मराठमोळ्या या अभिनेत्री घटस्फोटानंतरही जगताहेत आनंदी आयुष्य, पाहा कोण आहेत त्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 08:00 AM2023-06-11T08:00:00+5:302023-06-11T08:00:01+5:30

मराठी कलाविश्वात अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी थाटामाटात लग्न केले. पण काही कारणांनी त्यांचे लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही आणि त्या जोडीदारापासून विभक्त झाल्या.

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने १६ डिसेंबर २०१२ रोजी बिझनेसमन भूषण भोपचेशी लग्न केले आणि काही वर्षांनी त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री गेल्या काही काळापासून अविवाहित आहे.

तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सई ताम्हणकर आणि अमेय गोसावीने २०१३ मध्ये लग्न केले. लग्नाच्या दोनच वर्षात या दोघाचं एकमेकांसोबत बिनसले होते आणि ते वेगळे झाले.

पल्लवी पाटीलने संग्राम समेळसोबत २०१६ मध्ये लग्न केले. पण त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. अचानक त्यांचा घटस्फोट झाला. संग्रामने २०२१ मध्ये दुसरे लग्न केले.

अभिनेत्री मयुरी वाघ हिने २०१७ मध्ये पियुष रानडेशी लग्न केले. हे मयुरीचे पहिले आणि पियुषचे दुसरे लग्न होते. मयुरी नंतर पियुषपासून वेगळी झाली आणि सध्या ती अविवाहित आहे.

स्नेहा वाघ खूप कमी वयाची असताना म्हणजे १९ व्या वर्षी लग्नबंधनात अडकली होती. अविष्कार दार्वेकरसह तिने लग्न केले. मात्र ती कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडली. यानंतर तिने २०१५ साली अनुराग सोळंकी सोबत दुसरे लग्न केले. अनराग इंटिरियर डिझायनर आहे. मात्र हे लग्नही केवळ आठ महिनेच टिकले.

नृत्यांगना आणि अभिनेत्री मानसी नाईकने प्रदीप खरेरासोबत जानेवारी २०२१मध्ये लग्न केले आणि लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाआधीच दोघे वेगळे झाले. सध्या मानसी सिंगल लाइफ जगत आहे.

अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांनी २०१४ मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले आणि त्यांनी लग्नाच्या सहा महिन्यांतच घटस्फोटाची घोषणा केली तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. २०१५ मध्ये हे जोडपे वेगळे झाले. तेव्हापासून तेजश्री अविवाहित आहे. शशांकने दुसरे लग्न केले.