शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

तरुण मुलं म्हणतात, अ‍ॅक्सिडण्ट झाला तरच गाडी चालवताना फोनवर बोलणं थांबवू!

By admin | Updated: July 14, 2017 15:59 IST

गाडी चालवताना फोनवर बोलू नये हे सगळ्यांनाच कळतं, मग तरी लोक का बोलतात फोनवर?

- चिन्मय लेलेगाडी चालवताना, मान वाकडी करुन, कानात इअर फोनच्या वायरी खुपसून फोनवर बोलू नये हे सगळ्यानांच माहिती असतं. फोनवर बोलत बोलत गाडी चालवू नये, मान तिरकी करकरुन बोलू नये हा तर काय कॉमन सेन्सच आहे. मुळात गाडी चालवताना फोनवर बोलावं असा काय अर्जण्ट फोन कॉल आपल्याला येत असतो? आणि एखादा फोनजर इतकाच अर्जण्ट असेल तर गाडी बाजूला घ्यावी, शांतपणे त्या फोनवर काय बोलायचं ते बोलून घ्यावं आणि मग पुन्हा गाडी चालवावी हे सांगायला कुणी तज्ज्ञ कशाला हवा? पण नाही जगभरातच लोक फोनवर बोलण्यासाठी इतके आतूर असतात की, गाडी चालवताना थोडंसं दुर्लक्ष झालं तरी त्यात आपला जीव जावू शकतो हे त्यांच्या लक्षातही येत नाही. आणि हे फक्त आपल्याचकडे होत असं नाही, जगभरातल्या तरुणांना विचारा की, गाडी चालवताना फोन वापरणं कधी थांबवाल, उत्तर एकच, आमचा फोनवर बोलताना अ‍ॅक्सिडण्ट झाला तरच!

अलिकडेच लंडनमध्ये एक सर्व्हे करण्यात आला. त्याचं नाव होतं बी स्मार्टफोन कॅम्पेन. म्हणजे काय तर स्मार्ट फोन वापरताना जरा स्मार्ट व्हा. लंडनमध्ये राहणाऱ्या विविध देशातल्या, विविध धर्मा-वंशाच्या आणि स्थानिक ब्रिटिश तरुणांनाही हाच एक प्रश्न विचारण्यात आला की, गाडी चालवताना फोनवर बोलू नये हे तुम्हाला मान्य आहे का? आणि असेल तर तुम्ही का बोलता फोनवर?त्यावर १० टक्के मुलांनी सांगितलं की, गाडी चालवताना फोनवर बोलू नये असं आम्हाला वाटतं, पण अनेकदा सवयीनं बोलतो. ही सवय मोडायला हवी हे आम्हाला मान्यच आहे.उरलेल्या ३० टक्केंचं म्हणणं की, त्यात काय एवढं, आमचा गाडीवर उत्तम कण्ट्रोल असतो. काही बिघडत नाही बोललं तर? लगेच काय अपघात होत नाही.उरलेले ६० टक्के तर म्हणतात की, बोलू नये हे कळतंच आम्हाला. पण जोवर आमचा गाडी चालवत फोनवर बोलताना अ‍ॅक्सिडण्ट होत नाही, तोवर मात्र आम्ही असंच वागू. झालाच अपघात तर पुढचं पुढे!आता अशी बेर्पवाई असेल तर कुठं कुणाला सामान्य ज्ञान शिकवायचं आणि कुठं कायद्याचे धाक दाखवायचे नाही का? मनाचा ब्रेकच लागत नाही तिथं कोण काय करू शकतं?