शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
5
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
6
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
7
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
8
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
9
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
10
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
11
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
12
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
13
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
14
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
15
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
16
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
17
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
18
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
19
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
20
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  

बाई खरेच बोलल्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2017 03:11 IST

गाय आणि माय हे दोन्ही विषय हिंदू धर्मीयांच्या दृष्टीने नाजूक व आस्थेचे आहेत. याच आस्थेच्या भावनेतून ज्या ज्या ठिकाणी गोहत्येच्या घटना निदर्शनास आल्या

गाय आणि माय हे दोन्ही विषय हिंदू धर्मीयांच्या दृष्टीने नाजूक व आस्थेचे आहेत. याच आस्थेच्या भावनेतून ज्या ज्या ठिकाणी गोहत्येच्या घटना निदर्शनास आल्या त्या त्या ठिकाणी गोरक्षकांनी आक्षेप घेतले, मोर्चे-आंदोलने करून निषेध नोंदविले तर काही ठिकाणी मारहाणीच्या घटनानेखील घडल्या आहेत. गोहत्या या विषयावर सर्वत्र वादंग निर्माण होत असल्याचे निदर्शनास येताच फडणवीस सरकारला राज्यात गोवंश हत्याबंदीची घोषणा करावी लागली. गायींची काळजी घेताना देशातील बार्इंच्या आरोग्याकडेही सरकारने लक्ष द्यायला हवे, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी लगावला. वाघ यांच्या वक्तव्याला टीका-टिपण्णी किंवा उपरोध अशी कोणतीही विशेषणे लावण्याचा भाग जर वगळला तर त्यांच्या बोलण्यात नक्कीच एक दखलपात्र असा मतितार्थ दडला आहे. सॅनिटरी पॅड करमुक्त करावेत आणि जीएसटीतूनही सॅनिटरी नॅपकीन्स वगळावेत यासाठी त्यांनी मुंबईत स्वाक्षरी मोहीमही राबविली, परंतु त्याची साधी दखलही घेण्यात आली नाही. हे पॅड वापरणे परवडत नसल्याने ८० टक्के महिला ते वापरत नाहीत. परिणामी जगात दरवर्षी गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्युमुखी पडणाऱ्या २० टक्के महिलांमध्ये भारतीय महिलांचे प्रमाण अधिक आहे. म्हणूनच ‘राज्य व केंद्र सरकारच्या अजेंड्यावर सध्या फक्त गायींचा विषय आहे, महिलांच्या आरोग्याचे काय’ हा चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेला विषय वस्तुस्थितीदर्शक वाटतो. अशीच खंत यापूर्वी जया बच्चन यांनीही व्यक्त केली होती. गाय वाचविण्यासाठी शासनस्तरावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर रणकंदन माजले असताना महिलांच्या सुरक्षिततेसाठी कोणीच ठोस अशी पावले उचलताना दिसत नाही, हे अधिक क्लेशदायक आहे. बलात्कार, अत्याचार, हुंडाबळीच्या घटना कोठे ना कोठेतरी रोजच घडत असल्याने हे शब्द आता गुळगुळीत आणि परवलीचे वाटावेत इतके या घटनांचे प्रमाण वाढलेले आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणामुळे देशवासीयांच्या मनात संतापाचे डोंब उसळले होते म्हणून त्या प्रकरणाचा निपटारा जलदगतीने झाला. आपल्या अवतीभोवती अशा कितीतरी निर्भया रोजच वासनांध नराधमांची शिकार होत आहेत. पण हे प्रकार थोपविण्यासाठी ज्या कठोरतेने कारवाईचा आणि कायद्याचा बडगा उगारायला हवा, तितका तो उगारला जात नाही म्हणूनच महिलांच्या मनात पावलोपावली असुरक्षिततेची भावना आहे. गोहत्याबंदीच्या घोषणेसोबत महिलांच्या रक्षणासाठीही ठोस असे सुरक्षा कवच तयार केल्यास महिलाही सुरक्षित राहू शकतील.