शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

तुम्हाला पावसाळ्याची अ‍ॅलर्जी आहे का?-हे वाचा

By admin | Updated: July 1, 2017 16:54 IST

पावसाळ्यात अनेकांना अ‍ॅलर्जी छळतात, तेव्हा काही पत्थ्यं पाळा.

-निशांत महाजनपाऊस खरंतर किती हवाहवासा. अत्यंत तजेला देणारा. मस्त पावसात भटकंतीची मौज देणारा ऋतू. पण आपल्याकडची अस्वच्छता, बिघडलेलं पर्यावरण, साथीचे आजार, साचणारं पाणी, वाढलेले डास यासाऱ्यांमुळे अनेकांना पावसाळी अ‍ॅलर्जी छळतात. आणि मग त्यांना नको तो पावसाळा असा जीवघेणा त्रास होतो. पावसाळी अ‍ॅलर्जीचं प्रमाण आपल्याकडे बरंच मोठं आहे. त्यात अ‍ॅलर्जी नक्की कशापासून येते हे आपण चटकन शोधू शकत नाही. त्यामुळे हा त्रास सहन करतच रहावा लागतो. त्यावर उपाय हा की, आपणच काही गोष्टी पावसाळ्यात नियमित कराव्यात.सगळ्यात महत्वाचं म्हणजे पावसाळ्यात कुठले त्रास होतात याची नोंद ठेवणं. डोळे येणं, अंगावर पुरळ, ड्राय स्किन, सर्दी, कफ, सतत जुलाब किंवा पोट साफ न होणं, अंगावर पित्त उभारणं, हातापायांची सालं निघणं असे अनेक त्रास नियमित संभवतात. आपल्याला यापैकी कुठला त्रास नियमित होतो याकडे लक्ष ठेवून योग्य डॉक्टरचा सल्ला आणि नियमित औषधोपचार करणं इष्ट.मात्र उत्तम सवयी आणि काळजी म्हणून आपण घरच्याघरी काही गोष्टी करु शकतो.

१) पावसाळ्यात नेहमी गरम अन्न खावं. शिळं, थंड, फ्रोजन, पुन्हा पुन्हा तळलेलं अन्न खावू नये.२) पचायला हलका आहार घ्यावा.३) बाहेरचं शक्यतो अजिबात खावू नये. तेलकट, अतीमसालेदार, मासांहार टाळणंच उत्तम.४) पाणी नियमित आणि कोमट करुनच प्यावं. गार पाणी पिऊ नये.५) अस्थमा असेल, दम्याचा त्रास असेल, खोकला, सर्दी, पायदुखी, हातापायांत पेटके येणं, मुंग्या येणं, हातपाय वाकडे होणं, सांधेदुखी यासाऱ्यांची नियमित औषधं घ्या. डोस चुकवू नका.६) स्वच्छता ही फार सामान्य गोष्ट आहे.पण ती पाळली जात नाही. काहीजण स्वच्छ हातपायही धुवूत नाहीत. त्यामुळे स्वच्छता पाळा. आपलं घर, अवतीभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवा.