शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

जि.प. रेकॉर्ड्सचे अभिनव ‘भारुड’, ‘झीरो पेडन्सी’ धोरणाला नवसंजीवनी

By राजा माने | Updated: September 29, 2017 05:41 IST

विकासाच्या कामात आणि योजना अंमलबजावणीत राज्यात आघाडी मारत असताना रेकॉर्ड (अभिलेख) जतन पद्धतीचे अभिनव ‘भारुड’ गाजत आहे. त्याचे कर्ते आहेत डॉ. राजेंद्र भारुड !

विकासाच्या कामात आणि योजना अंमलबजावणीत राज्यात आघाडी मारत असताना रेकॉर्ड (अभिलेख) जतन पद्धतीचे अभिनव ‘भारुड’ गाजत आहे. त्याचे कर्ते आहेत डॉ. राजेंद्र भारुड !

ग्रामीण माणसाच्या जीवनात क्रांती आणण्याची क्षमता ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असल्याचे सिद्ध झालेले आहेच. त्या क्रांतीचा आधार हा वेगवेगळ्या कल्पना, प्रशासकीय पद्धती, शासकीय नियम आणि अंमलबजावणीची कार्यपद्धती या अनुषंगाने झालेल्या प्रत्येक कृतीचे वर्षानुवर्षे आदर्श पद्धतीने जतन केलेले रेकॉर्ड (अभिलेख) असते. नेमका हाच आधार ठिसूळ बनल्याचा अनुभव आपल्याला अनेक शासकीय कार्यालयात येतो. त्याचाच परिणाम म्हणून अधिकारी कितीही कार्यक्षम आणि प्रामाणिक असला व कामही कायद्याच्या चौकटीत बसणारे असले तरी ते रेंगाळत राहते. विविध आघाड्यांवर एका जमान्यात राज्यात ३० व्या क्रमांकावर असणाºया जिल्हा परिषदेला राज्यात पहिल्या पाचमध्ये आणण्याची किमया करणाºया जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी याच समस्येवर विशेष काम केले आहे. याच कामामुळे राज्यातील जिल्हा परिषदांच्या सर्वच विभागांचे रेकॉर्ड्स जतन पद्धतीत नवे क्रांतिकारी बदल आणू शकणाºया कार्यपद्धतीचे ‘भारुड’ राज्यात रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.पाच महिन्यात ७१ हजार शौचालयांचे बांधकाम, शौचालयांचे अनुदान आॅनलाईन प्रणालीने वितरणाची सुविधा, राज्यातील वारकºयांच्या जिव्हाळ्याच्या व श्रद्धेच्या आषाढी यात्रेत ‘पंढरीच्या दारी-स्वच्छतेची वारी’सारखे उपक्रम, १२ हजार अधिकारी-कर्मचाºयांना सोबतीला घेऊन पंढरपुरात महास्वच्छता अभियान अशा अनेक उपक्रमांची मालिका गुंफणाºया डॉ. राजेंद्र भारुड यांनी प्रशासनात अभिलेख विभागाला वेगळे वळण देणारी नवी व्यवस्था निर्माण केली. ज्यामुळे शासनाच्या ‘झीरो पेडन्सी’ धोरणाला नवसंजीवनी मिळाली. ती व्यवस्था उभी करताना अभिलेख इमारतीचे काम अद्ययावत कसे राहील, याची काळजी त्यांनी वाहिली. तेथे अद्ययावत सुविधा उपलब्ध करून जि.प.स्तरावर तब्बल एक लाख ४० हजार ३६१ एवढ्या अभिलेखांच्या जतनाची सोय केली. कोणत्याही संदर्भ व कागदाची ज्यावेळी गरज असेल त्यावेळी ते सहज आणि तातडीने उपलब्ध व्हावे, त्यातही अ, ब, क अशी वर्गवारी करूनच अभिलेख जतनाची मांडणी केली. आज अ वर्गातील ३८ हजार ६६०, ब वर्गातील ४५ हजार ७२२, तर ‘क’ वर्गातील ५६ हजार २४९ अभिलेखांचे जतन करण्यात आले आहे. अभिलेखगृहाच्या तीन मजली जुन्या इमारतीचे आधुनिकीकरण करून तेथे अभिलेख माहितीचा गोषवारा, वर्गवारी प्रत्येक वर्षानुसार त्याची मांडणी हे करताना एकाच इमारतीत १६ विभागांचे रेकॉर्ड शिस्तबद्ध पद्धतीने जतन केले गेले. रेकॉर्ड रूम म्हटले की, अस्ताव्यस्त फाईल्सचा खच आणि अस्वच्छता असा आपला अनुभव असतो. डॉ. भारुड यांनी मात्र केवळ प्रशासकीय पद्धती व वर्गीकरणावर भर न देता त्याला स्वच्छता व टापटीपीची जोड दिली. जि.प.चे अध्यक्ष संजय शिंदे आणि जि.प.च्या सर्व पदाधिकाºयांना साथीला घेऊन १२ हजार ६९० घरकुलांना अनुदान वाटप करणे, तीन हजार घरकुले अवघ्या पाच महिन्यात पूर्ण करणे, जिल्ह्यातील ४६९ शाळांना आयएसओ दर्जा प्राप्त करण्याची क्षमता निर्माण करणे, १४५७ शाळांना डिजिटल बनविणे अशा महत्त्वपूर्ण कामाला त्यांनी दिलेल्या अभिलेख जतन पद्धतीच्या जोडीचा राज्याला उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही.