शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

भगवानगड कुणाचा?

By admin | Updated: September 29, 2016 04:08 IST

भगवानगड आणि मुंडे हे एक समीकरण आहे. गडावरील दसरा मेळाव्याला विरोध म्हणजे थेट पंकजा मुंडे यांना विरोध. वंजारी समाजावर वर्चस्व कोणाचे, या लढाईची ही सुरुवात दिसते.

- सुधीर लंकेभगवानगड आणि मुंडे हे एक समीकरण आहे. गडावरील दसरा मेळाव्याला विरोध म्हणजे थेट पंकजा मुंडे यांना विरोध. वंजारी समाजावर वर्चस्व कोणाचे, या लढाईची ही सुरुवात दिसते. गडाच्या महंतांना कुणाचे तरी पाठबळ असल्याशिवाय ते मुंडेंना रोखणार नाहीत.गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदार पंकजा मुंडे यांचा आवाज या वर्षी भगवानगडावर दसरा मेळाव्यात घुमणार की नाही, याबाबत वंजारी समाजासह राजकीय क्षेत्रालाही उत्सुकता लागली आहे. गडाच्या महंतांनी यापुढे गडावर राजकीय सभा घेण्यास विरोध दर्शविल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. नगर जिल्ह्यातील भगवानगड हे विविध जाती-धर्मांचे श्रद्धास्थान असले तरी वंजारी समाज गडाला आपले दैवत मानतो. समाजासाठी ते अस्मितेचे केंद्र आहे. नगर व बीड यांच्या सीमारेषेवर हा अध्यात्मिक गड आहे. संत भगवानबाबा यांनी त्याची निर्मिती केली. गडावर त्यांनी उभारलेल्या इमारतीचे उद्घाटन व शिक्षण संस्थेच्या इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण १९५८ साली मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते, त्यावरुन गडाची समाजमान्यता व राजमान्यताही लक्षात यावी. भगवानबाबांनीच या गडावर दसऱ्याचा उत्सव सुरु केला. खेड्यापाड्यातील लोक एकत्र यावेत, त्यांनी एकमेकांची सुख-दु:खे विचारावीत हा त्यांचा हेतू होता. या दिवशी येणाऱ्या भाविकांना तिथे ‘गुरुमंत्र’ दिला जातो. आजही ती परंपरा टिकून आहे. वंजारी समाजात ऊसतोड कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. हे कामगार न चुकता दसऱ्याला गडावर असतात. दिवंगत गोपीनाथ मुंडे हेही गडाचे भाविक होते. मृत्युपूर्वी सलग ३५ वर्ष त्यांनी गडावरील दसरा महोत्सव चुकविला नाही. भगवानगडाला वंजारी समाजात मोठे स्थान असल्याचे ओळखूनच मुंडे यांनी त्याचा अस्मिता म्हणून वापर केला. नव्वदच्या दशकात त्यांनी येथे मेळावा घेऊन राजकीय-सामाजिक संदेश देण्यास सुरुवात केली. शिवसेनेची मुंबईत जशी दसरा मेळाव्याची परंपरा आहे, तशीच परंपरा येथे मुंडे यांनी निर्माण केली. कालांतराने भगवानगड म्हटले की गोपीनाथ मुंडे असेच समीकरण बनले. उप-मुख्यमंत्री असताना त्यांनी या गडाचा मोठ्या प्रमाणावर विकासही केला. भगवानबाबांच्या नावाने टपाल तिकीट काढले. ओबीसी नेत्यांनाही त्यांनी गडावरुन संघटित केले. एका मेळाव्याला मुंडेंसह महादेव जानकर, छगन भुजबळ, सदाभाऊ खोत यासह ओबीसी नेते एकत्र आले होते. ‘गडावरुन मला मुंबई, दिल्ली दिसते’ असे, मुंडे थेटपणे सांगायचे. त्यांच्या या दसऱ्याच्या ‘मंत्राला’ वंजारी समाजही प्रतिसाद द्यायचा.२००३ पासून नामदेवशास्त्री हे या गडाचे महंत आहेत. मुंडे हयात असताना शास्त्रींनी दसरा मेळाव्याला विरोध केला नाही. तेही मेळाव्याच्या व्यासपीठावर असायचे. मुंडे यांचे निधन झाल्यानंतर ‘पंकजा ही आता भगवानगडाची कन्या आहे’, अशी घोषणा त्यांनी केली होती. पंकजा यांनी गत दोन वर्षे गडावर दसरा मेळावाही घेतला. गत वर्षी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मेळाव्यासाठी आले होते. या वर्षी मात्र, गडावर राजकीय सभा घेता येणार नाही, अशी भूमिका महंतांनी व ट्रस्टींनी घेतली आहे. त्यामुळेच शंकेची पाल चुकचुकली आहे.महंतांच्या भूमिकेस मुंडे समर्थकांचा विरोध आहे. मेळावा होणारच, महंतांना पटत नसेल तर त्यांनी गादी सोडावी, असे मुंडे समर्थक म्हणतात. ‘महंत विरुद्ध मुंडे’, ‘अध्यात्म विरुद्ध राजकारण’ अशी ही लढाई दिसते. पण, त्यापेक्षाही पंकजा मुंडे यांना आता गडावरुन राजकीय मदत करायची की नाही, हे राजकारण यामागे शिजत असावे असाही एक तर्क आहे. हा प्रश्न थेट गडाच्या मालकीशी, पर्यायाने वंजारी समाजावरील वर्चस्वाशी निगडीत आहे. महंतांना व ट्रस्टींना बाहेरुन कुणाची तरी साथ असल्याशिवाय ते मुंडे यांनी सुरु केलेला दसरा मेळावा रोखण्याचे धाडस करतील असे वाटत नाही.