शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
4
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
5
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
6
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
7
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
8
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
9
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
10
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
11
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
12
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
13
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
14
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
15
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
16
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
17
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
18
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
19
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
20
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

मंगळाच्या जगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 01:37 IST

खगोल निरीक्षणात शुक्रानंतरचा ग्रह म्हणजे मंगळ. मंगळ आपल्यासाठी नेहमीच खूपच कुतूहलाचा विषय होता. ग्रह मालिकेतील हा पहिला ग्रह जो आपल्याला रात्रभर दिसू शकतो

- अरविंद परांजपेखगोल निरीक्षणात शुक्रानंतरचा ग्रह म्हणजे मंगळ. मंगळ आपल्यासाठी नेहमीच खूपच कुतूहलाचा विषय होता. ग्रह मालिकेतील हा पहिला ग्रह जो आपल्याला रात्रभर दिसू शकतो. याची कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर आहे. हा सूर्याची एक परिक्रमा १.८८ वर्षाने (पृथ्वीच्या ६८६.९८ दिवसांनी) पूर्ण करतो. तर दर २६ महिन्यांनी (२ वर्षे २ महिन्यांनी) अशी स्थिती येते की सूर्य पृथ्वी आणि मंगळ (सुमारे) एका रेषेत येतात. त्या वेळी याचा उदय सूर्यास्ताबरोबर होऊन, सूर्योदयाच्या वेळी तो पश्चिम क्षितिजावर अस्ताला जातो. तसेच दर १५ ते १७ वर्षांनी अशी स्थिती येते की त्या वेळी सर्ू्य-पृथ्वी-मंगळ एका रेषेत तर असतात पण त्याचवेळी मंगळ पण आपल्या कक्षेत सूर्याच्या जवळ आलेला असतो. या वेळी मंगळाचे निरीक्षण खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते.दुर्बिणीच्या शोधानंतर १८७७ साली मंगळ ग्रहाचे असेच निरीक्षण इटलीतीत जियोवानी शापरेली या प्रख्यात खगोल निरीक्षकानी केले. त्यांना मंगळावर काही खुणा परत परत दिसल्या. त्यानंतर त्यांनी मंगळाचा नकाशा बनवण्यास सुरुवात केली. या नकाशात त्यांनी मंगळावर काही रेषा एकमेकांना छेदून जात असल्याचे दाखवले. याना इटलीत कनाली (म्हणजे खाचांसारखे) असे म्हटले. जेव्हा ही बातमी इंग्लंडमध्ये पोहोचली तेव्हा या कनालीचे भाषांतर कॅनॉल असे झाले आणि लोकांच्या कल्पनाशक्तीला जणू पंखच फुटले.मंगळावर आपल्यासारखे किंवा आपल्याहूनही अधिक प्रगतीशील असे सजीव आहेत आणि त्यांनी मंगळाच्या ध्रुवीय भागातून विषुववृत्तीय भागावर पाणी पोहोचवण्याकरिता हे कॅनॉल बांधले आहेत असा समज पसरू लागला.मंगळावरच्या प्रगत सजीवांचा हा प्रचार करण्यात अग्रस्थानी होते अमेरिकेचे धनवान उद्योगपती पर्सिव्हल लॉवेल. यांनी आपल्या आयुष्याचे दोनच उद्देश ठेवले होते - एक तर मंगळाचे निरीक्षण करणे आणि जेव्हा आकाशात मंगळ नसेल तेव्हा मंगळाच्या या प्रगत सजीवांबद्दल व्याख्याने देत जगभर प्रवास करणे.याचा उच्चांक म्हणजे प्रख्यात विज्ञान कादंबरीकार एच.जी. वेल्स यांनी ‘वॉर आॅफ द वर्ल्ड’ ही कादंबरी लिहिली. यात त्यांनी मंगळवासी पृथ्वीवर आक्रमण करून पृथ्वी काबीज करण्याचा कसा प्रयत्न करतात आणि मग हे आक्रमण आपण कसे मोडून काढतो याचे वर्णन केले होते.या कादंबरीचे रेडिओ नाट्यरूपांतर तर इतकेप्रभावी झाले होते की लोकांना खरेच वाटले की, पृथ्वीवर मंगळवासीयांनी आक्रमण केले आहे. पण आज आपण जाणतो की मंगळावर कधी काळी सजीवांचा वास होता याबद्दल कुठलाही पुरावा मिळालेला नाही.मंगळाचा अक्ष सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या पातळीला २५ अंशाने कललेला आहे. पृथ्वीचा अक्ष साडेतेवीस अंशाने कललेला आहे. म्हणजे पृथ्वीच्या अक्षापेक्षा मंगळाचा अक्ष किंचित जास्त आहे. मंगळाच्या पृष्ठभागावर पृथ्वीसारखेच ऋतू असतात. मंगळाच्या सूर्याच्या एका परिक्रमेत एकदा याचा उत्तर ध्रुव तर एकदा दक्षिण ध्रुव सूर्याच्या दिशेने कललेला असतो.अनेक बाबतीत मंगळ पृथ्वीसारखा आहे. पण मंगळावर वातावरण खूप विरळ आहे आणि त्यात ७५ टक्के कार्बन डाय आॅक्साईड आहे. हे विरळ वातावरण सूर्यापासून येणाऱ्या हानीकारक विकिरणांपासून आपला बचाव करू शकणार नाही. मंगळावर कमाल तापमान २० अंश तर किमान उणे १४० सेल्सिअस असते.मंगळाचा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या फक्त अर्धा आहे आणि पृष्ठभागावर गुरुत्वीय बल पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या गुरुत्वीय बलाच्या ३८ टक्केच आहे. म्हणजे जर पृथ्वीवर तुमचे वजन ५० किलो असेल तर मंगळावर ते २० किलोपेक्षा कमी भरेल.मंगळ आपल्याला लाल रंगाचा दिसतो, त्यामागचे कारण म्हणजे मंगळाच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात आॅक्सिडाईज्ड लोह म्हणजेच गंज आहे. ज्याचा रंग लाल असतो. याच्या ध्रुवीय भागावर आपल्याला बर्फाचा साठा दिसतो. म्हणजे कधी काळी इथे पाणी असलं पाहिजे जे काही कारणांमुळे उडून गेले. जर या ग्रहावर पाण्याचा साठा होता तर इथे कधी काळी जीवाणूंच्या स्वरूपाचे का असेना, सजीवांचे अस्तित्व असण्याची शक्यता नाकारत येत नाही.(लेखक नेहरू तारांगणचे संचालक आहेत.)