शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

फूस कोणाची?

By admin | Updated: March 28, 2016 03:37 IST

इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सीरिया अर्थात इसिस ही केवळ बहुराष्ट्रीय दहशतवादी संघटना राहिली नसून ती व्यापक व्यूहरचनेच्या बळावर तसेच सोशल मीडियाच्या

इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सीरिया अर्थात इसिस ही केवळ बहुराष्ट्रीय दहशतवादी संघटना राहिली नसून ती व्यापक व्यूहरचनेच्या बळावर तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून विष पेरणारी एक विखारी संघटना म्हणून समोर आली आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला धमकी देण्यापर्यंत मजल जर ही संघटना गाठत असेल तर यावरूनच तिची ताकद आणि व्यापक संघटनाचा अंदाज बांधता येऊ शकतो. सीरिया आणि इराकमधील मोठ्या शहरांवर ताबा मिळविल्यानंतर आता तिची पाळेमुळे भारताच्या मातीपर्यंत पसरत असल्याचे काही घटनांवरून स्पष्ट होऊ लागले आहे. गोवा हे जागतिक पर्यटनस्थळ असल्यामुळे परदेशातील लोक येथे मोठ्या संख्येने येतात. त्यात युरोप, अमेरिका आणि रशियातील पर्यटकांचे प्रमाण अधिक असते म्हणून गोवा आता इसिसच्या हिटलिस्टवर असल्याच्या वृत्ताला तेथील पोलीस मुख्यालयातील सूत्रांनीही दुजोरा दिला आहे. त्यामुळे केवळ गोवा येथेच सतर्कतेचे इशारे देऊन भागणार नसून देशातील पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी सावध राहणे तेवढेच गरजेचे बनले आहे. धुळे येथील सहा युवक इसिसच्या संपर्कात आल्याने पोलिसांकडून त्यांचे मतपरिवर्तन केल्याची घटना ताजी असताना आणि मुंबईतील दोघे जण इसिसच्या वाटेवरून परतले असताना सीरियाला जाण्याच्या तयारीत असलेल्या आणखी सात जणांनाही एटीएसकडून रोखण्यात आले. इसिसमध्ये जाणाऱ्या मुंबईतील दोघांनीच या सात जणांबद्दल माहिती दिल्याने व त्यांना ब्रिटनस्थित आबुबारा आणि जिहादी जॉन यांचे व्हिडीओ दाखवून भडकावल्याचे सांगितले होते. या सात जणांमधील एक जण केमिकल इंजिनिअर तर पत्नी-मुलांसह या संघटनेत दाखल होण्याच्या तयारीत होता. त्यांना इसिसमध्ये जाण्यासाठी पैशांचे आमिष दाखविण्यात आलेले नव्हते, ते स्वखर्चाने या संघटनेत सहभागी होऊ इच्छित होते. पैशांसाठी कोण गुन्हेगार झाला किंवा गुन्ह्यात सहभागी होत असेल तर हे समजू शकते पण कोणतेही आर्थिक कारण नसताना उच्च शिक्षित तरुण जर अशाप्रकारच्या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्याची इच्छा उराशी बाळगत असतील तर हा निश्चितच राष्ट्रासाठी चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. एकीकडे पोलिसांना खबर लागल्यावर संबंधितांचे मतपरिवर्तन केल्याचा दावा होत असेल तर दुसरीकडे अजून असे कितीतरी जण असतील की जे राष्ट्रद्रोह करण्याच्या मन:स्थितीपर्यंत पोहचले असतील. एखाद्या कारणाने अथवा संशयाने काही जण हाताशी लागतात पण जे हातात लागत नाही त्यांचे काय? दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होण्याचा विचार त्यांच्या मनात येतोच कसा आणि यामागे नेमकी कोणाची फूस आहे, हेदेखील शोधाचे मुद्दे आहेत.