दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 17:22 IST2025-07-30T17:21:36+5:302025-07-30T17:22:56+5:30

Jaya Bachchan : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनीही ऑपरेशन सिंदूरबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले.

Terrorists wiped out the Sindoor, so why is the operation called 'Sindoor'? Jaya Bachchan's pointed question in Rajya Sabha | दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल

दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनीही ऑपरेशन सिंदूरबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. जया बच्चन (Jaya Bachchan) म्हणाल्या की, सरकारने दहशतवाद संपवण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले?

पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर बोलताना जया बच्चन यांनी सर्वात आधी या घटनेत बळी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. त्या म्हणाल्या की, दहशतवादी कसे आले आणि इतके लोक कसे मारले. त्या घटनेबद्दल मला खूप दुःख आहे. पुढे जया बच्चन म्हणाल्या, ''सर, सर्वप्रथम मी तुमचे अभिनंदन करू इच्छिते की तुम्ही अशा लेखकांना ठेवले आहे जे मोठी नावे देतात. तुम्ही हे नाव सिंदूर का ठेवले? लोकांचे सिंदूर नष्ट झाले. ज्यांना मारले गेले, ज्यांच्या बायका मागे राहिल्या. कृपया. तुम्ही बोला.''

जया बच्चन पुढे म्हणाल्या, ''जे यात्रेकरू गेले होते, ते कशासाठी गेले होते? ३७० हटवल्यानंतर छाती ठोकून राज्यसभेत असे म्हटले होते की दहशतवाद संपेल. आम्ही वचन देतो. मग त्याचे काय झाले? हे यात्रेकरू त्या विश्वासाने गेले. तुम्ही त्यांना वचन दिले होते. आम्ही काश्मीरला जात आहोत. आपल्यासाठी ते स्वर्ग आहे. त्या लोकांना काय मिळालं? सर, तुम्ही ज्या लोकांना स्वर्गाचे वचन दिले होते त्यांचा विश्वास तुम्ही तोडला आहे. तुम्ही २५ जीव वाचवू शकला नाहीत. ती कुटुंबं तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत. तुमच्या लोकांमध्ये इतकी नम्रता नाही की तुम्ही त्यांच्या कुटुंबांची माफी मागितली. आम्ही चूक केली. कृपया आम्हाला माफ करा. आम्ही तुम्हाला सुरक्षित ठेवले पाहिजे होते. सरकार तुम्हाला सुरक्षित ठेवेल हे आमचे कर्तव्य होते.'' 
 

Web Title: Terrorists wiped out the Sindoor, so why is the operation called 'Sindoor'? Jaya Bachchan's pointed question in Rajya Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.