शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

...शख्स परेशान सा क्यों है?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 02:33 IST

मुंबईत ३१ टक्के रुग्ण मनोविकारांशी, मानसिक ताणांशी झगडत असल्याचा मुंबई महापालिकेने जाहीर केलेला आकडा पाहिला, तर या महानगरीचे मन आतून कसे पोखरले जातेय आणि मुंबापुरीच्या आनंदाचा निर्देशांक किती फसवा आहे, याची प्रचिती येते.

मुंबईत ३१ टक्के रुग्ण मनोविकारांशी, मानसिक ताणांशी झगडत असल्याचा मुंबई महापालिकेने जाहीर केलेला आकडा पाहिला, तर या महानगरीचे मन आतून कसे पोखरले जातेय आणि मुंबापुरीच्या आनंदाचा निर्देशांक किती फसवा आहे, याची प्रचिती येते. या ताणाच्या जगण्यावर होणाऱ्या परिणामातून समोर आलेले मधुमेहाचे २३.२ टक्के, अतिताणाचे २२.८ टक्के व हृदयविकाराचे साडेसात टक्के रुग्ण जर यासोबत जोडले तर सुमारे ८४ टक्के मुंबईकर हे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तणावाखाली जगत असल्याचे वास्तवही यातून समोर आले. ही स्थिती एकट्या मुंबईची नाही; तर मुंबईच्या कुशीतील उपनगरे, ठाणे-पालघर-रायगड जिल्हा आणि नवी मुंबईचीही आहे. सध्याची आकडेवारी पालिका रुग्णालयांतील आहे. त्यात खासगी रुग्णालयांचा समावेश केला, तर चित्र आणखी विषण्ण करणारे असेल. जीवनशैलीत बदल होत ती दिवसेंदिवस गतिमान, प्रचंड स्पर्धेची व उद्याची फारशी शाश्वती नसलेली होणे हे या तणावाचे मूळ आहे. ज्यांच्या हाती नोकरी आहे त्यांना ती टिकवण्याचा; तर शिक्षण असून किंवा नसूनही बेरोजगार राहावे लागत असल्याचा ताण, वाढत्या महागाईमुळे खर्चाची तोंडमिळवणी करण्यातील ओढग्रस्तता, वेगवेगळ्या कारणांमुळे रोजचा अस्वस्थ करणारा प्रवास, त्यातून येणारे नैराश्य- उदासीनता- चिडचिड, पुरेशी झोप न होणे व आनंदाचे-समाधानाचे क्षण कमी होत गेल्याचा हा परिपाक असल्याचा निष्कर्ष यातून समोर येतो. सोशल मीडियातून माणसे सतत संपर्कात आली, पण त्यांच्यातला संवाद हरपला. त्यामुळे मन मोकळे करावे, असे भोवती कुणी सापडत नाही, यामुळेही ताणाखाली वावरणारी मने कुरतडली जात आहेत. एक चांगले झाले, यानिमित्ताने मुंबईचा आरोग्य निर्देशांक समोर आला. मनावर ताण आहे, हे मान्य करून त्याबाबत बोलण्याइतका मोकळेपणाही समाजात येऊ लागला. यामुळे पुढच्या काळात आरोग्य सुविधांना कशी दिशा द्यायची, याचे चित्र ठरवता येऊ शकते. जगण्याची भ्रांत असलेले किंवा आर्थिक सुबत्ता असलेले या दोन्ही टोकांपर्यंत धावणाºया जगण्याच्या लंबकात चित्ती पुरेसे समाधान नसल्याची बाब एकसमान असल्याचे सांगत या आकडेवारीने जीवनशैलीचे आजार ही एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नाही, हेही समोर आणले. यातून आरोग्याच्या सुविधांत बदल होतीलही, पण त्याही पलीकडे जाऊन जगण्याचा आनंद कसा वाढवता येईल, यावर लक्ष देण्याची; त्यासाठी जागृती करण्याची गरज आहे. मन प्रसन्न करण्याची गुरूकिल्ली प्रत्येकालाच सापडेल असे नव्हे! पण किमान ताणतणावांचा निचरा कसा होईल, कोंडलेली, घुसमटलेली मने मोकळी कशी होतील यावर काम करता आले; तरी ताणांचा निचरा होण्यास व आयुष्याचा खळाळता झरा वाहण्यास मदत होईल. सध्या तेवढेही पुरेसे आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई