढच्या वर्गासाठी उत्तीर्ण करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला. त्यामुळे गडचिराेली जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या एकूण १ लाख १३ हजार ८५४ विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच उत्तीर्ण करावे लागणार आहे.

गडचिराेली जिल्ह्यात इयत्ता पहिलीत एकूण १५ हजार ६०८ विद्यार्थी आहेत. इयत्ता दुसरीमध्ये सर्वाधिक १७ हजार २६३, तिसरीत १६ हजार ६५६, तर इयत्ता चाैथीत १६ हजार ८३८ विद्यार्थी यावर्षीच्या शैक्षणिक सत्रात दाखल आहेत. इयत्ता पाचवीत १६ हजार १९६, सहावीत १६ हजार २५२, सातवीमध्ये १६ हजार ९२४ आणि आठवीमध्ये १६ हजार ११७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

इयत्ता पहिली ते आठवीच्या मिळून जिल्हाभरात ६४ हजार ६०३ मुली आहेत आणि ६७ हजार २५१ मुलांची संख्या आहे. हे सर्व विद्यार्थी परीक्षा न देता पुढच्या वर्गात एंट्री करणार आहेत.

काेट .....

शाळेत बाेलावून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे काेराेनाच्या काळात याेग्य नाही, तसेच सरकारने आरटीईअंतर्गत काेणत्याही मुलाला आठवीपर्यंत नापास करू नये, असे यापूर्वीचा नियम आहे. यावर्षी परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पास केले जाणार आहे.

- वासुदेव करंगामी, पालक

काेट .....

विद्यार्थ्यांच्या शाळा बंद, शिक्षण बंद, मात्र त्यांना पुढच्या वर्गात टाकणे निर्णय याेग्य म्हणण्यापेक्षा याशिवाय शासनाकडे पर्यायच नाही. त्यामुळे या निर्णयाने विद्यार्थी तर खुश हाेतील, मात्र विद्यार्थ्यांना त्या वर्गातील ज्ञान मिळावे, असा आग्रह आहे.

- मीनल वीरवार, पालक

काेट .....

काेराेनामुळे सरकारने वर्ग पहिली ते आठवीच्या मुलांना सरसकट पुढच्या वर्गात पास करण्याचा घेतलेला हा निर्णय याेग्यच आहे; परंतु या वर्गातील अभ्यासच झाला नाही आणि पुढच्या वर्गात टाकणे हे देखील मनाला पटत नाही; परंतु काेराेनाची सद्य:स्थिती पाहता हा निर्णय याेग्यच म्हणावा लागेल.

- नीता आवारी, पालक

काेट .....

महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना एकत्र बसवून परीक्षा घेता येणार नाही, तसेच त्यांना शाळेत बाेलावता येणार नाही. त्यामुळे हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे.

- आशा कराेडकर, शिक्षिका, गडचिराेली

काेट......

सध्या काेराेनाची परिस्थिती पाहता सरकारने घेतलेला निर्णय याेग्य आहे. कारण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेणार नाही. हा यामागील उद्देश आहे.

- राजू घुगरे, मुख्याध्यापक