शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शब्दझुळूक

By admin | Updated: September 19, 2016 04:29 IST

आपण सण उत्सव साजरे करतो. जयंत्या मयंत्या साजऱ्या करतो.

आपण सण उत्सव साजरे करतो. जयंत्या मयंत्या साजऱ्या करतो. ह्यात मन किती, तन किती आणि धन तर आहेच, ह्याचा विचार करायला हवा. माणसांचा द्रोह हवा चांगल्या विचारांसाठी. पण द्रोहालाही सांगायला हवं! विवेक स्वीकार. विद्रोहाचा खरा अर्थ विवेकाने केलेला द्रोह हाच आहे. आपण फक्त आग आग करीत राहतो. उरते काय, प्रचंड धगीनंतर फक्त राख. सर्वच महामानवांनी ‘खळांची व्यंकटी सांडो’ म्हटलं. धर्मरक्षणासाठी केलेला द्रोह वैचारिक स्थित्यंतरात हवा, पण तो रक्त सांडण्यात जातो. दु:ख, वेदना, द्रोह, नकार ह्या मानवी जाणिवा काव्य होतात. हरीण पळते आहे जीव मुठीत धरून मागे वाघ लागला म्हणून. एका ठिकाणी अडकते. हात पाय गुंतून पडतात. त्याला वाटते आता आपली सुटका नाही. आपण वाचू शकत नाही. ते अगतिक डोळ्यात भीतीयुक्त प्राण घेऊन उभे आणि मागून वाघ येतो आक्रमक पावलांची झडप घालण्याच्या तयारीत. अशा वेळी हरिणाच्या डोळ्यात जे काही असतं ना त्यालाच गजल म्हणतात. विविध शायर, कवींनी प्रत्येक काव्यप्रकाराचे वर्णन एकेका दृश्यभावनेशी निगडित केलंय. म्हणजे कोणतीही कला वा शब्द हा जगण्याशीच निगडित आहे. आपण म्हणत राहतो ‘कफन को जेब नही होती’ म्हणजेच जाताना देहाएवढीच जागा, तीही आपली नाही, शवावर लोक चढवतील ते कपडे, वाहतील ती फुले, नाही तर अखंड नग्न. अपघातात छिन्नविच्छिन्न झालात तर शरीराचे तुकडे गोळा करून जमा करणार देह! आणि सामूहिक दहन करणार! म्हणून काय काय जमा करीत राहायचे आयुष्यभर? आपला अखंड निर्मळ श्वासच हवा! तो पुरेसा आहे! फक्त त्याची सोबत महत्त्वाची. तो म्हणाला बाय की आपलं खरं नाय. बघता बघता श्वासांसारखी सोबत करणारी माणसं फट्टदिशी विझतात, निघून जातात आणि आपण उर्वरित काळात हळहळत राहतो. मग त्या व्यक्तीच्या स्मृती, वस्तू, घर, कपडे सांभाळत राहायचे. कवटाळायचे. त्यापेक्षा त्याचा शब्द सांभाळा. ह्या अर्थाने कवी लेखक कलावंत भाग्यवानच म्हणायला हवेत. एखादी कलाकृती एखादी ओळ आपल्याला देऊन जाणारे कवी, विचारवंत हे खरे सोबती असतात. मग केशवसुत असोत, कुसुमाग्रज, बोरकर, ढसाळ, अरुण कोलटकर असोत की बालकवी, पाडगावकर ते अगदी काल परवाच जिवाला चटका लावून गेलेला नलेश पाटील, चिल्लर चांदण्या मोजण्यासाठी स्वर्गात सोडून गेलेला असो, शेवटी हे सगळे आपल्यासोबत आहेत हे महत्त्वाचे. ह्यांच्या अक्षरांनी, चित्रांनी, गाण्यांनी, निसर्गातील अखंड संवेदनांनी प्रत्येक हृदयाचा गाभारा भरलेला असला तर जीवन तर सुसह्यच होतं पण ये मरणा म्हणण्याचं अमोघ धाडस प्रत्येकाच्या आयुष्यात येतं. ह्या जगण्याच्या क्षणांची झुळूक मन सतेज करीत राहणार आहे आणि ही सतेज मनं एकत्र आलीत की माणुसकीच्या गंधाने भरणार आहे गगनाचा गाभारा! ही शब्दझुळूक जपू या!-किशोर पाठक