शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
3
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
4
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
5
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
6
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
7
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
8
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
9
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
10
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
11
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
12
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
13
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
14
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
15
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
16
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
17
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
18
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
19
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
20
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?

एक ग्लासभर जिर्याचं पाणी प्यायल्यास दिवसभर पोटाच्या विकारापासून सुटका होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 19:30 IST

सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास जिर्याचं पाणी प्यायल्यास अ‍ॅसिडिटी, पोटफुगी, जळजळ, मळमळ , अपचन यासरख्या त्रासातून मुक्तता तर होतेच शिवाय शरीराची सर्व कामं वेळेच्या वेळी उत्तम पार पडतात.

ठळक मुद्दे* जिर्याच्या पाण्याचा पोटासाठी खूप उपयोग होतो.* बाळांतपणानंतर दूध येण्यासाठीही जिर्याच्या पाण्याचा उपयोग होतो.* शरीरातील रोगप्रतिकारक व्यवस्थेचं काम जिर्याच्या पाण्याच्या सेवनानं सुधारतं.

- माधुरी पेठकर.अ‍ॅसिडिटी, पोटफुगी, जळजळ, मळमळ , अपचन यासारखे पोटाचे विकार दिसायला छोटे दिसतात. पण दिवसाचे चोवीस तास बेजार करतात. दिवसभर या त्रासांनी त्रस्त राहण्याापेक्षा दिवसाच्या सुरूवातीलाच त्यावर उपाय केला तर?याउपायासाठी स्वयंपाकघरातील जिरे मोठं काम करतात. त्यासाठी करायचं एकच. सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास पाणी घ्यावं. त्यात थोडे जीरे घालून पाणी चांगलं उकळावं. पाणी चांगलं उकळलं की गॅस बंद करावा. पाणी गार होवू द्यावं. आणि रिकाम्या पोटी हे पाणी प्यावं. एक ग्लासभरून जिर्याचं पाणी घेतल्यास अनेक फायदे होतात.

 

जिर्याचं पाणी प्यावं कारण..1) जिर्याच्या पाण्याचा पोटासाठी खूप उपयोग होतो. अपचन, पित्त, पोटफुगी यापासून आराम मिळतो. जिर्याचं पाणी वेदनाशामक म्हणूनही काम करतं. पोटातल्या चमका, ओटीपोटातल्या वेदना या पाण्यामुळे बर्या  होतात.2) गर्भावस्थेत जिर्याच्या पाण्याचा पचनासाठी मोठा उपयोग होतो.  कार्बोहायड्रेटस आणि फॅटसच्या पचनासाठी उपयुक्त विकरांना प्रोत्साहन देण्याचं काम जिर्याचं पाणी करतं आणि या अवस्थेत पचनाचे विकार होत नाही.3) बाळांतपणानंतर दूध येण्यासाठीही जिर्याच्या पाण्याचा उपयोग होतो. स्तनातील दूधग्रंथी या पाण्यामुळे कार्यरत होवून मातेच्या दूधाचं प्रमाण वाढतं.4) रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात जीरे मोठी भूमिका पार पाडतात. शरीरातील रोगप्रतिकारक व्यवस्थेचं काम जिर्याच्या पाण्याच्या सेवनानं सुधारतं. हे पाणी जर नियमित सेवन केलं तर आजारी पडण्याचं प्रमाण खूपच कमी होतं.5) सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी जिर्याचं पाणी नियमितपणे प्यायल्यास त्याचा उपयोग रक्तातील साखर कमी करण्यास होतो.6) श्वसविकारात जिर्याचं पाणी उपयुक्त ठरतं. श्वसननलिकेतले अडथळे हे पाणी काढून टाकतं. तसेच छातीत चिकट स्त्राव साठू देत नाही. त्याचा फायदा दम्याच्या रूग्णांना होतो.7) जिर्यामध्ये पोटॅशिअम असतं. हे खनिज शरीराच्या क्रिया उत्तम पार पाडण्यात उपयोगी असतं. रक्तातील मीठाचे नकारात्मक परिणाम घालवून रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचं काम जिर्याचं पाणी करतं.8) ज्यांना कोणाला दिवसभर मलूल वाटत असतं त्यांची ऊर्जा ही जिर्याच्या पाण्यानं वाढू शकते.9) जिर्याचं पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतं. जिर्याच्या पाण्यामुळे किडनीचं काम सुधारतं.