शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

...शख्स परेशान सा क्यों है?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 02:33 IST

मुंबईत ३१ टक्के रुग्ण मनोविकारांशी, मानसिक ताणांशी झगडत असल्याचा मुंबई महापालिकेने जाहीर केलेला आकडा पाहिला, तर या महानगरीचे मन आतून कसे पोखरले जातेय आणि मुंबापुरीच्या आनंदाचा निर्देशांक किती फसवा आहे, याची प्रचिती येते.

मुंबईत ३१ टक्के रुग्ण मनोविकारांशी, मानसिक ताणांशी झगडत असल्याचा मुंबई महापालिकेने जाहीर केलेला आकडा पाहिला, तर या महानगरीचे मन आतून कसे पोखरले जातेय आणि मुंबापुरीच्या आनंदाचा निर्देशांक किती फसवा आहे, याची प्रचिती येते. या ताणाच्या जगण्यावर होणाऱ्या परिणामातून समोर आलेले मधुमेहाचे २३.२ टक्के, अतिताणाचे २२.८ टक्के व हृदयविकाराचे साडेसात टक्के रुग्ण जर यासोबत जोडले तर सुमारे ८४ टक्के मुंबईकर हे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तणावाखाली जगत असल्याचे वास्तवही यातून समोर आले. ही स्थिती एकट्या मुंबईची नाही; तर मुंबईच्या कुशीतील उपनगरे, ठाणे-पालघर-रायगड जिल्हा आणि नवी मुंबईचीही आहे. सध्याची आकडेवारी पालिका रुग्णालयांतील आहे. त्यात खासगी रुग्णालयांचा समावेश केला, तर चित्र आणखी विषण्ण करणारे असेल. जीवनशैलीत बदल होत ती दिवसेंदिवस गतिमान, प्रचंड स्पर्धेची व उद्याची फारशी शाश्वती नसलेली होणे हे या तणावाचे मूळ आहे. ज्यांच्या हाती नोकरी आहे त्यांना ती टिकवण्याचा; तर शिक्षण असून किंवा नसूनही बेरोजगार राहावे लागत असल्याचा ताण, वाढत्या महागाईमुळे खर्चाची तोंडमिळवणी करण्यातील ओढग्रस्तता, वेगवेगळ्या कारणांमुळे रोजचा अस्वस्थ करणारा प्रवास, त्यातून येणारे नैराश्य- उदासीनता- चिडचिड, पुरेशी झोप न होणे व आनंदाचे-समाधानाचे क्षण कमी होत गेल्याचा हा परिपाक असल्याचा निष्कर्ष यातून समोर येतो. सोशल मीडियातून माणसे सतत संपर्कात आली, पण त्यांच्यातला संवाद हरपला. त्यामुळे मन मोकळे करावे, असे भोवती कुणी सापडत नाही, यामुळेही ताणाखाली वावरणारी मने कुरतडली जात आहेत. एक चांगले झाले, यानिमित्ताने मुंबईचा आरोग्य निर्देशांक समोर आला. मनावर ताण आहे, हे मान्य करून त्याबाबत बोलण्याइतका मोकळेपणाही समाजात येऊ लागला. यामुळे पुढच्या काळात आरोग्य सुविधांना कशी दिशा द्यायची, याचे चित्र ठरवता येऊ शकते. जगण्याची भ्रांत असलेले किंवा आर्थिक सुबत्ता असलेले या दोन्ही टोकांपर्यंत धावणाºया जगण्याच्या लंबकात चित्ती पुरेसे समाधान नसल्याची बाब एकसमान असल्याचे सांगत या आकडेवारीने जीवनशैलीचे आजार ही एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नाही, हेही समोर आणले. यातून आरोग्याच्या सुविधांत बदल होतीलही, पण त्याही पलीकडे जाऊन जगण्याचा आनंद कसा वाढवता येईल, यावर लक्ष देण्याची; त्यासाठी जागृती करण्याची गरज आहे. मन प्रसन्न करण्याची गुरूकिल्ली प्रत्येकालाच सापडेल असे नव्हे! पण किमान ताणतणावांचा निचरा कसा होईल, कोंडलेली, घुसमटलेली मने मोकळी कशी होतील यावर काम करता आले; तरी ताणांचा निचरा होण्यास व आयुष्याचा खळाळता झरा वाहण्यास मदत होईल. सध्या तेवढेही पुरेसे आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई