शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
5
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
6
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
8
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
9
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
10
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
11
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
12
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
13
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
14
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
15
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
16
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
17
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
18
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
19
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
20
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा

तुम्हाला पावसाळ्याची अ‍ॅलर्जी आहे का?-हे वाचा

By admin | Updated: July 1, 2017 16:54 IST

पावसाळ्यात अनेकांना अ‍ॅलर्जी छळतात, तेव्हा काही पत्थ्यं पाळा.

-निशांत महाजनपाऊस खरंतर किती हवाहवासा. अत्यंत तजेला देणारा. मस्त पावसात भटकंतीची मौज देणारा ऋतू. पण आपल्याकडची अस्वच्छता, बिघडलेलं पर्यावरण, साथीचे आजार, साचणारं पाणी, वाढलेले डास यासाऱ्यांमुळे अनेकांना पावसाळी अ‍ॅलर्जी छळतात. आणि मग त्यांना नको तो पावसाळा असा जीवघेणा त्रास होतो. पावसाळी अ‍ॅलर्जीचं प्रमाण आपल्याकडे बरंच मोठं आहे. त्यात अ‍ॅलर्जी नक्की कशापासून येते हे आपण चटकन शोधू शकत नाही. त्यामुळे हा त्रास सहन करतच रहावा लागतो. त्यावर उपाय हा की, आपणच काही गोष्टी पावसाळ्यात नियमित कराव्यात.सगळ्यात महत्वाचं म्हणजे पावसाळ्यात कुठले त्रास होतात याची नोंद ठेवणं. डोळे येणं, अंगावर पुरळ, ड्राय स्किन, सर्दी, कफ, सतत जुलाब किंवा पोट साफ न होणं, अंगावर पित्त उभारणं, हातापायांची सालं निघणं असे अनेक त्रास नियमित संभवतात. आपल्याला यापैकी कुठला त्रास नियमित होतो याकडे लक्ष ठेवून योग्य डॉक्टरचा सल्ला आणि नियमित औषधोपचार करणं इष्ट.मात्र उत्तम सवयी आणि काळजी म्हणून आपण घरच्याघरी काही गोष्टी करु शकतो.

१) पावसाळ्यात नेहमी गरम अन्न खावं. शिळं, थंड, फ्रोजन, पुन्हा पुन्हा तळलेलं अन्न खावू नये.२) पचायला हलका आहार घ्यावा.३) बाहेरचं शक्यतो अजिबात खावू नये. तेलकट, अतीमसालेदार, मासांहार टाळणंच उत्तम.४) पाणी नियमित आणि कोमट करुनच प्यावं. गार पाणी पिऊ नये.५) अस्थमा असेल, दम्याचा त्रास असेल, खोकला, सर्दी, पायदुखी, हातापायांत पेटके येणं, मुंग्या येणं, हातपाय वाकडे होणं, सांधेदुखी यासाऱ्यांची नियमित औषधं घ्या. डोस चुकवू नका.६) स्वच्छता ही फार सामान्य गोष्ट आहे.पण ती पाळली जात नाही. काहीजण स्वच्छ हातपायही धुवूत नाहीत. त्यामुळे स्वच्छता पाळा. आपलं घर, अवतीभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवा.