शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

चहापेक्षा किटली गरम का होते?

By admin | Updated: June 27, 2016 03:39 IST

‘मंत्र्यांचे पीए म्हणजे चहापेक्षा किटली गरम’ अशी उपरोधिक टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत केली.

‘मंत्र्यांचे पीए म्हणजे चहापेक्षा किटली गरम’ अशी उपरोधिक टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत केली. चहापेक्षा किटली गरम होण्याला जबाबदार कोण? मंत्री कमी पडतात म्हणून पीएंचे फावते की मंत्री पीएंच्या नादी लागत आहेत? राज्य सरकारमधील काही भाजपा मंत्री पीएंमुळे अडचणीत आले आहेत, तर सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, त्यांचे खासगी सचिव सुनील माळी यांच्यामुळे आरोपांचे धनी ठरले आहेत. आरोग्य खात्यातील मनमानी बदल्या करताना माळींची भूमिका काय होती ही बाब आता लपून राहिलेली नाही. नियमांची चौकट पाळून सगळे काही केल्याचा देखावा निर्माण केला जात असला, तरी बदल्यांमधून कोणाला किती टॉनिक मिळाले याची उघड चर्चा विभागामध्ये आहे. गडकरीजी सांगतात, चहापेक्षा किटली गरम झाली आहे. तसे होण्यासाठी मंत्रीच अधिक जबाबदार आहेत. त्यांना एक तर विषय कळत नाहीत आणि कळून घेण्याची त्यांची तयारी नसते. ते वाजवीपेक्षा जास्तच ‘पीएवलंबी’ होऊन जातात. आपली भूमिका ही मंत्र्यांना साहाय्य करण्याची आहे, याचा विसर पीएंना पडतो. असे का होते?मंत्र्यांना आपली इप्सितं पीएंमार्फत साध्य करायची असतात. पीए मग त्यांना वेगवेगळे मार्ग सांगतात आणि त्यातून संगनमताचा नवा अध्याय सुरू होतो. महादेवापेक्षा नंदीला अधिक भाव येतो. महादेवाला कोण भेटेल कोण भेटणार नाही, याचा निर्णय नंदी घेऊ लागतो तेव्हा गडबड होते. गडकरीजी! सगळा दोष पीएंचा नाही. त्यांना विविध प्रकारच्या ‘व्यवस्था’ करण्यास मंत्र्यांकडून सांगितले जाते. मंत्र्यांच्या बंगल्यावरील जेवणावळींपासून साहेबांच्या नातेवाईक, चेलेचपाट्यांच्या विमानवाऱ्यांची काळजी त्यांना घ्यावी लागते. मग पीए लोक यंत्रणेला कामाला लावतात. दहा पैसे गोळा करताना दोन पैसे स्वत:कडे ठेवून घेण्याचा आपला हक्कच आहे अशी त्यांची भावना बनते. मंत्र्यांचा विभागावर वचक असेल आणि त्यांना काही वरकमाई करायची नसेल तर पीएंचे फावणारच नाही. मंत्री कार्यालयात सौजन्यशील वागणूक मिळत नसल्याच्याही कार्यकर्त्यांच्या तक्रारी आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातील सुमित वानखेडे, दिलीप राजूरकर, पंकजातार्इंचे पीए डॉ. नरेश गिते, ऊर्जामंत्र्यांसोबतचे विश्वास पाठक अशांकडून इतरांनी सौजन्य शिकायला हरकत नाही. प्रशासनावर पकड कशी असावी? दादासाहेब कन्नमवार हे लोकनेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना टी. जी. देशमुख नागपूरचे महापौर होते. टीजींनी नागपूरसाठी त्यावेळी २० लाखाचा निधी मागणारा अर्ज कन्नमवारांंसमोर मंत्रालयात धरताच त्यांनी मंजुरीची सही दिली. दुसऱ्या दिवशी टीजींना बंगल्यावर चहासाठी बोलावले. कन्नमवारांनी विचारले, माझ्या कारभाराबद्दल लोक काय बोलतात? त्यावर टीजी म्हणाले, आपण लोकनेतेच आहात पण प्रशासन अधिक समजावून घेतले तर त्याचा आपल्यालाच फायदा होईल. हे ऐकताच कन्नमवारांनी दुसऱ्या क्षणी तेव्हाच्या मुख्य सचिवांना बोलावून घेतले आणि ‘मी काल टीजीच्या अर्जावर २० लाख मान्य केले ते तुम्ही कमी केले का, अशी विचारणा केली. त्यावर, मुख्य सचिव होय म्हणाले. कन्नमवारांनी मग मुख्य सचिवांना झाडले. ज्या हेडमधून मी नागपूरसाठी २० लाख मंजूर केले त्यात तेवढा निधी देता येत नाही हे मलाही माहिती होते. तरीही टीजीला मला ते द्यायचेच होते. मुख्यमंत्री मी आहे, आपण ते परस्पर कमी का केले? तुम्ही तसे केल्याने मला प्रशासन समजत नाही, असा टीजीचा गैरसमज झाल्याचे कन्नमवार म्हणाले आणि त्यांनी टीजींना नागपूरसाठी २० लाखच द्या, असे बजावले. लोकविद्यापीठात शिक्षण घेतलेल्या कन्नमवारांसारख्या नेत्यांचा तो काळ होता. पुस्तकी ज्ञान नसले तरी मंत्र्यांची प्रशासनावर पकड होती. सातवी पास वसंतदादा हे एक यशस्वी मुख्यमंत्री होऊ शकले. बरेचदा असेही बघायला मिळते की विरोधी पक्षात असताना सभागृहात आणि सभागृहाबाहेरही अत्यंत आक्रमक असे नेते हे मंत्री म्हणून तेवढे यशस्वी झाले नाहीत. नामांकित वकील हा नामांकित न्यायाधीश होतोच असे नाही आणि वकिलीत फारशी गती नसलेले चांगले न्यायाधीश मात्र झाले असा अनुभव आहेच. मुख्यमंत्री आणि चारदोन मंत्री सोडले तर आजच्या सरकारला ‘आवाका’ नाही, हा दोष दोन वर्षे होत आली तरी कायम आहे.

जाता जाता : चहापेक्षा किटली गरम होऊ नये या दृष्टीने मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात, ‘लॅक आॅफ टॅलेंट आणि ‘लॅक आॅफ एक्सपिरियन्स’ची उणीव मुख्यमंत्री दूर करतील, अशी अपेक्षा आहे.

- यदू जोशी