रीना रॉय यांचं दु:खं बघून शत्रुघ्न सिन्हा मदतीसाठी आले होते धावून, पाकिस्तानात केला होता फोन आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 04:17 PM2023-01-18T16:17:03+5:302023-01-18T16:30:02+5:30

Shatrughan Sinha And Reena Roy Real Story: शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय यांच्या लव्हस्टोरीची खूप चर्चा होत असते. असे अनेक दावे केले जातात की, दोघेही एकमेकांना 7 वर्ष डेट करत होते. पण शेवटी दोघेही एक होऊ शकले नाहीत.

एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्री रीन रॉय यांच्या जीवनाशी संबंधित अनेक वेदनादायी गोष्टी आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष केला आणि शेवटी त्यांनी बॉलिवूड सोडलं. मीडियात आजही अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय यांच्या लव्हस्टोरीची खूप चर्चा होत असते. असे अनेक दावे केले जातात की, दोघेही एकमेकांना 7 वर्ष डेट करत होते. पण शेवटी दोघेही एक होऊ शकले नाहीत.

शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत ब्रेकअप झाल्यावर रीना यांच्या आयुष्यात त्यावेळचे प्रसिद्ध क्रिकेटर मोहसिन खान आले होते. नंतर दोघांनी 1983 मध्ये लग्न केलं आणि लग्नानंतर रीना पाकिस्तानला गेल्या. त्यांचा सुखी संसार सुरू होता.

लग्नानंतर रीना आणि मोहसिन यांना एक मुलगी झाली. तिचं नाव त्यांनी जन्नत ठेवलं. पण मुलीच्या जन्माच्या काही वर्षानी 1990 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला गेला की, रीना पतीच्या लाइफस्टाईलसोबत स्वत:ला जुळवून घेऊ शकत नव्हती.

घटस्फोटानंतर रीनाची मुलगी जन्नतची कस्टची पती मोहसिनकडे होती. नंतर रीना भारतात परत आल्या. पण त्यांना काहीही करून आपल्या मुलीची कस्टडी हवी होती. त्यांनी मुलीला भारतात आणण्याचे सगळे प्रयत्न सुरू ठेवले. तेव्हाच याची माहिती शत्रुघ्न सिन्हा यांना मिळाली.

रीना याचं दु:खं समजून घेत ते त्यांच्या मदतीसाठी समोर आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शत्रुघ्न सिन्हा पाकिस्तानचे माजी राष्ट्रपति जनरल जियाउल हक यांच्या मुलीचे चांगले मित्र होते. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांचं त्यांच्या घरी येणं-जाणं होतं.

शत्रुघ्न सिन्हा यांना जेव्हा रीना यांच्या समस्येबाबत समजलं तर त्यांनी जियाउल हक यांना सगळी काही सांगितलं. त्यांनी जियाउल हक यांना विनंती केली की, रीनाला तिच्या मुलीची कस्टडी मिळावी. नंतर जियाउल हक यांनी शत्रुघ्न सिन्हा यांची विनंती मान्य करत जन्नतची कस्टडी रीना रॉय यांना मिळवून दिली.

नंतर रीनाने जन्नतचं नाव बदलून सनम ठेवलं. भारतात परत आल्यावर रीना यांनी बॉलिवूडमध्ये पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पण यात त्यांना फारसं यश मिळालं नाही. त्यामुळे त्या बॉलिवूडपासून पुन्हा दूर गेल्या. आता त्या मुलीसोबत मिळून मुंबईत अॅक्टिंग क्लासेस घेतात.