शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
2
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; शाहबाज सरकारने बनवले फील्ड मार्शल...
3
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
4
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
5
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
6
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
7
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
8
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
9
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
10
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
11
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
12
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
13
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
14
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
15
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
16
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
17
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
18
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
19
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
20
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट

इंद्रधनुष्य पेलताना...

By admin | Updated: July 10, 2016 03:48 IST

‘भगवान आबाजी पालव’ हा डायलॉग 'एक अलबेला' शूटच्या वेळी उच्चारला आणि मला मी घेतलेल्या मोठ्या जबाबदारीची जाणीव झाली.

- मंगेश देसाई‘भगवान आबाजी पालव’ हा डायलॉग 'एक अलबेला' शूटच्या वेळी उच्चारला आणि मला मी घेतलेल्या मोठ्या जबाबदारीची जाणीव झाली. मी‘भगवान आबाजी पालव’ हा डायलॉग शूटच्या वेळी उच्चारला आणि मला मी घेतलेल्या जबाबदारीची जाणीव झाली. मी फार मोठे ‘इंद्रधनुष्य’ हातात घेतले आहे, याची जाणीव झाली आणि ते मला पेलवले नाही तर काय काय होऊ शकते, याचीही जाणीव झाली. मला कधीच वाटले नव्हते, मी ‘भगवानदादा’ व्यक्तीचित्रण करेन. कारण त्यांच्यात आणि माझ्यात मला कधीच साम्य नाही दिसले, पण शेखर सरतांडेल सर यांना माझ्यात कुठेतरी ‘भगवानदादा’ लपलेले दिसले आणि विद्याधर भट्टे यांनी ते शोधून बाहेर काढले, पण ज्या माणसाबद्दल सोशल मीडियावर फारशी माहिती उपलब्ध नाही, ज्याच्याबद्दल फारसे लिखाण नाही, ज्यांच्या भूतकाळातल्या फिल्मस उपलब्ध नाहीत, त्या ‘नटाचे’ व्यक्तिमत्त्व चित्रण मला उभे करायचे होते आणि तेच फार आव्हानात्मक होते. कारण ज्यांनी भगवानदादांना तरुण वयात बघितले होते, ते आता जिवंत नाहीत आणि जे आहेत, त्यांनी दादांना म्हातारपणात बघितले आहे. माझी जबाबदारी हीच होती की, तरुण भगवानदादा आणि वृद्ध भगवानदादा यांच्यात समानता दिसली पाहिजे.अभ्यासासाठी ‘अलबेला’ हा एकच सिनेमा होता, त्या शिवाय काहीच नाही. मी २२ ते २५ वेळा तो बघितला. तो बघत असताना माझ्या आतापर्यंतच्या अनुभवाची मला साथ मिळाली. एक गोष्ट लक्षात आली होती की, कुठलाही कलाकार जेव्हा एखादी भूमिका करतो, तेव्हा तो १00 टक्के त्या भूमिकेत शिरू शकत नाही, त्याच्या वैयक्तिक जीवनातले हावभाव, बोलणे, चालणे त्या भूमिकेत थोड्या-फार प्रमाणात दिसतेच. अर्थात, ते कमीत कमी दिसू देणे हे नटाच्या अनुभवावर आणि हुशारीवर अवलंबून आहे. भगवानदादा खूप नॅचरल अभिनेते होते, पण चित्रपटात ते मेलोड्रामा करायचे. कदाचित, मेलोड्रामा ही काळाची गरज असावी. याचाच अर्थ, मी असा लावला की, दादा सिनेमामध्ये जसे मेलोड्रेमिक वागतात, तसे वैयक्तिक आयुष्यात वागत असावेत. या निष्कर्षाच्या आधारे मी ‘भगवानदादा’ व्यक्तिचित्रण उभे करायला सुरुवात केली आणि जसजसे शूटिंग पुढे सरकत गेले, तसतसे ‘दादा’ माझ्यात अवतरत गेले. मी जेव्हा पहिल्यांदा मला भगवानदादांच्या रूपात बघितले, तेव्हा मला १९९६ साली भेटलेल्या दादांच्या डोळ्यातले भाव काय सांगून गेले होते ते लक्षात आले, पण त्या डोळ्यातल्या भावना ओळखण्यासाठी मला १८ वर्षे लागली होती. ते माझ्याकडे कसे बघत होते, ते सांगेनच मी तुम्हाला, पण एक मात्र कबूल करतो, मी भगवानदादा साकारताना खऱ्या ‘दादांचा’ आत्मा माझ्या आजूबाजूला उपस्थित होता हे नक्की.(लेखक प्रसिद्ध अभिनेते आहेत.)