शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

Success Story: तब्बल ३५ परीक्षांचे अपयश पचवले, हार नाही मानली; अखेर वर्धन यांचा 'विजय' झाला, IAS पदी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 15:00 IST

देशाच्या कानाकोपऱ्यातील परीक्षार्थी या परीक्षेसाठी तयारी करत असतात. या परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी रात्रंदिवस ते मेहनत घेत असतात...

UPSC Success Story: युपीएससीची परीक्षा देशातील सर्वात अवघड परीक्षा मानले जाते. या परीक्षेतून देशातील सर्वोत्तम अधिकारी निवडले जातात. त्यामध्ये IAS, IPS, IFS, IIS आणि अशा अनेक पोस्टसाठी अधिकारी निवडले जातात. देशात लोकसेवा नागरी परीक्षेद्वारे एकूण २४ पोस्टसाठी अधिकारी निवडले जातात. देशाच्या प्रशासनाची भिस्त या अधिकाऱ्यांवर असते. त्यामुळे ही परीक्षा पास होऊन देशसेवा करण्याची इच्छा देशातील लाखो तरुणांची असते. पण इथली स्पर्धा पाहता यामध्ये खूपच कमी लोक यशस्वी होतात. लाखो परीक्षार्थींमधून जवळपास १ हजार परीक्षार्थींची निवड केली जाते. 

देशाच्या कानाकोपऱ्यातील परीक्षार्थी या परीक्षेसाठी तयारी करत असतात. या परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी रात्रंदिवस ते मेहनत घेत असतात. अशा परीक्षार्थींसाठी आयएएस विजय वर्धन यांची यशोगाथा मोठी प्रेरणा देऊन जाते. तब्बल ३५ परीक्षांमध्ये अपयश येऊनही न थकता, न हार मानता तो लढला आणि जिंकलाही. विजय वर्धन यांनी विविध सरकारी परीक्षा दिल्या होत्या. त्यामध्ये त्यांना वारंवार अपयश येत होते. अखेर वर्धन यांनी त्यांची सगळी जिद्द पणाला लावली आणि ते IPS झाले. त्यानंतर त्यांनी नंतर युपीएससीची परीक्षा दिली आणि अखेर ते IAS झाले. (Success Story Of IAS Vijay Wardhan)

तब्बल ३५ परीक्षांमध्ये अपयश तरीही हार नाही मानली अन्-

मूळचे हरियाणाचे असलेले विजय वर्धन यांचे शालेय शिक्षण हरियाणातील सिरसा येथे झाले. त्यानंतर वर्धन यांनी हिस्सारमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग केले. अभियांत्रिकीची पदवी मिळवल्यानंतर UPSC ची तयारी करण्यासाठी दिल्ली गाठली. युपीएससीची (UPSC Exam) तयारी करत असताना वर्धन यांनी इतर शासकीय जागांसाठी असणाऱ्या परीक्षा आणि राज्य सेवेच्या परीक्षाही दिल्या. त्यामध्ये हरियाणा राज्यासाठी असणारी पीसीएस, एसएससी आणि सीजीएल अशा ३५ परीक्षांचा समावेश आहे. या सर्व परीक्षांमध्ये त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. तब्बल पाच वेळा युपीएससीची परीक्षा देऊनही त्यांना अपयश येत होते. तरीही त्यांनी त्यांचे प्रयत्न सोडले नव्हते. त्यानंतर विजय वर्धन यांनी अधिक जोमाने परीक्षेची तयारी सुरू केली आणि २०१८ ची युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाले. देशात १०४ रँक मिळवून त्यांनी IPS ची पोस्ट मिळवली. (union public service commission)

समाधान न मानता पुढची पायरी सर केली -

IPS  ची पोस्ट मिळवूनही त्यांनी समाधान मानले नाही. त्यानंतरही वर्धन यांनी युपीएससीची तयारी सुरू ठेवली होती. अखेर २०२१ ची परीक्षा देऊन ते ‘आयएएस’ झाले. आयुष्यात वारंवार येणाऱ्या अपयशावर मात करत विजय वर्धन यांनी यशाचे शिखर गाठले. IAS होत त्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले. आयुष्यात कितीही संकटे आणि अपयश आले तर शांत राहून त्यावर मात करता येते हे वर्धन यांच्या यशोगाथावरून दिसते.

"स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा"

इतक्या संकटांवर मात करून यश मिळवल्यानंतर विजय वर्धन यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यावेळी ते म्हणाले, ‘आयष्य मार्गक्रमण करत असताना आपणच आपले सर्वोत्तम मार्गदर्शक असतो. आपण जेंव्हा एखादा निर्णय घेता तेंव्हा त्यावर ठाम राहिले पाहिजे. आपल्या क्षमतेवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. या प्रवासात आपल्या चुकांचे आपणच मूल्यमापन केले पाहिजे आणि धडा घेत राहिले पाहिजे. अखेर आपण आपल्या यशापर्यंत पोहचोतच, अशा भावना वर्धन यांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगHaryanaहरयाणाexamपरीक्षाdelhiदिल्ली