शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
5
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
6
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
7
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
8
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
9
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
10
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
11
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
12
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
13
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
14
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
15
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
16
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
17
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
18
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
19
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
20
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!

भारताचे आव्हान संपुष्टात, ४-० गोलने पराभूत : घाना अंतिम सोळांमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:16 IST

एरिक अयाहने नोंदविलेले २ गोल आणि बदली खेळाडू रिकार्ल्डा डान्सो व इमानुअल टोकूने केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर गत दोन वेळचा विजेता घाना संघाने भारतीय संघाचा ४-० गोलने पराभव करून १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीतील आपली

नवी दिल्ली : एरिक अयाहने नोंदविलेले २ गोल आणि बदली खेळाडू रिकार्ल्डा डान्सो व इमानुअल टोकूने केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर गत दोन वेळचा विजेता घाना संघाने भारतीय संघाचा ४-० गोलने पराभव करून १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीतील आपली जागा निश्चित केली. कोलंबियाविरुद्ध चांगल्या खेळाचे प्रदर्शन करणाºया भारतीय संघाला गुरुवारी सलग तिसरा पराभव पत्करावा लागल्यामुळे या स्पर्धेतील त्यांचे आव्हान संपुष्टात आले.

जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सुरुवातीला घाणाच्या चपळ खेळाडूंना बरोबरीची टक्कर दिली. पण, घानाच्या आक्रमक आणि नियोजनबद्ध पासमुळे नंतर सामन्यावर त्यांचे वर्चस्व वाढू लागले. स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या सुमारे ५२ हजार प्रेक्षकांच्या जोरदार पाठिंब्याने भारतीय संघातील खेळाडूंचा उत्साह वाढत होता. पण, घानाच्या खेळाडूंच्या आक्रमकतेमुळे भारतीय संघाची बचाव फळी खिळखिळी झाली. सहाव्या मिनिटाला भारताच्या बचाव फळीला चकवून घाना संघाचा आघाडीचा खेळाडू एरिक अयाह हा भारतीय गोलपोस्टच्या दिशेने घुसला. त्या वेळी भारताचा गोलरक्षक धीरज सिंग एकटाच होता. या वेळी ब्लॅक कॅट्स (घाना)च्या फॉरवर्ड लाईनवर असलेल्या पंचाने त्याला आॅफसाईड म्हणून झेंडा वर केला. त्यामुळे त्याची गोल करण्याची संधी हुकली.

घाना संघाचा राईट विंगर सादीक इब्राहिमने लागोपाठ भारतीय गोलवर चढाया करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना दबावाखाली आणले. भारताचा डिफेंडर संजीव स्टॅलिनने त्याला प्रत्येक वेळी रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, घानाच्या या खेळाडूने २०व्या मिनिटात भारताच्या गोलमध्ये चेंडू मारला. पण, धीरज सिंगने तो चपळाईने अडविला. आज झालेल्या संपूर्ण सामन्यात धीरज सिंगने घानाच्या अनेक आक्रमणांना चपळाईने अडवून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. ३४व्या मिनिटाला भारताच्या बोरिसला पंचांनी नियमबाह्य खेळ केल्यामुळे पिवळे कार्ड दाखविले. आजच्या सामन्यात विशेषकरून भारताच्या बचाव फळातील खेळाडू स्टॅलिन अन्वर आणि बोरिस थंगजाम यांनी घाना खेळाडूंच्या अनेक आक्रमणांना रोखून धरणात यश मिळविले.भारताने जरी पराभव पत्करला असता, तरी संघातील खेळाडूंनी प्रेक्षकांची मने मात्र जिंकली होती. संपूर्ण स्पर्धेवर ६५ टक्के घानाच्या खेळाडूंचे वर्चस्व राहिले होते. भारताविरुद्धच्या विजयानंतर घानाने ३ सामन्यांत ६ गुण संपादन करून ‘अ’ गटात अग्रस्थान मिळविले. कोलंबिया आणि अमेरिका प्रत्येकी ६ गुणांनंतर अनुक्रमे दुसºया व तिसºया क्रमांकावर आहेत. (वृत्तसंस्था)४३व्या मिनिटाला घानाच्या ऐरिकने एक उत्कृष्ट चाल रचून आपल्या संघाचा पहिला गोल नोंदविला. हा पहिला गोल झाल्यानंतर घाना संघाच्या खेळाडूंनी जलद खेळ करण्यास सुरुवात केली.त्यातच पुन्हा ऐरिकला ५२व्या मिनिटाला मिळालेल्या संधीचा त्याने पूर्ण फायदा घेऊन संघाचा व स्वत:चा दुसरा गोल केला. त्यानंतर त्यांच्या रिकार्डो डान्सोने ८६व्या मिनिटाला संघाचा तिसरा आणि लगेचच एका मिनिटाने इमानुअल टोकोने ८७व्या मिनिटाला चौथा गोल केला.५३व्या मिनिटाला भारताच्या लालेगमवाईला बॉक्सच्या बाहेर चेंडू मिळाल्यानंतर त्याने गोल करण्याचा प्रयत्न केला; परंतु चेंडू थेट घानाचा गोलरक्षक इब्राहिम डॅनलॅण्डच्या हातात गेला.

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017Footballफुटबॉल