शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

इंद्रधनुष्य पेलताना...

By admin | Updated: July 10, 2016 03:48 IST

‘भगवान आबाजी पालव’ हा डायलॉग 'एक अलबेला' शूटच्या वेळी उच्चारला आणि मला मी घेतलेल्या मोठ्या जबाबदारीची जाणीव झाली.

- मंगेश देसाई‘भगवान आबाजी पालव’ हा डायलॉग 'एक अलबेला' शूटच्या वेळी उच्चारला आणि मला मी घेतलेल्या मोठ्या जबाबदारीची जाणीव झाली. मी‘भगवान आबाजी पालव’ हा डायलॉग शूटच्या वेळी उच्चारला आणि मला मी घेतलेल्या जबाबदारीची जाणीव झाली. मी फार मोठे ‘इंद्रधनुष्य’ हातात घेतले आहे, याची जाणीव झाली आणि ते मला पेलवले नाही तर काय काय होऊ शकते, याचीही जाणीव झाली. मला कधीच वाटले नव्हते, मी ‘भगवानदादा’ व्यक्तीचित्रण करेन. कारण त्यांच्यात आणि माझ्यात मला कधीच साम्य नाही दिसले, पण शेखर सरतांडेल सर यांना माझ्यात कुठेतरी ‘भगवानदादा’ लपलेले दिसले आणि विद्याधर भट्टे यांनी ते शोधून बाहेर काढले, पण ज्या माणसाबद्दल सोशल मीडियावर फारशी माहिती उपलब्ध नाही, ज्याच्याबद्दल फारसे लिखाण नाही, ज्यांच्या भूतकाळातल्या फिल्मस उपलब्ध नाहीत, त्या ‘नटाचे’ व्यक्तिमत्त्व चित्रण मला उभे करायचे होते आणि तेच फार आव्हानात्मक होते. कारण ज्यांनी भगवानदादांना तरुण वयात बघितले होते, ते आता जिवंत नाहीत आणि जे आहेत, त्यांनी दादांना म्हातारपणात बघितले आहे. माझी जबाबदारी हीच होती की, तरुण भगवानदादा आणि वृद्ध भगवानदादा यांच्यात समानता दिसली पाहिजे.अभ्यासासाठी ‘अलबेला’ हा एकच सिनेमा होता, त्या शिवाय काहीच नाही. मी २२ ते २५ वेळा तो बघितला. तो बघत असताना माझ्या आतापर्यंतच्या अनुभवाची मला साथ मिळाली. एक गोष्ट लक्षात आली होती की, कुठलाही कलाकार जेव्हा एखादी भूमिका करतो, तेव्हा तो १00 टक्के त्या भूमिकेत शिरू शकत नाही, त्याच्या वैयक्तिक जीवनातले हावभाव, बोलणे, चालणे त्या भूमिकेत थोड्या-फार प्रमाणात दिसतेच. अर्थात, ते कमीत कमी दिसू देणे हे नटाच्या अनुभवावर आणि हुशारीवर अवलंबून आहे. भगवानदादा खूप नॅचरल अभिनेते होते, पण चित्रपटात ते मेलोड्रामा करायचे. कदाचित, मेलोड्रामा ही काळाची गरज असावी. याचाच अर्थ, मी असा लावला की, दादा सिनेमामध्ये जसे मेलोड्रेमिक वागतात, तसे वैयक्तिक आयुष्यात वागत असावेत. या निष्कर्षाच्या आधारे मी ‘भगवानदादा’ व्यक्तिचित्रण उभे करायला सुरुवात केली आणि जसजसे शूटिंग पुढे सरकत गेले, तसतसे ‘दादा’ माझ्यात अवतरत गेले. मी जेव्हा पहिल्यांदा मला भगवानदादांच्या रूपात बघितले, तेव्हा मला १९९६ साली भेटलेल्या दादांच्या डोळ्यातले भाव काय सांगून गेले होते ते लक्षात आले, पण त्या डोळ्यातल्या भावना ओळखण्यासाठी मला १८ वर्षे लागली होती. ते माझ्याकडे कसे बघत होते, ते सांगेनच मी तुम्हाला, पण एक मात्र कबूल करतो, मी भगवानदादा साकारताना खऱ्या ‘दादांचा’ आत्मा माझ्या आजूबाजूला उपस्थित होता हे नक्की.(लेखक प्रसिद्ध अभिनेते आहेत.)