शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
2
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
3
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
4
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
5
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
6
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
7
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
8
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
9
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
10
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
11
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
12
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
14
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
15
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
16
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
17
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
18
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
19
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
20
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

होईल का महासत्ता?

By admin | Updated: September 30, 2016 04:22 IST

शिक्षण हा मूलभूत अधिकार असलेल्या भारतवर्षात जवळपास साडेआठ कोटी मुले शाळेत जातच नाहीत. दरवर्षी २० ते २५ कोटी मुले शाळेत प्रवेश घेतात पण त्यांच्यापैकी एक तृतीयांश मुलांनी

शिक्षण हा मूलभूत अधिकार असलेल्या भारतवर्षात जवळपास साडेआठ कोटी मुले शाळेत जातच नाहीत. दरवर्षी २० ते २५ कोटी मुले शाळेत प्रवेश घेतात पण त्यांच्यापैकी एक तृतीयांश मुलांनी कधी शाळेचे तोंडही बघितले नाही, हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कुठल्याही देशाचा विकास आणि जडणघडणीत शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेवढे शिक्षित नागरिक तेवढा तो देश अधिक समृद्ध समजला जातो. त्यामुळे शिक्षणाची होणारी हेळसांड आणि दुरवस्था बघितल्यावर हा देश कुठल्या बळावर जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न बघतो, हेच कळत नाही. विशेष म्हणजे शाळाबाह्य मुलांचा हा आकडा इ.स.२०११ च्या जनगणनेतील आहे. त्यानंतरच्या पाच वर्षात ही संख्या कितीतरी वाढली असणार, हे वेगळे सांगायला नको. जनगणनेच्या अलीकडेच प्रसिद्ध विश्लेषणानुसार ही मुले ५ ते १७ वयोगटातील असून शाळाबाह्य मुलांचे हे प्रमाण शिक्षणाधिकार कायद्याच्या कक्षेत येणाऱ्या वयोगटाच्या २० टक्के एवढे आहे. याशिवाय सुमारे ७८ लाख मुलांना शिक्षण घेत असतानाच पैसे कमविण्यासाठी काम करण्यास बाध्य केले जात असल्याचेही हे विश्लेषण सांगते. शासनाने वयाच्या १४ व्या वर्षापर्यंतचे शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले असताना कोट्यवधी मुले शिक्षणापासून वंचित राहात असतील तर ही कुणाची जबाबदारी समजायची? वयाच्या १८ व्या वर्षानंतर या मुलांची गणना निरक्षरांमध्ये केली जात असते. अशा परिस्थितीत शाळाबाह्यांची ही आकडेवारी बघता भारतातील ७५ टक्के लोक साक्षर असल्याचा सरकारचा दावा किती फोल आहे ते लक्षात येते. याचाच अर्थ असा की आपण केवळ आकडे फुगवून शेखी मिरविताना या कोट्यवधी निरक्षर मुलामुलींकडे मात्र दुर्लक्ष करीत आहोत. शासनाने प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क देणारा कायदा तर तयार केला पण त्याच्या अंमलबजावणीकडे मात्र कुणाचे लक्ष नाही. आपल्या मुलांना शाळेत न पाठविता कामास जुंपणाऱ्या पालकांवर कुणाचा अंकुश नाही. याशिवाय शिक्षणाचा अफाट खर्च हे सुद्धा या शाळाबाह्य मुलांच्या संख्यावाढीमागील महत्त्वाचे कारण आहे. हा अवाढव्य खर्च या देशातील गरीब जनतेला परवडणारा नाही. दोन वेळ पोटाची खळगी भरणे जेथे शक्य नाही तेथे महागड्या शिक्षणाचा विचारही ते करु शकत नाहीत. परिणामी लाखो गरीब लोक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्याऐवजी बालवयातच कामाला जुंपतात. आणि यातच त्यांचे भविष्य असल्याचा त्यांना ठाम विश्वास वाटत् असावा. शिक्षणाची ही उपेक्षा गंभीर चिंतेचा विषय आहे. शेवटी प्रगतीचा मार्ग हा शिक्षणातूनच जात असतो आणि हा मार्गच खुंटला तर आम्ही प्रगती कशी साधणार? याचा सारासार विचार सरकार, राजकीय नेते आणि पालकांनी करावयास हवा.