शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

दारुबंदी का नको?

By admin | Updated: March 16, 2016 08:39 IST

एखाद्या विषयावर नव्याने निर्णय घेतला जावा, अशी मागणी एकाचवेळी बहुसंख्येने केली जात असेल आणि त्या निर्णयाने जर का त्या गावात सुख-शांती नांदणार असेल तर अशा

एखाद्या विषयावर नव्याने निर्णय घेतला जावा, अशी मागणी एकाचवेळी बहुसंख्येने केली जात असेल आणि त्या निर्णयाने जर का त्या गावात सुख-शांती नांदणार असेल तर अशा प्रकरणात केवळ स्वार्थासाठी विरोध करणे गैरच म्हणावे लागेल. नगर जिल्ह्यातील निघोज या गावात दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. तोच दुर्दिन आपल्याही वाट्याला येऊ नये म्हणून दारूबंदीच्या मागणीसाठी महिलावर्ग पुढे सरसावला. अशी मागणी जेव्हा पुढे येते तेव्हा महसूल विभागाकडून संबंधित गावातील महिलांचे मतदान घेण्याचा रिवाज आहे. ५० टक्के मतदान विरोधात गेले तरच दारूबंदी हा नियम ठाऊक असताना या गावात महसूल विभागाऐवजी उत्पादन शुल्क विभागानेच मतदानाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप केला. प्रक्रिया राबविताना कोणताही प्रचार न करता महिलावर्गाला अंधारात ठेवले. त्यामुळे दारूबंदीसाठी पुरेसे मतदान होऊ शकले नाही. कोणालाही संशय यावा अशा पद्धतीने राबविलेल्या प्रक्रियेवर केवळ त्या गावातील महिलाच नव्हे; तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही आक्षेप घेतला. या मुद्याला अनुसरून फेरमतदान घेण्यात यावे या मागणीसाठी रविवारी दुपारी नगर-पुणे महामार्गावर महिलांनी रास्तारोको केला. पोलिसांनी नेहमीप्रमाणे त्यांच्यावर लाठीमार केला. आंदोलनामुळे रस्त्यातच अडकलेल्या विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या मध्यस्थीने आणि निघोज दारूबंदीचा प्रश्न विधानसभेत मांडणार असल्याचे सांगितल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र या आश्वासनाने प्रश्न निकाली निघेलच ही आशा अद्याप धूसरच आहे. मुळात मुद्दा हा आहे की, गावातील सर्वसामान्य महिला जेव्हा रस्त्यावर उतरतात, तेव्हा त्यांच्या मागणीमागे नक्कीच काहीतरी गहन अर्थ दडला असेल आणि दारू विक्री थांबल्यानंतर त्या गावातील व्यसनाधिनतेचे प्रमाण कमी होणार हे उत्पादन शुल्क विभागालाही ठाऊक असणार. असे असतानाही हा विभाग जिल्हाधिकाऱ्यांनी फेरमतदान घेण्याचा आदेश धुडकावून लावत असतील तर या दारूबंदी न होण्यामागे उत्पादन शुल्क विभागाचाच काहीतरी स्वार्थ दडला असावा, या शंकेला पुष्टी मिळाल्यावाचून राहत नाही.