शहरं
Join us  
Trending Stories
1
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
3
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
4
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
5
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
6
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
7
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
8
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले
9
प्रणित मोरे ऐकत नाय! क्रिकेटपटूच्या बहिणीसोबत वाढतेय जवळीक? 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडीओ पाहून चाहतेही अवाक्
10
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
11
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
12
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
13
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
14
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
16
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
17
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
18
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
19
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
20
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा

दक्षिण भारतातले नवरात्र. आकर्षक बाहुल्यांसोबत इथला नैवेद्यही अप्रतिम.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 19:43 IST

-सारिका पूरकर-गुजराथीनवरात्रीचा उत्साह देशभर असतो. प्रचंड उर्जा, उत्साह आणि उमेद देणारा हा नवरात्रीचा उत्सव म्हणजे भारतीयांच्या महत्वाच्या सणांपैकी एक आहे. दक्षिण भारतातही हा उत्सव अत्यंत श्रद्धा, भक्ती तसेच उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होतो. दक्षिण भारतातील कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या तीन राज्यांमध्ये प्रामुख्यानं हा सण साजरा होतो. नवरात्रीची मुळ संकल्पना तीच ...

ठळक मुद्दे* कर्नाटकात नवरात्रीत विविध बाहुल्यांची सजावट केली जाते. यास गोंबे म्हणतात आणि बाहुल्यांच्या सजावटीस गोंबे पट्टडा संबोधलं जातं. विविध हावभाव, विविध पेहराव असलेल्या रंगीबिरंगी बाहुल्यांच्या आकर्षक सजावटीला कर्नाटकात विशेष महत्व आहे.* महाराष्ट्रात आपण जसा केशरी भात करतो तसा दक्षिण भारतात नवरात्रौत्सवात रवा केसरी हा गोडाचा पदार्थ म्हणून केला जातो.* तामिळनाडू, आंध्र प्रदेशातील हा लोकप्रिय पदार्थ असून नैवेद्यासाठी तो केला जातो. यास खारा पोंगल असही संबोधतात. तांदूळ-मुगडाळीची साऊथ इंडियन स्टाइल खिचडी देखील आपण यास म्हणू शकतो.* मुरमु-याचा लाडू हा अत्यंत सोपा आणि झटपट तयार होणारा पदार्थ तामिळनाडूत नैवेद्याचा पदार्थ म्हणून ओळखला जातो.* दक्षिण भारतात नवरात्रौत्सवात विविध खिरींचा नैवेद्य दाखिवला जातो. शेंगोळ्यांची खीर हा त्यातल्या त्यात खिरीचा किंवा पायसमचा वेगळा प्रकार दक्षिण भारतात पाहायला मिळतो.

-सारिका पूरकर-गुजराथीनवरात्रीचा उत्साह देशभर असतो. प्रचंड उर्जा, उत्साह आणि उमेद देणारा हा नवरात्रीचा उत्सव म्हणजे भारतीयांच्या महत्वाच्या सणांपैकी एक आहे. दक्षिण भारतातही हा उत्सव अत्यंत श्रद्धा, भक्ती तसेच उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होतो. दक्षिण भारतातील कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या तीन राज्यांमध्ये प्रामुख्यानं हा सण साजरा होतो. नवरात्रीची मुळ संकल्पना तीच असली तरी तीनही राज्यात विविध प्रथा, परंपरा आढळून येतात.

 

दक्षिण भारतातील नवरात्रौत्सवाची एक छान खासियत म्हणजे कर्नाटकात नवरात्रीत विविध बाहुल्यांची सजावट केली जाते. यास गोंबे म्हणतात आणि बाहुल्यांच्या सजावटीस गोंबे पट्टडा संबोधलं जातं. विविध हावभाव, विविध पेहराव असलेल्या रंगीबिरंगी बाहुल्यांच्या आकर्षक सजावटीला कर्नाटकात विशेष महत्व आहे. आपण भुलाबाईभोवती मांडतो ना अगदी तसेच. तामिळनाडूतही बाहुल्यांची सजावट केली जाते. येथे बाहुलीला बोम्बई संबोधतात आणि बाहूल्यांच्या सजावटीला गोलू म्हणतात. तामिळनाडूमध्ये नवरात्रीनिमित्त घरी येणाºया पाहुण्यांना विड्याच्या पानावर नारळ, हळकुंड, सुकामेवा तसेच फळ देण्याची प्रथा आहे. तर आंध्रप्रदेशात बाहुलीला कोलूवू म्हणतात आणि बाहुल्यांच्या सजावटीला बोम्माला कोलूवू म्हणतात. थोडक्यात तीनही राज्यात बाहुल्यांची सुंदर सजावट केली जाते.. या वेगळ्या सजावटीबरोबरच नवरात्रात विविध नैवेद्य, पदार्थही दक्षिण भारतात केले जातात. पायसम अर्थात वेगवेगळ्या चवींच्या खिरी, भाताचे विविध प्रकार तसेच उसळींचे प्रकार दक्षिण भारतात विशेष करून केले जातात.दक्षिण भारतातला नवरात्रीचा नैवेद्य1) रवा केसरीमहाराष्ट्रात आपण जसा केशरी भात करतो तसा दक्षिण भारतात नवरात्रौत्सवात रवा केसरी हा गोडाचा पदार्थ म्हणून केला जातो. साजूूक तूपात रवा भाजून केशर घालून तयार केलेल्या साखरेच्या गरम पाकात घातला जातो. नंतर काजू-बदाम,किसमिस घालून रवा केसरी नैवेद्यास ठेवला जातो. अत्यंत झटपट तयार होणारा हा पदार्थ दिवाळी तसेच अन्य सणांनाही बनवला जातो. साखरेच्या पाकात जर अर्धे दूध घालून पाक बनवला तर रवा केसरीची चव आणखी छान लागते.

