शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

एक ग्लासभर जिर्याचं पाणी प्यायल्यास दिवसभर पोटाच्या विकारापासून सुटका होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 19:30 IST

सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास जिर्याचं पाणी प्यायल्यास अ‍ॅसिडिटी, पोटफुगी, जळजळ, मळमळ , अपचन यासरख्या त्रासातून मुक्तता तर होतेच शिवाय शरीराची सर्व कामं वेळेच्या वेळी उत्तम पार पडतात.

ठळक मुद्दे* जिर्याच्या पाण्याचा पोटासाठी खूप उपयोग होतो.* बाळांतपणानंतर दूध येण्यासाठीही जिर्याच्या पाण्याचा उपयोग होतो.* शरीरातील रोगप्रतिकारक व्यवस्थेचं काम जिर्याच्या पाण्याच्या सेवनानं सुधारतं.

- माधुरी पेठकर.अ‍ॅसिडिटी, पोटफुगी, जळजळ, मळमळ , अपचन यासारखे पोटाचे विकार दिसायला छोटे दिसतात. पण दिवसाचे चोवीस तास बेजार करतात. दिवसभर या त्रासांनी त्रस्त राहण्याापेक्षा दिवसाच्या सुरूवातीलाच त्यावर उपाय केला तर?याउपायासाठी स्वयंपाकघरातील जिरे मोठं काम करतात. त्यासाठी करायचं एकच. सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास पाणी घ्यावं. त्यात थोडे जीरे घालून पाणी चांगलं उकळावं. पाणी चांगलं उकळलं की गॅस बंद करावा. पाणी गार होवू द्यावं. आणि रिकाम्या पोटी हे पाणी प्यावं. एक ग्लासभरून जिर्याचं पाणी घेतल्यास अनेक फायदे होतात.

 

जिर्याचं पाणी प्यावं कारण..1) जिर्याच्या पाण्याचा पोटासाठी खूप उपयोग होतो. अपचन, पित्त, पोटफुगी यापासून आराम मिळतो. जिर्याचं पाणी वेदनाशामक म्हणूनही काम करतं. पोटातल्या चमका, ओटीपोटातल्या वेदना या पाण्यामुळे बर्या  होतात.2) गर्भावस्थेत जिर्याच्या पाण्याचा पचनासाठी मोठा उपयोग होतो.  कार्बोहायड्रेटस आणि फॅटसच्या पचनासाठी उपयुक्त विकरांना प्रोत्साहन देण्याचं काम जिर्याचं पाणी करतं आणि या अवस्थेत पचनाचे विकार होत नाही.3) बाळांतपणानंतर दूध येण्यासाठीही जिर्याच्या पाण्याचा उपयोग होतो. स्तनातील दूधग्रंथी या पाण्यामुळे कार्यरत होवून मातेच्या दूधाचं प्रमाण वाढतं.4) रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात जीरे मोठी भूमिका पार पाडतात. शरीरातील रोगप्रतिकारक व्यवस्थेचं काम जिर्याच्या पाण्याच्या सेवनानं सुधारतं. हे पाणी जर नियमित सेवन केलं तर आजारी पडण्याचं प्रमाण खूपच कमी होतं.5) सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी जिर्याचं पाणी नियमितपणे प्यायल्यास त्याचा उपयोग रक्तातील साखर कमी करण्यास होतो.6) श्वसविकारात जिर्याचं पाणी उपयुक्त ठरतं. श्वसननलिकेतले अडथळे हे पाणी काढून टाकतं. तसेच छातीत चिकट स्त्राव साठू देत नाही. त्याचा फायदा दम्याच्या रूग्णांना होतो.7) जिर्यामध्ये पोटॅशिअम असतं. हे खनिज शरीराच्या क्रिया उत्तम पार पाडण्यात उपयोगी असतं. रक्तातील मीठाचे नकारात्मक परिणाम घालवून रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचं काम जिर्याचं पाणी करतं.8) ज्यांना कोणाला दिवसभर मलूल वाटत असतं त्यांची ऊर्जा ही जिर्याच्या पाण्यानं वाढू शकते.9) जिर्याचं पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतं. जिर्याच्या पाण्यामुळे किडनीचं काम सुधारतं.