शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

योगयुक्त आणि भक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 00:07 IST

संत ज्ञानेश्वर माऊली हे केवळ तत्त्वचिंतक नव्हते तर तत्त्वानुभवी होते. त्यांची ग्रंथनिर्मिती म्हणजे त्यांच्या आत्मानुभूतीवर आधारलेल्या स्वानुभवी चिंतनाचा कृपाळू अविष्कार होय.

- डॉ. रामचंद्र देखणेसंत ज्ञानेश्वर माऊली हे केवळ तत्त्वचिंतक नव्हते तर तत्त्वानुभवी होते. त्यांची ग्रंथनिर्मिती म्हणजे त्यांच्या आत्मानुभूतीवर आधारलेल्या स्वानुभवी चिंतनाचा कृपाळू अविष्कार होय. भारतीय आचार्यांनी द्वैत, विशिष्टाद्वैत, केवलाद्वैत, पूर्वाद्वैत इत्यादी भिन्न भिन्न विचारसरणी तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात प्रचलित केल्या. जीव, जगत आणि परमात्मा यांची स्वरूपे कथन केली. सर्वच तत्त्ववेत्त्यांची दृष्टी मोक्ष या चतुर्थ पुरुषार्थावर आरूढ होऊन थांबते. परंतु, ज्ञानदेवांची पारमार्थिक अनुभूमी मोक्षासी न थांबता त्याच्याही पलीकडे जाऊन ज्ञानोत्तर भक्तीत स्थिर झाली आहे.‘चहू पुरुषार्थाचे शिरी। भक्ती जस्ौी।।’ असे प्रतिपादन करीत ज्ञानदेव भक्तीलाच पंचम पुरुषार्थ मानतात. ज्ञानदेवांनी आपल्या तत्त्वचिंतनातून अनाकलनीय ज्ञानाला भक्तीचा ओलावा आणि कर्माचे हातपाय दिले. तर शुद्धाचरणातून कर्माला ज्ञानाचे डोळे दिले.कर्म व ज्ञान यांच्या अहंकारातून निवृत्त होण्यासाठी भक्तीचे मोठेपण सांगून ज्ञान-कर्म आणि भक्तीचा समन्वय साधला. अर्जुनाने भगवंतांना प्रश्न विचारला की, भक्त आणि योगी यापैकी कुणी खरोखर योग जाणला आहे? माऊली त्यावर भाष्य करताना म्हणतात,‘‘तयां आणि जी भक्तां।येरायेरा माजीं अनंता।कवणें योगु तत्त्वतां।जाणितला सांगा।’’ त्यावर भगवंत स्पष्टपणे सांगतात, सूर्य अस्ताचलाच्या समीप गेल्यावरही सूर्यबिंबामागून जशी किरणे जातात, गंगा नदी समुद्रास मिळाल्यावरही जसा तिच्या मागील पाण्याचा अनिवार लोट येतच राहतो; त्या गंगेसारखा ज्यांच्या प्रेमभावाचा जोर कायम राहतो आणि जे सर्व इंद्रियासहित माझ्या स्वरुपी दृढ अंत:करण ठेवून माझी उपासना करता ते,‘‘यापरी जे भक्त। आपणचे मज देत।तेचि मी योगयुक्त।परम मानी।’’ याप्रमाणे जे भक्त आपला आत्मभाव देतात तेच खºया अर्थाने योगयुक्त झाले आहेत, असे समज.भक्ती ही केवळ करायची नसून, जगायची आहे. अंत:करणात भगवत्विषयक प्रेम उत्पन्न होऊन त्याची पूजा नामस्मरणादी करीत राहणे एवढेच भक्तीचे मर्यादित स्वरूप नाही.परमार्थ ही विवक्षित कालात, विवक्षित स्थळी, विवक्षित प्रकारची क्रिया नव्हे; तर ज्या भाग्यवंताच्या अंत:करणात भक्ती उत्पन्न झाली त्याच्या जीवनात क्रांती होणे असे आहे.