 

 

2) व्हेन पोंगलतामिळनाडू, आंध्र प्रदेशातील हा लोकप्रिय पदार्थ असून नैवेद्यासाठी तो केला जातो. यास खारा पोंगल असही संबोधतात. तांदूळ-मुगडाळीची साऊथ इंडियन स्टाइल खिचडी देखील आपण यास म्हणू शकतो. मुगाची डाळ कोरडी भाजून तांदळासोबत मऊसर शिजवून घेतली जाते. नंतर साजूक तूपात काळीमिरी, जिरे, हिंग, हळदीची फोडणी करु न ती खिचडीवर ओतली जाते. शेवटी तळलेले काजू त्यावर घातले जातात. म्हटलं तर नैवेद्य आणि म्हटलं तर एक पाचक खिचडी देखील. दक्षिण भारतात याच पोंगलचे विविध प्रकार नैवेद्य म्हणून केले जातात.मूगडाळ, तांदूळ, गुळ, पोहे, ओले खोबरे यांच्या वेगळ्या चवींचं गोड पोंगल देखील बनवले जातात.

 

 

3) मुरमु-याचा लाडूमुरमु-याचा लाडू हा अत्यंत सोपा आणि झटपट तयार होणारा पदार्थ तामिळनाडूत नैवेद्याचा पदार्थ म्हणून ओळखला जातो. एक कप गुळात अर्धा कप पाणी घालून त्याचा पाक तयार करु न त्यात मुरमुरे घालून त्याचे लाडू वळून त्याचा नैवेद्य दाखिवला जातो. आपल्या महाराष्ट्रात हे लाडू लग्न किंवा मौंजीच्या रूखवतात ठेवले जातात..तेच लाडू दक्षिण भारतातही बनवले जातात. खाद्य संस्कृती या भौगोलिक सीमांमध्ये अडकत नाही, नाही का !!! 

 

4) पायसमसोप्या भाषेत सांगायचं तर खीर. दक्षिण भारतात नवरात्रौत्सवात विविध खिरींचा नैवेद्य दाखिवला जातो. शेंगोळ्यांची खीर हा त्यातल्या त्यात खिरीचा किंवा पायसमचा वेगळा प्रकार दक्षिण भारतात पाहायला मिळतो. तांदळाच्या पीठाची उकड काढून गुळाच्या उकळत्या पाकात या उकडीच्या शेवया घालून उकळल्या जातात. नंतर साजूक तूप आणि खसखस पूड घालून खीर आणखी आटवून नैवेद्यासाठी ठेवली जाते. याचप्रकारे गव्हाच्या कणकेचे शेंगोळे देखील गुळाच्या पाकात उकळून त्याचीही खीर केली जाते. शिवाय जोडीला शेवया, तांदूळ, रवा, गाजर, साबुदाणा, लाल भोपळा यांची खीर देखील नवरात्रात बनवली जाते.

 

 

 

5) पुलिहोराभाताचा हा प्रकार दक्षिण भारतातील नैवेद्याच्या पदार्थांमधील एक विशेष आणि प्रमुख पदार्थ आहे. येथेही पुन्हा महाराष्ट्राशी थोडी नाळ जोडल्यासारखी वाटते. महाराष्ट्रात सणावारी मसालेभात बनवला जातो, तसा दक्षिण भारतात पुलिहोरा. पुलिहोरासाठी तांदळाचा भात मोकळा शिजवून घेतला जातो. नंतर चिंचेचा कोळ काढून त्यात गूळ मिक्स करून घेतला जातो. तेलात हिंग, मोहरी, जिरे, साबूत लाल मिरची, उडीद डाळ, चणा डाळ, शेंगदाणे यांची खमंग फोडणी करून त्यात चिंचेचा कोळ, हळद, आवडत असल्यास थोडा गरम मसाला घालूून चांगले परतवून शिजवलेला भात घातला जातो. चिंचेचा भात म्हणूनही हा भात ओळखला जातो. याच भाताला आणखी क्र ंची चव देण्यासाठी काळिमरी पावडर तसेच भाजलेल्या तीळाची पूडही घातली जाते.