शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

होईल का महासत्ता?

By admin | Updated: September 30, 2016 04:22 IST

शिक्षण हा मूलभूत अधिकार असलेल्या भारतवर्षात जवळपास साडेआठ कोटी मुले शाळेत जातच नाहीत. दरवर्षी २० ते २५ कोटी मुले शाळेत प्रवेश घेतात पण त्यांच्यापैकी एक तृतीयांश मुलांनी

शिक्षण हा मूलभूत अधिकार असलेल्या भारतवर्षात जवळपास साडेआठ कोटी मुले शाळेत जातच नाहीत. दरवर्षी २० ते २५ कोटी मुले शाळेत प्रवेश घेतात पण त्यांच्यापैकी एक तृतीयांश मुलांनी कधी शाळेचे तोंडही बघितले नाही, हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कुठल्याही देशाचा विकास आणि जडणघडणीत शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेवढे शिक्षित नागरिक तेवढा तो देश अधिक समृद्ध समजला जातो. त्यामुळे शिक्षणाची होणारी हेळसांड आणि दुरवस्था बघितल्यावर हा देश कुठल्या बळावर जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न बघतो, हेच कळत नाही. विशेष म्हणजे शाळाबाह्य मुलांचा हा आकडा इ.स.२०११ च्या जनगणनेतील आहे. त्यानंतरच्या पाच वर्षात ही संख्या कितीतरी वाढली असणार, हे वेगळे सांगायला नको. जनगणनेच्या अलीकडेच प्रसिद्ध विश्लेषणानुसार ही मुले ५ ते १७ वयोगटातील असून शाळाबाह्य मुलांचे हे प्रमाण शिक्षणाधिकार कायद्याच्या कक्षेत येणाऱ्या वयोगटाच्या २० टक्के एवढे आहे. याशिवाय सुमारे ७८ लाख मुलांना शिक्षण घेत असतानाच पैसे कमविण्यासाठी काम करण्यास बाध्य केले जात असल्याचेही हे विश्लेषण सांगते. शासनाने वयाच्या १४ व्या वर्षापर्यंतचे शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले असताना कोट्यवधी मुले शिक्षणापासून वंचित राहात असतील तर ही कुणाची जबाबदारी समजायची? वयाच्या १८ व्या वर्षानंतर या मुलांची गणना निरक्षरांमध्ये केली जात असते. अशा परिस्थितीत शाळाबाह्यांची ही आकडेवारी बघता भारतातील ७५ टक्के लोक साक्षर असल्याचा सरकारचा दावा किती फोल आहे ते लक्षात येते. याचाच अर्थ असा की आपण केवळ आकडे फुगवून शेखी मिरविताना या कोट्यवधी निरक्षर मुलामुलींकडे मात्र दुर्लक्ष करीत आहोत. शासनाने प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क देणारा कायदा तर तयार केला पण त्याच्या अंमलबजावणीकडे मात्र कुणाचे लक्ष नाही. आपल्या मुलांना शाळेत न पाठविता कामास जुंपणाऱ्या पालकांवर कुणाचा अंकुश नाही. याशिवाय शिक्षणाचा अफाट खर्च हे सुद्धा या शाळाबाह्य मुलांच्या संख्यावाढीमागील महत्त्वाचे कारण आहे. हा अवाढव्य खर्च या देशातील गरीब जनतेला परवडणारा नाही. दोन वेळ पोटाची खळगी भरणे जेथे शक्य नाही तेथे महागड्या शिक्षणाचा विचारही ते करु शकत नाहीत. परिणामी लाखो गरीब लोक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्याऐवजी बालवयातच कामाला जुंपतात. आणि यातच त्यांचे भविष्य असल्याचा त्यांना ठाम विश्वास वाटत् असावा. शिक्षणाची ही उपेक्षा गंभीर चिंतेचा विषय आहे. शेवटी प्रगतीचा मार्ग हा शिक्षणातूनच जात असतो आणि हा मार्गच खुंटला तर आम्ही प्रगती कशी साधणार? याचा सारासार विचार सरकार, राजकीय नेते आणि पालकांनी करावयास हवा.