शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
5
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
6
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
7
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
8
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
9
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
10
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
11
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
13
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
14
घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!
15
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
16
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
17
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
18
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
19
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
20
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ

शब्दझुळूक

By admin | Updated: September 19, 2016 04:29 IST

आपण सण उत्सव साजरे करतो. जयंत्या मयंत्या साजऱ्या करतो.

आपण सण उत्सव साजरे करतो. जयंत्या मयंत्या साजऱ्या करतो. ह्यात मन किती, तन किती आणि धन तर आहेच, ह्याचा विचार करायला हवा. माणसांचा द्रोह हवा चांगल्या विचारांसाठी. पण द्रोहालाही सांगायला हवं! विवेक स्वीकार. विद्रोहाचा खरा अर्थ विवेकाने केलेला द्रोह हाच आहे. आपण फक्त आग आग करीत राहतो. उरते काय, प्रचंड धगीनंतर फक्त राख. सर्वच महामानवांनी ‘खळांची व्यंकटी सांडो’ म्हटलं. धर्मरक्षणासाठी केलेला द्रोह वैचारिक स्थित्यंतरात हवा, पण तो रक्त सांडण्यात जातो. दु:ख, वेदना, द्रोह, नकार ह्या मानवी जाणिवा काव्य होतात. हरीण पळते आहे जीव मुठीत धरून मागे वाघ लागला म्हणून. एका ठिकाणी अडकते. हात पाय गुंतून पडतात. त्याला वाटते आता आपली सुटका नाही. आपण वाचू शकत नाही. ते अगतिक डोळ्यात भीतीयुक्त प्राण घेऊन उभे आणि मागून वाघ येतो आक्रमक पावलांची झडप घालण्याच्या तयारीत. अशा वेळी हरिणाच्या डोळ्यात जे काही असतं ना त्यालाच गजल म्हणतात. विविध शायर, कवींनी प्रत्येक काव्यप्रकाराचे वर्णन एकेका दृश्यभावनेशी निगडित केलंय. म्हणजे कोणतीही कला वा शब्द हा जगण्याशीच निगडित आहे. आपण म्हणत राहतो ‘कफन को जेब नही होती’ म्हणजेच जाताना देहाएवढीच जागा, तीही आपली नाही, शवावर लोक चढवतील ते कपडे, वाहतील ती फुले, नाही तर अखंड नग्न. अपघातात छिन्नविच्छिन्न झालात तर शरीराचे तुकडे गोळा करून जमा करणार देह! आणि सामूहिक दहन करणार! म्हणून काय काय जमा करीत राहायचे आयुष्यभर? आपला अखंड निर्मळ श्वासच हवा! तो पुरेसा आहे! फक्त त्याची सोबत महत्त्वाची. तो म्हणाला बाय की आपलं खरं नाय. बघता बघता श्वासांसारखी सोबत करणारी माणसं फट्टदिशी विझतात, निघून जातात आणि आपण उर्वरित काळात हळहळत राहतो. मग त्या व्यक्तीच्या स्मृती, वस्तू, घर, कपडे सांभाळत राहायचे. कवटाळायचे. त्यापेक्षा त्याचा शब्द सांभाळा. ह्या अर्थाने कवी लेखक कलावंत भाग्यवानच म्हणायला हवेत. एखादी कलाकृती एखादी ओळ आपल्याला देऊन जाणारे कवी, विचारवंत हे खरे सोबती असतात. मग केशवसुत असोत, कुसुमाग्रज, बोरकर, ढसाळ, अरुण कोलटकर असोत की बालकवी, पाडगावकर ते अगदी काल परवाच जिवाला चटका लावून गेलेला नलेश पाटील, चिल्लर चांदण्या मोजण्यासाठी स्वर्गात सोडून गेलेला असो, शेवटी हे सगळे आपल्यासोबत आहेत हे महत्त्वाचे. ह्यांच्या अक्षरांनी, चित्रांनी, गाण्यांनी, निसर्गातील अखंड संवेदनांनी प्रत्येक हृदयाचा गाभारा भरलेला असला तर जीवन तर सुसह्यच होतं पण ये मरणा म्हणण्याचं अमोघ धाडस प्रत्येकाच्या आयुष्यात येतं. ह्या जगण्याच्या क्षणांची झुळूक मन सतेज करीत राहणार आहे आणि ही सतेज मनं एकत्र आलीत की माणुसकीच्या गंधाने भरणार आहे गगनाचा गाभारा! ही शब्दझुळूक जपू या!-किशोर पाठक