शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

हेच का बापू गांधींचे राज्य?

By admin | Updated: July 21, 2016 04:07 IST

तथाकथित उच्चभ्रूंचा लोकशाहीतील या मोलाच्या संस्थांकडे बघण्याचा दृष्टीकोन अत्यंत हिणकस आणि तुच्छतेचा असतो.

संसद असो की राज्यांची विधिमंडळे, तेथील गोंधळ, आरडाओरड, आरोप-प्रत्यारोप आणि क्वचितप्रसंगी होणाऱ्या मारामाऱ्या यामुळे अनेक तथाकथित उच्चभ्रूंचा लोकशाहीतील या मोलाच्या संस्थांकडे बघण्याचा दृष्टीकोन अत्यंत हिणकस आणि तुच्छतेचा असतो. तो प्रत्येक वेळी अगदी चुकीचाच असतो असेही नाही. पण जेव्हां केव्हां देशात एखादी अत्यंत अनुचित घटना घडते व तिची काही विशिष्ट परिसर वगळता देशभरात फारशी दखलही घेतली जात नाही, तेव्हां म्हणजे अशा समर प्रसंगांमध्ये लोकशाहीतील या संस्थांचे महत्व अधोरेखित होत असते. अन्यथा आठवडाभरापूर्वीच घडून गेलेल्या गुजरात राज्याच्या सौराष्ट्रातील एका अमानुष आणि गलिच्छ प्रकाराची माध्यमांसकट साऱ्यांनी फारशी दखल घेतली नसताना जेव्हां संसदेत हे प्रकरण उपस्थित झाले तेव्हां मात्र पंतप्रधानांसकट साऱ्या राष्ट्रीय नेत्यांना या प्रकरणाची दखल घेणे भाग पडले. गेल्या अकरा तारखेला सौराष्ट्राच्या गिर-सोमनाथ जिल्ह्यातील उना येथे चार दलित युवकांनी म्हणे एक गाय मारली आणि तिचे कातडे सोलताना कुणा गोरक्षकांनी हे कथित अधम कृत्य पाहिले व संबंधित दलित युवकाना एका ओळीत उभे करुन त्यांच्या पाठीमागून त्यांना लाठ्या-काठ्या आणि लोखंडी कांबेने बेदम चोपून काढले. त्यांना एका मोटारीलाही म्हणे बांधून ठेवले होते. या पराक्रमाची चित्रफीतही तयार केली गेली आणि समाज माध्यमांवर ती टाकली. हा ‘पुरुषार्थ’ म्हणे प्रमोद गिरी गोस्वामी नावाच्या शिवसैेनिकाने केला. ज्याअर्थी त्याने आपणहून चित्रफीत काढून तिचा प्रसार केला त्याअर्थी त्याच्या नजरेत तो पुरुषार्थ तर होताच पण त्यामागे कदाचित गोरक्षणाचे महान पुण्यदेखील होते! मुळात संबंधित दलित युवकांनी ती गाय मारलीच नव्हती. मेलेली गाय आणून तिचे कातडे ते काढून घेत होते. वास्ताविक पाहात मेलेल्या जनावराचे कातडे काढण्यासारखे काम आजही देशातील काही युवकाना करावे लागत असेल तर त्यापरती लाजीरवाणी बाब अन्य कुठलीही असू शकत नाही. पण तसे असताना ते युवक जे सांगत होते त्याकडे गोरक्षकांनी साफ दुर्लक्ष केले. संबंधित घटनेची चित्रफीत सर्वदूर प्रदर्शित झाली आणि संपूर्ण गुजरात राज्यातील दलितांमध्ये तीव्र संतापाची आणि उद्वेगाची लाट उसळली. पण हा संताप व्यक्त करण्यासाठी काही दलितांनी मार्ग पत्करला तो चक्क आत्महत्त्येचा. त्या राज्याच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी रिवाजाप्रमाणे चौकशीचे आदेश आणि शांतता पाळण्याचे आवाहन वगैरे केले. पण बुधवारी हा विषय काँग्रेस आणि अन्य काही विरोधी सदस्यांनी संसदेत उपस्थित केला तेव्हां कुठे पंतप्रधानांना त्याची दखल घ्यावी लागली व मग कुठे त्यांनी खेद व्यक्त केला. आता काही राष्ट्रीय नेते गुजरातच्या दौऱ्यावर जातील व पाठोपाठ केन्द्र सरकारही हालचाल करेल. परंतु हे सारे घडून येऊ शकले ते हा विषय संसदेसमोर मांडला गेला तेव्हांच. याच गुजरात राज्यात हार्दिक पटेल नावाच्या युवकाच्या नेतृत्वाखाली मध्यंतरी आरक्षणासाठी पाटीदारांचे मोठे आंदोलन छेडले गेले होते व त्याला हिंसक वळणही लागले होते. नंतर हार्दिकला देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली डांबून ठेवले आणि नुकतीच त्याची मुक्तता झाली. याचा अर्थ लवकरच त्याच्या आंदोलनाचा पुढचा अध्याय सुरु होईल आणि तो अहिंसात्मक असेलच असे नाही. तथापि परपीडेपेक्षा आत्मपीडेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या राज्यात आणि तेही थेट सौराष्ट्रातील दलितांमध्ये या शिकवणीचे अनुसरण दिसावे पण इतरांमध्ये ते दिसू नये हे विलक्षणच मानावे लागेल. त्याच महात्म्याने ज्या दलिताना वैष्णवजन म्हटले त्या वैष्णवांची झालेली हीन आणि दीन अवस्था पाहू जाता हेच का ते बापू गांधींचे राज्य असा प्रश्न इतरांना तर पडेलच पण कदाचित हेच का आपले राज्य असा प्रश्न खुद्द बापूंनाही पडू शकेल. अनेक कर्मठ हिंदूंना तेहतीस कोटी देवाना आपल्या उदरात सामावून घेणारी गाय हा एक अत्यंत पवित्र प्राणी वाटतो तर हिंदूंचेच दैवत असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना तो केवळ एक उपयुक्त पशु वाटतो. पण अलीकडच्या काळात आणि विशेषत: देशात आणि राज्यात हिन्दुत्वनिष्ठांचे राज्य आल्यापासून गाय हा प्राणी पवित्र तर नाही आणि उपयुक्त तर नाहीच नाही, पण एक अत्यंत उपसर्ग पोहोचविणारा, समाजात तेढ उत्पन्न करणारा आणि संघर्ष आमंत्रित करणारा प्राणी वाटू लागला आहे. हा प्राणी जिवंतपणी तर दंगली आमंत्रित करुच शकतो पण मेल्यानंतरदेखील ते काम करु शकतो हेच उना येथील घटनेने दाखवून दिले आहे. संसदेने जसे या उना प्रकरणाला त्याच्या तार्किक शेवटापर्यंत नेण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलले तसेच महाराष्ट्र विधिमंडळाने अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी प्रकरण धसास लावून सरकारला जागे केले. या प्रकरणातील आरोपींना थेट फासावर लटकविण्याची मागणी करु असे जोरदार प्रतिपादनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. पण तसे खरोखरी व्हायचे असेल तर त्याआधी नीट तपास करुन पुरावे गोळा करावे लागतात हे त्यांना ज्ञात असेलच.