शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

जर-तरच्या उंबरठ्यावरच्या वर्षात महागाईचे काय होईल?

By मनोज गडनीस | Updated: June 10, 2023 07:42 IST

व्याज दरवाढीच्या उपचारांना महागाई नावाचा रुग्ण प्रतिसाद देत आहे. औषधाची मात्रा वाढवली असती, तर कदाचित रुग्णाची प्रकृती बिघडण्याची शक्यता होती.

- मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधी, लोकमत, मुंबई 

मे २०२२ पासून सलग सात वेळा व्याजदरात वाढ केल्यानंतर गेल्या पतधोरणाच्या माध्यमातून व्याजदरवाढीला विश्रांती देण्याचा निर्णय यंदाही भारतीय रिझर्व्ह बँकेने कायम ठेवला आहे, ही सर्वसामान्यांसाठी समाधानाची गोष्ट आहे. वास्तविक तीन महिन्यांपूर्वी सादर झालेल्या पतधोरणात पहिल्यांदा शिखर बँकेने सातत्याने केल्या गेलेल्या दरवाढीला ब्रेक लावला होता. मात्र, व्याजदर न वाढविण्याचा ट्रेण्ड यापुढेदेखील काही काळासाठी कायम राहील का, असा प्रश्न होता. मात्र, गुरुवारी सादर झालेल्या पतधोरणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा व्याजदरात वाढ न करण्याचा निर्णय जाहीर करत रिझर्व्ह बँकेने आता जवळपास पुढील वर्षभर तरी व्याजदर स्थिर ठेवण्याची दिशा निश्चित केली आहे. मे २०२२ पासून आतापर्यंतच्या सात दरवाढींमुळे व्याजदर तब्बल अडीच टक्क्यांनी वाढले. ही दरवाढ करताना मुख्य उद्देश होता तो नियंत्रणाबाहेर गेलेली चलनवाढ आटोक्यात आणणे.

खाद्यान्नापासून अनेक वस्तूंच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्या होत्या. त्यातच रशिया युक्रेन युद्धामुळे आयात कराव्या लागणाऱ्या गोष्टीदेखील महागल्या. पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीही वाढू लागल्या आणि स्वाभाविकच त्याचा फटका मालवाहतुकीला बसला. सर्वसामान्यांच्या मासिक खर्चात झालेली वाढ या रूपाने ही महागाई सर्वांनी अनुभवली. अशावेळी व्याजदरात वाढ करून व्यवस्थेतून पैसा काढून घेणे, हा एकमेव पर्याय शिल्लक राहिला होता. हातात पैसा कमी राहिला की पुरवठा जास्त व मागणी कमी, अशी स्थिती निर्माण होईल व ते झाले की, उत्पादकांपुढे किमती कमी करण्यावाचून पर्याय राहत नाही. अशा स्थितीत किमती नियंत्रणात येण्यासाठी मदत होते. सात वेळा झालेल्या व्याजदरवाढीमुळे किमती नियंत्रणात आणण्याची किमया निश्चितच साधली गेली आहे; पण आता पुढे काय, असा प्रश्न निर्माण झाला होता.

अर्थतज्ज्ञांच्या मते, सलग दुसऱ्यांदा व्याजदर स्थिर ठेवून वर्षभराची दिशा आता निश्चित झाली आहे. अपेक्षेप्रमाणे चलनवाढ आटोक्यात येताना दिसत आहे. ज्या प्रमाणात आतापर्यंत व्याजदर वाढले, त्याच्या पूर्ण परिणामांची दिलासादायक अनुभूती येण्यासाठी आणखी एक वर्षाचा तरी कालावधी लागेल. याचाच अर्थ व्याजदरवाढीच्या उपचारांना महागाई नावाचा रुग्ण प्रतिसाद देत आहे. अशावेळी दरवाढीच्या औषधाच्या मात्रेचा डोस आणखी वाढवला असता, तर कदाचित रुग्णाची प्रकृती औषधाच्या माऱ्याने बिघडण्याची शक्यता होती. व्यस्त प्रमाणाचे गणित मग शिखर बँकेच्याही हाताबाहेर गेले असते. त्यात काहीशी दिलासादायक बातमी म्हणजे, यंदा मान्सून सामान्य असेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. तसे झाले तर अन्नधान्याचे उत्पादन समाधानकारकरीत्या होईल.

व्याजदरवाढ एक वर्ष झाली नाही आणि त्यानंतर जर स्थैर्य आले, तर व्याजदर पुन्हा खाली जातील का, हा कळीचा प्रश्न आहे. मात्र, इथे एक मेख आहे. ती अशी की, पतधोरणाच्या मांडणीमध्ये वातावरणात होणारे बदल आणि चलनवाढ यांच्यावर विचार झालेला दिसतो. गेल्या तीन-चार वर्षांपासून ऋतुचक्र गंडले आहे. त्याचा थेट परिणाम पीक पाण्यावर होतो. यामुळे उत्पादन घटते अन् पुन्हा महागाईचा भडका उडतो. या दुष्टचक्राची हाक नव्हे, तर धडका आता अर्थव्यवस्थेच्या दारावर बसण्यास सुरुवात झाली आहे. व्याजदर स्थिर राखले जाण्याच्या अनुषंगाने दुसरा मुद्दा असा की, जागतिक अर्थकारणात आता भारत एक प्रमुख देश बनला आहे. यामुळे जागतिक घडामोडींचे पडसाद भारतीय अर्थव्यवस्थेवर हमखास उमटतात.

रशिया युक्रेन युद्धाचे परिणाम काही प्रमाणात आता जागतिक अर्थव्यवस्थेने पचवले आहेत किंवा गृहीत धरत त्यादृष्टीने नियोजन केले आहे. कोरोनानंतर या युद्धाचा अपवाद वगळता जागतिक अर्थकारणातून सकारात्मकतेचे संदेश मिळत आहेत. ते वास्तवात परावर्तित झाले, तर त्याचा लाभार्थी भारतही असेलच. इंधनाच्या किमती कमी होण्यापासून, नवी गुंतवणूक, असे सारी काही होताना दिसेल. याचा प्रत्यक्ष परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर वाढण्यात होईल. देशाचा विकास झाला, तर तो अर्थातच प्रत्येकाच्या खिशापर्यंत वाढीच्या रूपात काही प्रमाणात उमटताना दिसेल. त्यामुळेच आगामी वर्ष हे जर-तरच्या उंबरठ्यावरचे वर्ष ठरणार आहे. 

टॅग्स :InflationमहागाईReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक