Samantha Ruth Prabhu : आयुष्य K3G सारखं नाही तर KGF सारखं असतं..., म्हणून सामंथाचं लग्न मोडलं...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 03:56 PM2022-07-03T15:56:46+5:302022-07-03T16:07:32+5:30

Samantha Ruth Prabhu : 'हे' होतं समंथाच्या घटस्फोटामागचं कारण; करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 7’ या आगामी शोमध्ये स्वत:चं केला खुलासा

सामंथा रूथ प्रभु ही साऊथची बडी अभिनेत्री. आता केवळ साऊथमध्येच नाही तर देशभर तिचे चाहते आहेत. या ना त्या कारणाने ती सतत चर्चेत असते.

गेल्या काही महिन्यात तर सामंथाची बरीच चर्चा झाली. कारण म्हणजे तिचा घटस्फोट. साऊथ इंडस्ट्रीतील अभिनेता नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेत असल्याची घोषणा करत तिने चाहत्यांना मोठा धक्का दिला होता.

2017 मध्ये सामंथा व नागा चैतन्यचं गोव्यात धुमधडाक्यात लग्न झालं होतं. मात्र, अवघ्या चार वर्षांच्या संसारानंतर दोघांनाही विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

सामंथा व नागा यांच्यात असं काय बिनसलं हे कळायला मार्ग नव्हता. यावरून वेगवेगळ्या चर्चा रंगल्या. पण आता या घटस्फोटामागचं नेमकं कारण समोर आलं आहे.

होय, करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 7’ या आगामी शोमध्ये सामंथाने याबद्दलचा खुलासा केला. ‘कॉफी विद करण 7’चा एक प्रोमो रिलीज झाला आहे आणि यात सामंथा लग्नाबद्दल बोलताना दिसतेय.

लग्न का अपयशी होतात, यावर ती बोलतेय. लग्न अपयशी होण्याचं कारण म्हणजे आपण आयुष्याला K3G (कभी खुशी कभी गम) समजतो. पण प्रत्यक्ष आयुष्य KGF सारखं असतं, असं सामंथा यावेळी म्हणाली.

सामंथाच्या या विधानावर करण जोहर खळखळून हसला. सामंथाही हसली. पण एकप्रकारे ती तिच्या घटस्फोटामागचं करण सांगून गेली. तिने अत्यंत सूचकपणे घटस्फोटाविषयी भाष्य केलं.

काही वर्ष एकमेकांना डेट केल्यावर 2017 साली सामंथा व नागा चैतन्य यांचं लग्न झालं होतं. गोव्यात थाटामाटात हे लग्न पार पडलं होतं. जेवढी लग्नाची चर्चा झाली, तेवढीच त्यांच्या हनीमूनचीही चर्चा झाली होती.

दोघेही तब्बल 40 दिवस हनीमूनला गेले होते. 40 दिवस जगातील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत त्यांनी हनीमून एन्जॉय केलं होतं. चार वर्ष दोघांचाही सुखात संसार सुरू होता. पण गेल्या वर्षभरात दोघांमधील मतभेद वाढले होते.