जिनिलियाने लग्नाआधी रितेश देशमुखसमोर ठेवली होती 'ही' अट, म्हणाली - "मी लग्न करेन पण…"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 04:01 PM2023-08-05T16:01:08+5:302023-08-05T16:07:50+5:30

Riteish Deshmukh- Genelia Deshmukh : रितेश-जेनेलिया या जोडीचे बॉलिवूडमध्ये तुझे मेरी कसम या चित्रपटातून पदार्पण झाले. या चित्रपटानंतर दोघांची लव्हस्टोरीदेखील सुरु झाली, मात्र लग्न करण्याआधी जिनिलियाने रितेशसमोर एक अट ठेवली होती.

रितेश देशमुख आणि जिनिलिया ही बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडीपैकी एक आहे. रितेश आणि जिनिलियाचे ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण झाले. या चित्रपटानंतर दोघांची लव्हस्टोरीदेखील सुरु झाली, मात्र लग्न करण्याआधी जिनिलीयाने रितेशसमोर एक अट ठेवली होती.

रितेश आणि जिनिलीया देशमुख हे कपल कायमच चर्चेत असतात. एका मुलाखतीत रितेशने जिनिलियाला मागणी कशी घातली, याबद्दल सांगितले. रितेश म्हणाला की, जिनिलियाने मला सांगितले की लग्न ठरले मात्र तू जोपर्यंत मला प्रपोज करत नाहीस. तोपर्यंत मी मंडपात येणार नाही.

यावर जिनिलीयाने उत्तर दिले की आम्ही बरीच वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो. आम्ही यात कसे पडलो आमचे आम्हाला कळले नाही. आम्ही लग्नापर्यंत हेच सांगत होतो की आम्ही मित्र आहोत. मात्र मी रितेशला सांगितले की मला प्रपोजल हवे आहे. पुढे जाऊन मी माझ्या मुलांना काय सांगू? त्यावर रितेशने उत्तर दिले की मी लग्नाच्या पाच दिवस आधी तिला म्हणालो मी तुला ताज हॉटेलात घेऊन जातो.

रितेश पुढे म्हणाला, आम्ही ताज समोर उतरलो आणि तिथे एक बोट होती त्यात आम्ही दोघे बसलो. माझ्या मित्राची बोट होती त्यावर आम्ही गेलो संध्याकाळची वेळ होती, त्यावेळी आम्ही कधीच वांद्रे परिसरात भेटायचो नाही.आम्ही काही टाऊन भागात भेटायचो कारण कोणी बघू नये म्हणून, बोटीत आम्ही बसलो मी तिच्यासमोर आमच्या आवडीचा पिझ्झा ठेवला.

आम्ही मरिन ड्राईव्हपर्यंत आलो तिथून मी माझ्या मित्राला मेसेज केला तो मरिन ड्राईव्ह परिसरात राहत होता. त्याने त्याच्या घरावरून फटाके फोडले आणि मी जिनिलीयाला सांगितलं की हे सगळं तुझ्यासाठी, माझ्याशी लग्न करशील का? असे रितेशने सांगितले.

रितेश आणि जिनिलिया देशमुखने ३ फेब्रुवारी २०१२ रोजी विवाहबंधनात अडकले. त्यांना दोन मुले आहेत. लग्नानंतर बराच काळ जिनिलिया सिनेइंडस्ट्रीतून गायब होती. मात्र नुकतेच तिने वेड चित्रपटातून दमदार कमबॅक केले आहे. तसेच तिने या चित्रपटातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.