शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

...शख्स परेशान सा क्यों है?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 02:33 IST

मुंबईत ३१ टक्के रुग्ण मनोविकारांशी, मानसिक ताणांशी झगडत असल्याचा मुंबई महापालिकेने जाहीर केलेला आकडा पाहिला, तर या महानगरीचे मन आतून कसे पोखरले जातेय आणि मुंबापुरीच्या आनंदाचा निर्देशांक किती फसवा आहे, याची प्रचिती येते.

मुंबईत ३१ टक्के रुग्ण मनोविकारांशी, मानसिक ताणांशी झगडत असल्याचा मुंबई महापालिकेने जाहीर केलेला आकडा पाहिला, तर या महानगरीचे मन आतून कसे पोखरले जातेय आणि मुंबापुरीच्या आनंदाचा निर्देशांक किती फसवा आहे, याची प्रचिती येते. या ताणाच्या जगण्यावर होणाऱ्या परिणामातून समोर आलेले मधुमेहाचे २३.२ टक्के, अतिताणाचे २२.८ टक्के व हृदयविकाराचे साडेसात टक्के रुग्ण जर यासोबत जोडले तर सुमारे ८४ टक्के मुंबईकर हे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तणावाखाली जगत असल्याचे वास्तवही यातून समोर आले. ही स्थिती एकट्या मुंबईची नाही; तर मुंबईच्या कुशीतील उपनगरे, ठाणे-पालघर-रायगड जिल्हा आणि नवी मुंबईचीही आहे. सध्याची आकडेवारी पालिका रुग्णालयांतील आहे. त्यात खासगी रुग्णालयांचा समावेश केला, तर चित्र आणखी विषण्ण करणारे असेल. जीवनशैलीत बदल होत ती दिवसेंदिवस गतिमान, प्रचंड स्पर्धेची व उद्याची फारशी शाश्वती नसलेली होणे हे या तणावाचे मूळ आहे. ज्यांच्या हाती नोकरी आहे त्यांना ती टिकवण्याचा; तर शिक्षण असून किंवा नसूनही बेरोजगार राहावे लागत असल्याचा ताण, वाढत्या महागाईमुळे खर्चाची तोंडमिळवणी करण्यातील ओढग्रस्तता, वेगवेगळ्या कारणांमुळे रोजचा अस्वस्थ करणारा प्रवास, त्यातून येणारे नैराश्य- उदासीनता- चिडचिड, पुरेशी झोप न होणे व आनंदाचे-समाधानाचे क्षण कमी होत गेल्याचा हा परिपाक असल्याचा निष्कर्ष यातून समोर येतो. सोशल मीडियातून माणसे सतत संपर्कात आली, पण त्यांच्यातला संवाद हरपला. त्यामुळे मन मोकळे करावे, असे भोवती कुणी सापडत नाही, यामुळेही ताणाखाली वावरणारी मने कुरतडली जात आहेत. एक चांगले झाले, यानिमित्ताने मुंबईचा आरोग्य निर्देशांक समोर आला. मनावर ताण आहे, हे मान्य करून त्याबाबत बोलण्याइतका मोकळेपणाही समाजात येऊ लागला. यामुळे पुढच्या काळात आरोग्य सुविधांना कशी दिशा द्यायची, याचे चित्र ठरवता येऊ शकते. जगण्याची भ्रांत असलेले किंवा आर्थिक सुबत्ता असलेले या दोन्ही टोकांपर्यंत धावणाºया जगण्याच्या लंबकात चित्ती पुरेसे समाधान नसल्याची बाब एकसमान असल्याचे सांगत या आकडेवारीने जीवनशैलीचे आजार ही एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नाही, हेही समोर आणले. यातून आरोग्याच्या सुविधांत बदल होतीलही, पण त्याही पलीकडे जाऊन जगण्याचा आनंद कसा वाढवता येईल, यावर लक्ष देण्याची; त्यासाठी जागृती करण्याची गरज आहे. मन प्रसन्न करण्याची गुरूकिल्ली प्रत्येकालाच सापडेल असे नव्हे! पण किमान ताणतणावांचा निचरा कसा होईल, कोंडलेली, घुसमटलेली मने मोकळी कशी होतील यावर काम करता आले; तरी ताणांचा निचरा होण्यास व आयुष्याचा खळाळता झरा वाहण्यास मदत होईल. सध्या तेवढेही पुरेसे आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई